शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
4
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
5
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
6
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
7
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
8
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
9
धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
10
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
11
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
12
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
13
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
14
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
15
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
16
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
18
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
19
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
20
Air India Plane Crash Insurance Claim : अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?

अतिक्रमण कुरवाळत रस्त्यांचे बांधकाम

By admin | Updated: February 17, 2015 01:22 IST

महानगरपालिका झाल्यानंतर दोन वर्षानंतर चंद्रपुरात विकासकामे केली जात आहे. आता विकासकामांची

महापालिकाच उदासीन महापालिका होऊनही रस्ते रुंद झाले नाही नागरिकांनीही जागा सोडली नाहीरवी जवळे ल्ल चंद्रपूर चंद्रपूर महानगरपालिका झाल्यानंतर दोन वर्षानंतर चंद्रपुरात विकासकामे केली जात आहे. आता विकासकामांची गती वाढली आहे. मात्र विकासकामे करताना पुढे हे महानगर कसे सुटसुटीत दिसेल, याचा विचार केला जात नसल्याचे दिसते. महापालिका झाल्याने रस्ते रुंद होतील, असाही चंद्रपूरकरांना विश्वास होता. मात्र अतिक्रमणांना कुरवाळत, आहे त्याच जागेवर महापालिकेकडून रस्त्यांचे बांधकाम करण्यात येत आहे. त्यामुळे अरुंद रस्त्यांची समस्या कधी सुटेल काय, हा प्रश्न कायम आहे.२०१२ मध्ये चंद्रपूरला महानगरपालिकेचा दर्जा मिळाला आणि चंद्रपूकरांमध्ये उत्साहाचे, आनंदाचे वातावरण निर्माण झाले. महानगरपालिका झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात निधी मिळेल, विविध योजना येतील आणि चंद्रपूर शहराचा चेहरामोहराच बदलेल, अशी आशाही येथील नागरिकांना होती. आशेप्रमाणे चंद्रपूर महानगरपालिकेला मोठ्या प्रमाणात निधी मिळत आहे. एलबीटी व विविध करांच्या माध्यमातून महानगरपालिकेचे उत्पन्नही वाढत आहे. नगरोत्थान, दलित वस्ती सुधार योजना, आदी योजनांमधून मोठा निधीही प्राप्त होत आहे. त्यामुळे आता विकासकामांचा धडाका सुरू करण्यात आला आहे. मात्र हा विकास रस्ते आणि नाल्या बांधण्यापुरताच मर्यादित दिसत आहे. चंद्रपुरात नगरपालिका अस्तित्वात असताना शहर विकास आराखड्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. या काळात चंद्रपूरची लोकसंख्याही झपाट्यावे वाढत गेली. एका घरांचे त्याच ठिकाणी दोन घरे बांधण्यात येऊ लागली. त्यामुळे सहाजिकच रस्त्यांवर अतिक्रमण वाढत जाऊन रस्ते चांगलेच अरुंद झाले. शहर विकास आराखड्यात जे रस्ते १२-१५ फुटाचे असतील, ते प्रत्यक्षात सात-आठ फुटाचे झाले. रस्ते आणि नाल्यांचे बांधकाम करताना तेव्हा नगरपालिकेने अतिक्रमण हटवून, वेळप्रसंगी जागा संपादित करून शहर विकास आराखड्यासारखे रस्ते तयार केले नाही. जो रस्ता उखडला, तिथे आहे तेवढ्याच जागेवर रस्त्यांचे बांधकाम करण्यात येत राहिले. त्यामुळे एवढ्या वर्षातही रस्ते रुंद होण्याऐवजी ते गल्लीबोळात रुपांतरित होत राहिले. आता महानगरपालिका झाल्यानंतरही प्रशासनाने तोच कित्ता गिरविला आहे.आतातरी शहरातील वॉर्डावार्डातील अंतर्गत रस्त्यांचे बांधकाम करताना रस्त्यावरील अतिक्रमण काढून रस्ते रुंद करून मग बांधकाम करणे आवश्यक होते. मात्र त्या भानगडीत न पडता महापालिका प्रशासनाकडून पुन्हा आहे त्याच जागेवर रस्त्यांचे बांधकाम करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, जिथे जागा नसेल, तिथेही हे रस्ते सरळ न जागा निमुळते होत आहेत. आताही महापालिकेने शहर विकास आराखड्याला बगल देत रस्त्यांचे बांधकाम सुरू ठेवल्याने पुढे या शहरातील रस्ते रुंद होतील काय, असा प्रश्न आपसुकच निर्माण होत आहे. ५८ कोटींचे रस्तेचंद्रपूरच्या पंचशताब्दी महोत्सवानिमित्त शासनाकडून मिळालेल्या २५ कोटींपैकी आठ कोटी रुपयांची तरतूद रस्त्यांसाठी करण्यात आली होती. महात्मा गांधी, कस्तुरबा मार्ग यासारख्या प्रमुख रस्त्यांची कामे यात करण्यात आली. हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आली होती. त्यानंतर नगरोत्थानमधून वॉर्डावॉर्डातील रस्त्यांच्या बांधकामासाठी ५० कोटींची तरतूद करण्यात आली. ही कामे आता सुरू आहे. पुढे आणखी रस्त्यांच्या कामासाठी तरतूद करण्यात येणार आहे. भू संपादन करणे गरजेचेरस्त्यांचे रुंदीकरण करताना महापालिकेने रस्त्यावरील अतिक्रमण काढून रस्ते रुंद करण्याचा प्रयत्न करायला हवा. गरज पडत असेल तर पुढील दृष्टीकोन समोर ठेवून भू संपादन प्रक्रिया राबवून नागरिकांची काही जागाही रस्त्यांसाठी घेणे आवश्यक आहे. मात्र उगाच नागरिकांचा रोष नको म्हणून महानगरपालिका या भानगडीत पडलेच नाही.अग्निशमन वाहनही जात नाहीचंद्रपूर शहरातील काही वॉर्डातील रस्ते एवढे निमुळते आहेत की त्यांना गल्ली म्हणून संबोधले तरी वावगे ठरणार आहे. रस्त्यावरून किमान अग्निशमन वाहन जावे, असा सर्वसमान्य संकेत आहे. मात्र शहरातील अनेक रस्त्यावरून अग्निशमन वाहनही जात नाही.नागरिकही गप्पचअनेक नागरिकांनी रस्त्यावर थोडे थोडे करून चांगलेच अतिक्रमण करून ठेवले आहे. त्यामुळे या नागरिकांना रस्ते तर रुंद हवेत; मात्र आपल्या घरांसमोर रस्ता रुंद नको, असेही काही नागरिक आहे. कारण एकतर अतिक्रमण काढले जाईल, नाहीतर भू संपादन प्रक्रियेत आपली जागा जाईल, अशी त्यांना भीती आहे. मात्र शहर विकासाच्या बाबतीत ही बाब योग्य नाही, हेही तेवढेच खरे.याबाबत प्रतिक्रिया घेण्यासाठी महापालिकेचे आयुक्त सुधीर शंभरकर व नगर रचना विभागाचे सहाय्यक संचालक ए.एल. सिसोदिया यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.