शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

निधीअभावी रखडले बंधाऱ्याचे बांधकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 00:38 IST

राजुरा तालुक्यातील गोवरी गावालगतच्या नाल्यावर तब्बल दहा-बारा वर्षांपूर्वी बंधारा बांधण्यात आला. मात्र, या बंधाऱ्याचे बांधकाम उशिरा सुरू झाल्यामुळे बांधकामाचा आर्थिक बजेट वाढत गेला.

ठळक मुद्देबजेट वाढल्याने कंत्राटदार पसार : शेतकऱ्यांचे हरितक्रांतीचे स्वप्न भंगले

प्रकाश काळे।आॅनलाईन लोकमतगोवरी : राजुरा तालुक्यातील गोवरी गावालगतच्या नाल्यावर तब्बल दहा-बारा वर्षांपूर्वी बंधारा बांधण्यात आला. मात्र, या बंधाऱ्याचे बांधकाम उशिरा सुरू झाल्यामुळे बांधकामाचा आर्थिक बजेट वाढत गेला. त्यामुळे संबधित कंत्राटदाराने काम सोडून दिले. या बंधारा बांधकामाला वाढीव निधी द्यावा, अशी मागणी अनेकदा शेतकरी व गोवरीवासीयांनी संबंधित विभाग आणि लोकप्रतिनिधींकडे केली. मात्र याकडे दुर्लक्ष झाल्याने गोवरीचा बंधारा आता अखेरच्या घटका मोजत आहे.राजुरा तालुक्यातील गोवरी हे वेकोलिच्या कुशीत वसलेले चार हजार लोकसंख्येचे गाव. गावाच्या सभोवताल वेकोलिच्या खुल्या कोळसा खाणी आहेत. वेकोलित पाण्याचा प्रचंड उपसा होत असल्याने परिसरातील पाण्याची पातळी पूर्णत: खोल गेलेली आहे. बंधाºयामुळे पाण्याची पातळी वाढेल आणि गावकºयांना व परिसरातील शेतकºयांना सिंचनाचा लाभ घेता येईल, या हेतूने दहा-बारा वर्षांपूर्वी गोवरी गावालगतच्या नाल्यावर बंधारा बांधकाम सुरू केले.परंतु बंधाºयाचे काम उशिरा सुरू झाल्याने बंधारा बांधकामाचा आर्थिक बजेट वाढत गेला. संबंधित कंत्राटदाराला काम करणे परवडत नसल्याने त्याने अर्ध्यावरच काम सोडून दिले. वाढीव निधीअभावी बंधाºयाचे काम अडल्याने शेतकऱ्यांच्या हरितक्रांतीचे स्वप्न भंगले आहे. बंधाऱ्याला वाढीव निधी मिळावा, यासाठी बंधारा समितीचे अध्यक्ष नागोबा पाटील लांडे यांनी शेतकऱ्यांना सोबत घेऊन आमदार अ‍ॅड. संजय धोटे यांच्याकडे पाठपुरावा केला. बंधाऱ्याचे काम गेल्या दहा-बारा वर्षांपासून अपूर्ण असल्याने शासनाने बंधारा बांधकामावर लाखो रुपये खर्चूनही या बंधाऱ्याचा उपयोग कुणालाही झाला नाही.‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ असा शासनाचा नियम आहे. पाण्याचा अपव्यय होऊ नये, यासाठी शासन जनजागृती करते. मात्र शासनाच्या नियोजनशून्य धोरणामुळे लाखो रुपये खर्च करूनही बंधाऱ्यात पाण्याचा एक थेंबही अडविता आला नाही, हे दुदैव आहे.त्यामुळे या बंधाºयाचे तातडीने बांधकाम करावे, अशी मागणी गोवरी येथील गणपत लांडे, भाऊराव रणदिवे, शंकर लांडे, मारोती लांडे, भास्कर लोहे, अमित रणदिवे, सुमित रणदिवे, प्रमोद लांडे, श्रीधर जुनघरी, भास्कर जुनघरी, प्रभाकर जुनघरी, निखील लांडे यांनी केली आहे.तीन आमदार बदलले, बंधारा अपूर्णचबंधारा बांधकाम सुरू झाल्यापासून राजुरा विधानसभा क्षेत्राचे तब्बल तीन आमदार बदलले. मात्र हा बंधारा तसाच खितपत अखेरच्या घटका मोजत आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन बंधारा बांधकाम पूर्ण करावे, अशी मागणी गोवरीवासीयांनी केली आहे.शासनाने दहा-बारा वर्षांपूर्वी गोवरी गावालगतच्या नाल्यावर लाखो रुपये खर्च करून बंधारा बांधला. मात्र नियोजनाअभावी बंधारा बांधकाम रखडले. बंधाºयाचे काम पूर्ण करावे, यासाठी संबधितांकडे चकरा मारल्या. पण बंधारा अजूनही पूर्ण झाला नाही.- नागोबा पाटील लांडे,अध्यक्ष, बंधारा समिती, गोवरी