शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

निधीअभावी रखडले बंधाऱ्याचे बांधकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 00:38 IST

राजुरा तालुक्यातील गोवरी गावालगतच्या नाल्यावर तब्बल दहा-बारा वर्षांपूर्वी बंधारा बांधण्यात आला. मात्र, या बंधाऱ्याचे बांधकाम उशिरा सुरू झाल्यामुळे बांधकामाचा आर्थिक बजेट वाढत गेला.

ठळक मुद्देबजेट वाढल्याने कंत्राटदार पसार : शेतकऱ्यांचे हरितक्रांतीचे स्वप्न भंगले

प्रकाश काळे।आॅनलाईन लोकमतगोवरी : राजुरा तालुक्यातील गोवरी गावालगतच्या नाल्यावर तब्बल दहा-बारा वर्षांपूर्वी बंधारा बांधण्यात आला. मात्र, या बंधाऱ्याचे बांधकाम उशिरा सुरू झाल्यामुळे बांधकामाचा आर्थिक बजेट वाढत गेला. त्यामुळे संबधित कंत्राटदाराने काम सोडून दिले. या बंधारा बांधकामाला वाढीव निधी द्यावा, अशी मागणी अनेकदा शेतकरी व गोवरीवासीयांनी संबंधित विभाग आणि लोकप्रतिनिधींकडे केली. मात्र याकडे दुर्लक्ष झाल्याने गोवरीचा बंधारा आता अखेरच्या घटका मोजत आहे.राजुरा तालुक्यातील गोवरी हे वेकोलिच्या कुशीत वसलेले चार हजार लोकसंख्येचे गाव. गावाच्या सभोवताल वेकोलिच्या खुल्या कोळसा खाणी आहेत. वेकोलित पाण्याचा प्रचंड उपसा होत असल्याने परिसरातील पाण्याची पातळी पूर्णत: खोल गेलेली आहे. बंधाºयामुळे पाण्याची पातळी वाढेल आणि गावकºयांना व परिसरातील शेतकºयांना सिंचनाचा लाभ घेता येईल, या हेतूने दहा-बारा वर्षांपूर्वी गोवरी गावालगतच्या नाल्यावर बंधारा बांधकाम सुरू केले.परंतु बंधाºयाचे काम उशिरा सुरू झाल्याने बंधारा बांधकामाचा आर्थिक बजेट वाढत गेला. संबंधित कंत्राटदाराला काम करणे परवडत नसल्याने त्याने अर्ध्यावरच काम सोडून दिले. वाढीव निधीअभावी बंधाºयाचे काम अडल्याने शेतकऱ्यांच्या हरितक्रांतीचे स्वप्न भंगले आहे. बंधाऱ्याला वाढीव निधी मिळावा, यासाठी बंधारा समितीचे अध्यक्ष नागोबा पाटील लांडे यांनी शेतकऱ्यांना सोबत घेऊन आमदार अ‍ॅड. संजय धोटे यांच्याकडे पाठपुरावा केला. बंधाऱ्याचे काम गेल्या दहा-बारा वर्षांपासून अपूर्ण असल्याने शासनाने बंधारा बांधकामावर लाखो रुपये खर्चूनही या बंधाऱ्याचा उपयोग कुणालाही झाला नाही.‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ असा शासनाचा नियम आहे. पाण्याचा अपव्यय होऊ नये, यासाठी शासन जनजागृती करते. मात्र शासनाच्या नियोजनशून्य धोरणामुळे लाखो रुपये खर्च करूनही बंधाऱ्यात पाण्याचा एक थेंबही अडविता आला नाही, हे दुदैव आहे.त्यामुळे या बंधाºयाचे तातडीने बांधकाम करावे, अशी मागणी गोवरी येथील गणपत लांडे, भाऊराव रणदिवे, शंकर लांडे, मारोती लांडे, भास्कर लोहे, अमित रणदिवे, सुमित रणदिवे, प्रमोद लांडे, श्रीधर जुनघरी, भास्कर जुनघरी, प्रभाकर जुनघरी, निखील लांडे यांनी केली आहे.तीन आमदार बदलले, बंधारा अपूर्णचबंधारा बांधकाम सुरू झाल्यापासून राजुरा विधानसभा क्षेत्राचे तब्बल तीन आमदार बदलले. मात्र हा बंधारा तसाच खितपत अखेरच्या घटका मोजत आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन बंधारा बांधकाम पूर्ण करावे, अशी मागणी गोवरीवासीयांनी केली आहे.शासनाने दहा-बारा वर्षांपूर्वी गोवरी गावालगतच्या नाल्यावर लाखो रुपये खर्च करून बंधारा बांधला. मात्र नियोजनाअभावी बंधारा बांधकाम रखडले. बंधाºयाचे काम पूर्ण करावे, यासाठी संबधितांकडे चकरा मारल्या. पण बंधारा अजूनही पूर्ण झाला नाही.- नागोबा पाटील लांडे,अध्यक्ष, बंधारा समिती, गोवरी