शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील लहान-मोठ्या नद्यांवर बंधारे बांधावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 23:35 IST

जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील मार्डा गावालगत वर्धा नदीवर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) पॉवर प्लाँटसाठी बंधारा बांधलेला आहे. यावर अंदाजे ३०० कोटी रुपयांचा खर्च झाला. या धरणात आता जूनमध्येही मुबलक पाणी आहे. यामुळे उद्योगासह शेतकऱ्यांना सिंचन सुविधासाठी पाणी उपलब्ध झाले.

ठळक मुद्देनरेश पुगलिया यांची मागणी : मार्डा येथील बंधाऱ्याची केली पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील मार्डा गावालगत वर्धा नदीवर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) पॉवर प्लाँटसाठी बंधारा बांधलेला आहे. यावर अंदाजे ३०० कोटी रुपयांचा खर्च झाला. या धरणात आता जूनमध्येही मुबलक पाणी आहे. यामुळे उद्योगासह शेतकऱ्यांना सिंचन सुविधासाठी पाणी उपलब्ध झाले. याच धर्तीवर जिल्ह्यातील लहान-मोठ्या सर्व नद्यांवर बंधारे बांधावे, अशी मागणी माजी खासदार नरेश पुगलिया यांनी पत्रकार परिषदेत केली.आजघडीला शहरासह ग्रामीण भागात पाणी टंचाई समस्या उग्र झाली आहे. शेतकरी चिंताग्रस्त आहे. मोठी धरणे बांधण्यापेक्षा नद्यावरील बंधारे उपयुक्त ठरत आहेत. शेतकऱ्यांनी बंधाऱ्यातील पाणी स्वखर्चाने विद्युत पंप अथवा डिझेल पंप, सौर ऊर्जाद्वारा पाण्याचा सिंचनासाठी उपयोग केल्यास पाईप लाईन पंपाच्या खर्चावार व्यक्तीगतसाठी ५० टक्के तर सामूहिक गट शेतकºयांना ९० टक्के सवलत राज्य शासनाने दिल्यास शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणार आहे.जिल्ह्यातील नद्यांच्या घाटावरुन लिलावाच्या माध्यामतून मोठ्या प्रमाणात रेतीचे उत्खनन केले जाते. यामुळे जिल्हा प्रशासनाला दरवर्षी २० ते २५ कोटी रुपयांचा महसूल मिळतो. जिल्ह्यातील उद्योग, महानगरपालिका, नगरपरिषद, ग्रामपंचायतीना पाण्याची आवश्यकता भासते. याद्वारे जवळपास ६० कोटीवर रुपयांचा महसूल सिंचाई विभागाला मिळतो.हा सगळा महसूल जिल्ह्यातील नद्यांमुळे मिळतो. मात्र नद्यांची देखभाल, सफाईकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. मोठमोठी धरणे बांधकामावर हजारो कोटी रुपयाचा खर्च राज्य सरकार करते. मात्र २० वर्षापर्यंत काम पूर्णत्वास जात नाही. त्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला जातो. भंडारा जिल्ह्यातील इंदिरा सागर प्रकल्प (गोसीखुर्द) धरणावर आजतागायत ११ हजार कोटी रुपयांचा खर्च झाला. आत देखील सात ते आठ हजार कोटी रुपये खर्च बांधकामावर अपेक्षित असून सिंचनाचे लाभक्षेत्र फार कमी आहे. यातील भ्रष्टाचाराचे प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित आहे, अशी माहितीही पुगलिया यांनी यावेळी दिली.यावेळी नरेश पुगलिया यांनी मार्डा येथील बंधाऱ्याची पाहणी केली व तिथेच पत्रकार परिषदेत वरील माहिती दिली. यावेळी मनपा गटनेते सुरेश महाकूलकर, देवेंद्र बेले, अ‍ॅड. अविनाश ठावरी, सुभाष माथनकर, अशोक नागापुरे, वसंत मांढरे, रामभाऊ टोंगे, प्रविण पडवेकर, मार्डाच्या सरपंच योगिता पिंपळशेंडे, प्रकाश मुथा, बंडू टिपले, गणेश चवले, शंकर जोगी आदी उपस्थित होते.जून महिन्यातही मार्डा बंधाऱ्यात मुबलक पाणीराज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यांनी वरोरा तालुक्यातील मार्डा येथील बंधाऱ्याला भेट देवून अवलोकन करावे. सोबत संबंधित अधिकाऱ्यांना घ्यावे, म्हणजे त्यांना बंधाऱ्याचे महत्व लक्षात येईल. जून महिन्यात देखील या बंधाऱ्यामुळे २० ते २५ किमी बँक वॉटर उपलब्ध आहे. वरोरा तालुक्यातील काही गावातील शेतकरी सिंचनासाठी पाण्याचा उपयोग घेत आहे. असेच बंधारे राज्य सरकारने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ एमआयडीसी म्हाडा, उद्योग, महानगरपालिका, जिल्हापरिषद, नगरपरिषद यांच्या माध्यमातून बांधल्यास शेतीसाठी, उद्योग व पिण्याच्या पाण्याची सोय जिल्ह्यासाठी होणार असून भूजल पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे, असेही यावेळी नरेश पुगलिया यांनी सांगितले.

टॅग्स :riverनदीNaresh Pugliaनरेश पुगलिया