शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

जिल्ह्यातील लहान-मोठ्या नद्यांवर बंधारे बांधावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 23:35 IST

जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील मार्डा गावालगत वर्धा नदीवर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) पॉवर प्लाँटसाठी बंधारा बांधलेला आहे. यावर अंदाजे ३०० कोटी रुपयांचा खर्च झाला. या धरणात आता जूनमध्येही मुबलक पाणी आहे. यामुळे उद्योगासह शेतकऱ्यांना सिंचन सुविधासाठी पाणी उपलब्ध झाले.

ठळक मुद्देनरेश पुगलिया यांची मागणी : मार्डा येथील बंधाऱ्याची केली पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील मार्डा गावालगत वर्धा नदीवर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) पॉवर प्लाँटसाठी बंधारा बांधलेला आहे. यावर अंदाजे ३०० कोटी रुपयांचा खर्च झाला. या धरणात आता जूनमध्येही मुबलक पाणी आहे. यामुळे उद्योगासह शेतकऱ्यांना सिंचन सुविधासाठी पाणी उपलब्ध झाले. याच धर्तीवर जिल्ह्यातील लहान-मोठ्या सर्व नद्यांवर बंधारे बांधावे, अशी मागणी माजी खासदार नरेश पुगलिया यांनी पत्रकार परिषदेत केली.आजघडीला शहरासह ग्रामीण भागात पाणी टंचाई समस्या उग्र झाली आहे. शेतकरी चिंताग्रस्त आहे. मोठी धरणे बांधण्यापेक्षा नद्यावरील बंधारे उपयुक्त ठरत आहेत. शेतकऱ्यांनी बंधाऱ्यातील पाणी स्वखर्चाने विद्युत पंप अथवा डिझेल पंप, सौर ऊर्जाद्वारा पाण्याचा सिंचनासाठी उपयोग केल्यास पाईप लाईन पंपाच्या खर्चावार व्यक्तीगतसाठी ५० टक्के तर सामूहिक गट शेतकºयांना ९० टक्के सवलत राज्य शासनाने दिल्यास शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणार आहे.जिल्ह्यातील नद्यांच्या घाटावरुन लिलावाच्या माध्यामतून मोठ्या प्रमाणात रेतीचे उत्खनन केले जाते. यामुळे जिल्हा प्रशासनाला दरवर्षी २० ते २५ कोटी रुपयांचा महसूल मिळतो. जिल्ह्यातील उद्योग, महानगरपालिका, नगरपरिषद, ग्रामपंचायतीना पाण्याची आवश्यकता भासते. याद्वारे जवळपास ६० कोटीवर रुपयांचा महसूल सिंचाई विभागाला मिळतो.हा सगळा महसूल जिल्ह्यातील नद्यांमुळे मिळतो. मात्र नद्यांची देखभाल, सफाईकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. मोठमोठी धरणे बांधकामावर हजारो कोटी रुपयाचा खर्च राज्य सरकार करते. मात्र २० वर्षापर्यंत काम पूर्णत्वास जात नाही. त्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला जातो. भंडारा जिल्ह्यातील इंदिरा सागर प्रकल्प (गोसीखुर्द) धरणावर आजतागायत ११ हजार कोटी रुपयांचा खर्च झाला. आत देखील सात ते आठ हजार कोटी रुपये खर्च बांधकामावर अपेक्षित असून सिंचनाचे लाभक्षेत्र फार कमी आहे. यातील भ्रष्टाचाराचे प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित आहे, अशी माहितीही पुगलिया यांनी यावेळी दिली.यावेळी नरेश पुगलिया यांनी मार्डा येथील बंधाऱ्याची पाहणी केली व तिथेच पत्रकार परिषदेत वरील माहिती दिली. यावेळी मनपा गटनेते सुरेश महाकूलकर, देवेंद्र बेले, अ‍ॅड. अविनाश ठावरी, सुभाष माथनकर, अशोक नागापुरे, वसंत मांढरे, रामभाऊ टोंगे, प्रविण पडवेकर, मार्डाच्या सरपंच योगिता पिंपळशेंडे, प्रकाश मुथा, बंडू टिपले, गणेश चवले, शंकर जोगी आदी उपस्थित होते.जून महिन्यातही मार्डा बंधाऱ्यात मुबलक पाणीराज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यांनी वरोरा तालुक्यातील मार्डा येथील बंधाऱ्याला भेट देवून अवलोकन करावे. सोबत संबंधित अधिकाऱ्यांना घ्यावे, म्हणजे त्यांना बंधाऱ्याचे महत्व लक्षात येईल. जून महिन्यात देखील या बंधाऱ्यामुळे २० ते २५ किमी बँक वॉटर उपलब्ध आहे. वरोरा तालुक्यातील काही गावातील शेतकरी सिंचनासाठी पाण्याचा उपयोग घेत आहे. असेच बंधारे राज्य सरकारने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ एमआयडीसी म्हाडा, उद्योग, महानगरपालिका, जिल्हापरिषद, नगरपरिषद यांच्या माध्यमातून बांधल्यास शेतीसाठी, उद्योग व पिण्याच्या पाण्याची सोय जिल्ह्यासाठी होणार असून भूजल पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे, असेही यावेळी नरेश पुगलिया यांनी सांगितले.

टॅग्स :riverनदीNaresh Pugliaनरेश पुगलिया