शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

जिल्ह्यातील लहान-मोठ्या नद्यांवर बंधारे बांधावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 23:35 IST

जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील मार्डा गावालगत वर्धा नदीवर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) पॉवर प्लाँटसाठी बंधारा बांधलेला आहे. यावर अंदाजे ३०० कोटी रुपयांचा खर्च झाला. या धरणात आता जूनमध्येही मुबलक पाणी आहे. यामुळे उद्योगासह शेतकऱ्यांना सिंचन सुविधासाठी पाणी उपलब्ध झाले.

ठळक मुद्देनरेश पुगलिया यांची मागणी : मार्डा येथील बंधाऱ्याची केली पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील मार्डा गावालगत वर्धा नदीवर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) पॉवर प्लाँटसाठी बंधारा बांधलेला आहे. यावर अंदाजे ३०० कोटी रुपयांचा खर्च झाला. या धरणात आता जूनमध्येही मुबलक पाणी आहे. यामुळे उद्योगासह शेतकऱ्यांना सिंचन सुविधासाठी पाणी उपलब्ध झाले. याच धर्तीवर जिल्ह्यातील लहान-मोठ्या सर्व नद्यांवर बंधारे बांधावे, अशी मागणी माजी खासदार नरेश पुगलिया यांनी पत्रकार परिषदेत केली.आजघडीला शहरासह ग्रामीण भागात पाणी टंचाई समस्या उग्र झाली आहे. शेतकरी चिंताग्रस्त आहे. मोठी धरणे बांधण्यापेक्षा नद्यावरील बंधारे उपयुक्त ठरत आहेत. शेतकऱ्यांनी बंधाऱ्यातील पाणी स्वखर्चाने विद्युत पंप अथवा डिझेल पंप, सौर ऊर्जाद्वारा पाण्याचा सिंचनासाठी उपयोग केल्यास पाईप लाईन पंपाच्या खर्चावार व्यक्तीगतसाठी ५० टक्के तर सामूहिक गट शेतकºयांना ९० टक्के सवलत राज्य शासनाने दिल्यास शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणार आहे.जिल्ह्यातील नद्यांच्या घाटावरुन लिलावाच्या माध्यामतून मोठ्या प्रमाणात रेतीचे उत्खनन केले जाते. यामुळे जिल्हा प्रशासनाला दरवर्षी २० ते २५ कोटी रुपयांचा महसूल मिळतो. जिल्ह्यातील उद्योग, महानगरपालिका, नगरपरिषद, ग्रामपंचायतीना पाण्याची आवश्यकता भासते. याद्वारे जवळपास ६० कोटीवर रुपयांचा महसूल सिंचाई विभागाला मिळतो.हा सगळा महसूल जिल्ह्यातील नद्यांमुळे मिळतो. मात्र नद्यांची देखभाल, सफाईकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. मोठमोठी धरणे बांधकामावर हजारो कोटी रुपयाचा खर्च राज्य सरकार करते. मात्र २० वर्षापर्यंत काम पूर्णत्वास जात नाही. त्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला जातो. भंडारा जिल्ह्यातील इंदिरा सागर प्रकल्प (गोसीखुर्द) धरणावर आजतागायत ११ हजार कोटी रुपयांचा खर्च झाला. आत देखील सात ते आठ हजार कोटी रुपये खर्च बांधकामावर अपेक्षित असून सिंचनाचे लाभक्षेत्र फार कमी आहे. यातील भ्रष्टाचाराचे प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित आहे, अशी माहितीही पुगलिया यांनी यावेळी दिली.यावेळी नरेश पुगलिया यांनी मार्डा येथील बंधाऱ्याची पाहणी केली व तिथेच पत्रकार परिषदेत वरील माहिती दिली. यावेळी मनपा गटनेते सुरेश महाकूलकर, देवेंद्र बेले, अ‍ॅड. अविनाश ठावरी, सुभाष माथनकर, अशोक नागापुरे, वसंत मांढरे, रामभाऊ टोंगे, प्रविण पडवेकर, मार्डाच्या सरपंच योगिता पिंपळशेंडे, प्रकाश मुथा, बंडू टिपले, गणेश चवले, शंकर जोगी आदी उपस्थित होते.जून महिन्यातही मार्डा बंधाऱ्यात मुबलक पाणीराज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यांनी वरोरा तालुक्यातील मार्डा येथील बंधाऱ्याला भेट देवून अवलोकन करावे. सोबत संबंधित अधिकाऱ्यांना घ्यावे, म्हणजे त्यांना बंधाऱ्याचे महत्व लक्षात येईल. जून महिन्यात देखील या बंधाऱ्यामुळे २० ते २५ किमी बँक वॉटर उपलब्ध आहे. वरोरा तालुक्यातील काही गावातील शेतकरी सिंचनासाठी पाण्याचा उपयोग घेत आहे. असेच बंधारे राज्य सरकारने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ एमआयडीसी म्हाडा, उद्योग, महानगरपालिका, जिल्हापरिषद, नगरपरिषद यांच्या माध्यमातून बांधल्यास शेतीसाठी, उद्योग व पिण्याच्या पाण्याची सोय जिल्ह्यासाठी होणार असून भूजल पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे, असेही यावेळी नरेश पुगलिया यांनी सांगितले.

टॅग्स :riverनदीNaresh Pugliaनरेश पुगलिया