शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
3
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
4
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
5
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
6
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
7
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!
8
अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टवरही पाकिस्तान बॅन? भारताचे ई-कॉमर्स कंपन्यांना स्पष्ट आदेश, यापुढे..
9
"मित्रा, भारतात ॲपलचं उत्पादन करू नकोस"; डोनाल्ड ट्रम्प यांचा टीम कूकना सल्ला... काय आहे नेमका मुद्दा?
10
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला
11
"अफगाणिस्तानचे लोक मनापासून भारतासोबत..." ; मरियम सोलेमानाखिल यांनी पाकिस्तासोबतच्या संबंधावर भाष्य केले
12
Purnam Kumar Shaw : "डोळ्यावर पट्टी बांधून नेलं, टॉर्चर केलं..."; पाकिस्तानातून परतलेल्या BSF जवानाची आपबीती
13
३५ चेंडूत शतक झळकवणारा वैभव सूर्यवंशी दहावीत नापास झाला?; व्हायरल दाव्याचं सत्य जाणून घ्या
14
'पाकिस्तानचा अणुबॉम्ब IAEA च्या देखरेखीखाली आणावा', संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मागणी
15
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
16
Gold Rate Today 15 May: एका झटक्यात सोनं २ हजार रुपयांपेक्षा अधिक झालं स्वस्त, चांदीतही मोठी घसरण; काय आहेत नवे दर?
17
पिता न तू वैरी! किन्नर म्हणत पोटच्या मुलीचा जीव घेतला, नंतर पत्नीच्या पायावर डोकं ठेवत म्हणाला...
18
पाकिस्तानशी यारी, तुर्की-अझरबैजानला पडणार भारी; भारतीयांनी अख्खा बाजार उठवला
19
ना गिल, ना पंत... सुनील गावसकर म्हणतात- 'हा' अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा कसोटी कर्णधार हवा!
20
"आमचा पुरुषांवरचा विश्वास उडाला"; नवऱ्यांनी फसवलं, दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं

दरवाढीविरोधात सावलीत कॉंग्रेसचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:51 IST

सावली : केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल, गॅस व दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंवर दुपटीने भाववाढ केल्याने सामान्य जनतेचे जीवन जगणे कठीण ...

सावली : केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल, गॅस व दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंवर दुपटीने भाववाढ केल्याने सामान्य जनतेचे जीवन जगणे कठीण झाले आहे. केंद्र सरकारने मंजूर केलेले तीन कृषी कायदे शेतकरीविरोधी असून, सदर कायदे धनदांडग्यांच्या हिताचे आहेत. या कायद्यामुळे शेतकरी हा बंदूआ मजदूर होणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारने शेतकरीविरोधी तिन्ही कायदे रद्द करून कृषी हमीभावाला संवैधानिक दर्जा प्राप्त करून शेतकरी हिताचे कायदे करावे, असे प्रतिपादन काँग्रेसचे कार्यकर्ते संदीप गड्डमवार यांनी मोर्चाला संबोधित करताना केले.

केंद्र सरकारच्या भाववाढीच्या निषेधार्थ गुरुवारी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सावलीच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, माजी आमदार देवराव भांडेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य दिनेश चिटनूरवार, तालुकाध्यक्ष यशवंत बोरकुटे, महिला तालुकाध्यक्ष उषा भोयर, पंचायत समिती सभापती विजय कोरेवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती युवराज शेरकी, शहर अध्यक्ष विजय मुत्यालवार, तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष नितीन दुवावार, राजेश सिद्धम आदी कार्यकर्ते मोर्चादरम्यान उपस्थित होते.

दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाच्या काळात सुमारे १५५ शेतकऱ्यांना आपल्या जिवाचे बलिदान द्यावे लागले. तरीसुद्धा केंद्र सरकार उद्दामपणे वागत असून, शेतकऱ्यांचा आक्रोश दुर्लक्षित करीत आहे. काँग्रेस पक्ष नेहमी शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहिला आहे. दिल्ली येथील शेतकऱ्यांच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी मोर्चाचे आयोजन करून केंद्र सरकारने त्वरित शेतकरी विरोधातील तिन्ही कायदे मागे घ्यावेत आदी मागण्यासह सावलीचे तहसीलदार यांच्या मार्फत पंतप्रधान यांना निवेदन देण्यात आले.