शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

सरपंचाच्या मुलाच्या खांद्यावर आली पुन्हा विरोधी पक्ष नेतेपदाची धुरा

By राजेश भोजेकर | Updated: August 4, 2023 12:15 IST

करंजी ते व्हाया गडचिरोली, चिमूर, ब्रह्मपुरी खडतर प्रवास

राजेश भोजेकर

चंद्रपूर : माजी मंत्री, ब्रह्मपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार यांची दुसऱ्यांदा महाराष्ट्र विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी लागल्याने दिग्गजांच्या मांदियाळीत चंद्रपूर जिल्हा उठून दिसणार आहे. सरपंचाच्या मुलाच्या खांद्यावर पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या विरोधी पक्षनेतेपदाची धुरा आल्याने या पदाने चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाला नक्कीच गती मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

विदर्भातून सध्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षही येतात. याच विदर्भाकडे विरोधी पक्षनेतेपद देऊन पक्षाचा बालेकिल्ला अधिक मजबूत करतानाचा भाजपला मात देण्याची काँग्रेसची रणनीती असल्याचे मानले जात आहे. चंद्रपूर जिल्ह्याला विकासाच्या दृष्टीने याचा मोठा फायदा होईल, अशी चंद्रपूरकरांची अपेक्षा आहे. वडेट्टीवार यांच्या संघर्ष थक्क करणारा असाच आहे.

विजय नामदेवराव वडेट्टीवार यांचा जन्म गोंडपिपरी तालुक्यातील करंजी गावात झाला. त्यांचे वडील करंजीचे दहा वर्षे सरपंच होते. चौथ्या वर्गात असतानाच वडिलांचे छत्र हरपले. सातवीपर्यंत गोंडपिपरीत शिक्षण घेतले. मोठ्या भावाला व्यसन जडल्याने परिस्थिती बेताची होती. आईला गावची शेती विकावी लागली. वाट खडतर होती. कसेबसे बी.ए. प्रथम वर्षापर्यंत शिक्षण घेतले. अशातच युवक चळवळीशी संबंध आला. बेरोजगारांची संघटना उभारली. टायपिस्टची परीक्षा उत्तीर्ण केल्यामुळे तुलतुली प्रकल्प कार्यालयात नोकरी पत्करली. यातूनच प्रशासनातील अनुभव येत होता. बाकी परिस्थितीने शिकविले.

आदिवासींच्या जागा निघाल्या की मुंबईसह अन्य शहरी भागातील बोगस आदिवासी त्या जागा बळकवायचे. वृत्तपत्रात आलेल्या नोकरीच्या जाहिराती बरोजगारांपर्यंत पोहचवायचे काम केले. अशातच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या कोनाकोपऱ्यात शिवसेनेचे जाळे पसरविणे सुरू केले. तरुणांना त्यांचे आकर्षण होते. १९८८ मध्ये ते शिवसेनेचे पहिले गडचिरोली शहर प्रमुख झाले. अवघ्या दोन वर्षांत जिल्हाप्रमुख, १९९० मध्ये तब्बल ५१३ ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा फडकविला. १९९५ मध्ये शिवसेनेचा एक आमदार निवडून आणला. राज्यात शिवसेना-भाजप सत्ता आली. लगेच बाळासाहेबांनी मुंबईत बोलावून घेतले. राज्यमंत्र्यांच्या दर्जाच्या वनविकास महामंडळाच्या अध्यक्षपदी विजय वडेट्टीवार यांची वर्णी लागली. यानंतर वडेट्टीवार यांनी कधीही मागे वळून बघितले नाही. वडेट्टीवारांपुढे स्वपक्षातील आव्हानांचा सामना करताना जिल्ह्यातील प्रश्नांना वाचा फोडण्याचे मोठे आव्हान आहे.

चंद्रपूर जिल्ह्याच्या अपेक्षा

विरोधी पक्ष नेतेपदी निवड झाल्यानंतर पहिल्याच दिवशी त्यांनी तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या मजुरांचा मुद्दा उपस्थित केला. गोरगरीब जनतेच्या वेदना मांडल्या, शेतकरी, कष्टकरी, ओबीसी, दलित, आदिवासी व सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी ही संधी असल्याचे सांगितले. जमिनीवर पाय असलेल्या या नेत्यांकडून चंद्रपूर जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प, उद्योग, बेरोजगारांचा प्रश्न, ओबीसींचे प्रश्न मार्गी लागेल, अशी अपेक्षा आहे.

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारchandrapur-acचंद्रपूरcongressकाँग्रेस