शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
4
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
5
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
6
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
7
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
8
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
9
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
10
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
11
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
12
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
13
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
14
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
15
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
16
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
17
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
18
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
19
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
Daily Top 2Weekly Top 5

तर टळली असती काँग्रेसची घसरण

By admin | Updated: October 25, 2014 01:08 IST

चंद्रपूर जिल्ह्यातील विधानसभेच्या सहा जागांंवरील निकाल काँग्रेसला आत्मपरीक्षण करायला लावणारा ठरला आहे. ..

गोपालकृष्ण मांडवकर चंद्रपूरचंद्रपूर जिल्ह्यातील विधानसभेच्या सहा जागांंवरील निकाल काँग्रेसला आत्मपरीक्षण करायला लावणारा ठरला आहे. गेल्या २००९ च्या निवडणुकीत जिल्ह्यात सहापैकी तीन जागा या पक्षाकडे होत्या. यावेळी केवळ एकमेव जागा राखण्यात पक्षाला यश आल्याने जिल्ह्यातील यशापयशावर मंथन करण्याची पाळी काँग्रेसजनांवर आली आहे.राजुरा विधानसभा मतदार संघातील जागा सुभाष धोटे सहज काढतील, असा विश्वास सर्वांनाच होता. खुद्द उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्तेही आधीपासून विजयाची हमी बाळगून होते. पक्षानेही ही जागा गृहित धरल्यासाखीच होती. नेमका घात येथेच झाला. शत्रू कितीही दुबळा असला तरी त्याला बलवानच समजले पाहिजे, असे राजनिती सांगत असतानाही याकडे दुर्लक्ष झाले. भाजपाचे संजय धोटे यांची ताकद गृहित धरण्यापेक्षा राष्ट्रवादीच्या उमेदवारावर लक्ष ठेवण्यातच शक्ती खर्ची झाली. राष्ट्रवादीच्या मतविभाजनाचा फटका बसला. ज्या गडचांदुरात नगरपालिका मिळाली, त्या शहरातून आणि खुद्द राजुरातील काही बुथवरून घसरण झाली. अवघ्या दोन हजार २७८ मतांनी पराभव बघावा लागला. सहज निवडून येण्यासारखी स्थिती असतानाही अखेरच्या क्षणी झालेल्या बेफिकीरीने काँंग्रेसला ही हातची जागा गमवावी लागली.चिमुरात अविनाश वारजुकर यांचे नाव संभाव्य विजेत्यांमध्ये चर्चेत घेतले जायचे. वारजुकरांसाठी चिमुरात वातावरण चांगले होते. विजय वडेट्टीवारांनी गेल्या १० वर्षात तयार केलेल्या प्लॅटफार्मवर खुद्द अविनाश वारजुकर आणि त्यांचे बंधु सतीश वारजुकर यांचेही काम गेल्या दोन वर्षांपासून सुरूच होते. निवडणुकीच्या काळातही स्थिती वाईट नव्हती. भाजपामध्ये बंडखोरी होती. काही गठ्ठा मतदार भाजपाच्या विरोधात उभा ठाकू पहात असताना ही स्थिती कॅश करण्यात अविनाश वारजुकर कमी पडले, हे मान्य करावेच लागेल. पक्षाने या मतदारसंघात किती लक्ष घातले, हेसुद्धा लक्षात घेण्यासारखे आहे. पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांची मतदार संघालगतची सभा वगळली तर, कुणीही बडा नेता फिरकला नाही. वारजुकरांच्या एकहाती लढाईला विजय वडेट्टीवारांनी काही प्रमाणात बळ देण्याचा प्रयत्न केला असला तरी, हे प्रयत्न तोकडे पडले. परिणामत: ८७ हजार ३७७ मते मिळवून भाजपाचे कीर्तीकुमार भांगडिया २५ हजार १५५ मताधिक्याने विजयी झाले.बल्लारपुरात पक्षाने दिलेला उमेदवार नवखा नसला तरी, विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात मात्र हा चेहरा नवा होता. अन्य नावांची चर्चा सुरू असताना अनपेक्षितपणे घनश्याम मुलचंदानी यांचे नाव आले. ऐनवेळी बॅनर बनविण्यापासून त्यांना जुळवाजुळव करावी लागली. माजी खासदार नरेश पुगलिया यांनी त्यांच्या पाठीशी ताकद उभी केली असली तरी, लढाई सुधीर मुनगंटीवार यांच्यासारख्या बलाढ्य उमेदवाराशी होती. मतदार संघातील एकूण चर्चा आणि वातावरण लक्षात घेता, मुलचंदानी चांगली टक्कर देतील, असे वाटले होते. मात्र मुनगंटीवारांचे मताधिक्य तोडता आले नाही. चंद्रपुरात मात्र काँग्रेसची स्थिती वाईट राहिली. अन्य स्थानिक पर्याय असतानाही महेश मेंढे या नवख्या चेहऱ्याला उमेदवारी देण्यात आली. भाजपा आणि शिवसेनेच्या उमेदवारांशी टक्कर देण्यात ते मागे पडले. स्थानिक पक्षनेत्यांची ताकदही कामी आली नाही. परिणामत: उमेदवार तिसऱ्या स्थानावर राहिला.विजय वडेट्टीवारांनी मात्र एकहाती लढा दिला. अखेरच्या दिवसांपर्यंत ते मैदानात पाय रोवून होते. स्थानिक पातळीवर पक्षातंर्गत विरोध असतानाही आपले राजकीय कौशल्य वापरत त्यांनी भाजपाचे अतुल देशकर यांचा १३ हजार ६१० मतांनी पराभव केला. जिल्ह्यात किमान तीन जागा काँग्रेस राखेल, अशी हवा अगदी निवडणुकीच्या तीन दिवसांआधी होती. मात्र फाजील आत्मविश्वासात बुडालेल्या नेत्यांना अखेर मोदी वादळाचा तडाखा बसलाच.