शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३१ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
3
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
4
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
5
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
6
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
7
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
8
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
9
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
10
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
11
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
12
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
13
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
14
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
15
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
16
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
17
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
18
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
19
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
20
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'

कविसंमेलनाने झाला साहित्य संमेलनाचा समारोप

By admin | Updated: February 16, 2015 01:13 IST

मराठी भाषा मरणासन्न झाली नाही. तिची वैचारिक बांधीलकी मोठी व व्यापक आहे. तिचा विस्तार करण्याची गरज आहे.

बल्लारपूर : मराठी भाषा मरणासन्न झाली नाही. तिची वैचारिक बांधीलकी मोठी व व्यापक आहे. तिचा विस्तार करण्याची गरज आहे. साहित्यकांनी भाषेला केंद्रस्थानी माणून नवोदितांना प्रेरणा देण्यासाठी मराठी भाषेचा अभिमान बाळगणारी करा, असा सल्ला चंद्रपूर जिल्हा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. राजन जयस्वाल यांनी दिला.चंद्रपूर येथील सूर्यांश साहित्य व संस्कृती मंचच्या वतीने जिल्हा साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले. रविवारी समारोपीय कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. दरम्यान ना.गो. थुटे यांच्या अध्यक्षतेखाली समारोपीय कवी संमेलन घेण्यात आले.याप्रसंगी माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री शांताराम पोटदुखे, लेखक श्रीपाद जोशी, जिल्हा साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष व महानगरपालिका सदस्य संजय वैद्य यांची उपस्थिती होती. यावेळी डॉ. राजन जयस्वाल यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.डॉ. जयस्वाल म्हणाले, साहित्यिकांचे क्षेत्र विस्तारले आहे. प्रवाहित झाले आहे. एखादी कथा आवडणार नाही. पण व्यंग चित्र बोलकी वाटतात. तोही साहित्याचा प्रकार आहे. विविध क्षेत्रात व्यासंग जोपासणारे एक प्रकारे साहित्यिकच आहेत. त्यांचे योगदानही या क्षेत्राला मिळत आहे. मनातील खदखद व्यक्त करणारे लेखक चंद्रपूर जिल्ह्यात आहेत. त्यांच्यासाठी जिल्हा साहित्य संमेलन पर्वणी ठरले आहे. चंद्रपूर जिल्ह्याने साहित्य संमेलनाचे मंगलमय तोरण बांधले आहे. वाङमयीन क्षेत्राचे यातून सिंहावलोकन करून वाटचाल सुरू केली. आता थांबायचे नाही. पुढे वाटचाल करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.जिल्हा स्तरावरचे साहित्य संमेलन असले तरी दोन दिवसात उर्जा मिळाली. उगवणाऱ्या अंकुराला फुलण्याची संधी मिळाली. परिसंवादातून विचारमंथन घडले. प्रबोधनाचे कार्य झाले. कविंचा रोख कवित्वापेक्षा मोठा दिसला. भाषेसाठी जगण्याची प्रेरणा साहित्य संमेलनाने दिल्याचा आशावादही डॉ. जयस्वाल यांनी व्यक्त केला. याप्रसंगी शांताराम पोटदुखे यांनी जेष्ठ साहित्यिक राम शेवाळकर यांच्या चंद्रपूर शहरातील साहित्य योगदानाबद्दल आठवण करून ते आज आपल्यात नसल्याबाबत खंत व्यक्त केली.समारोपीय कार्यक्रमादरम्यान कवि संमेलनाच्या माध्यमातून किशोर कवठे, अविनाश पोईनकर, डॉ. विजय सोरते, चित्रलेखा धंदरे, नरेश बोरीकर, बंशी कोठेकर, संगीता धोटे, बापुराव टोंगे, पदमरेखा वानखेडे, खुशालदास कामडी यांच्यासह अन्य कविनीं आपआपल्या लेखनीतून साकारलेल्या दर्जेदार व मार्मिक कविता सादर करून उपस्थितांचे मने जिंकली. यावेळी मोठ्या संख्येने जिल्ह्यातील साहित्यिक, विद्यार्थी उपस्तित होते. (शहर प्रतिनिधी)