शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

मराठी चित्रपटांच्या यशाबाबत चिंताच !

By admin | Updated: April 27, 2016 01:01 IST

मराठीत चांगले आशयदान चित्रपट निघत आहेत. त्यांचे सर्वत्र कौतुक होऊन त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारही मिळत आहेत.

अरुण नलावडे : मुलाखतीत व्यक्त केली मराठी चित्रपटांची व्यथावसंत खेडेकर बल्लारपूरमराठीत चांगले आशयदान चित्रपट निघत आहेत. त्यांचे सर्वत्र कौतुक होऊन त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारही मिळत आहेत. आॅस्करपर्यंत त्यांनी धडक मारली आहे. हे सारे कौतुकास्पद आणि मराठी माणसांची छाती फुलावी, असे असले तरी त्यातील किती चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहचतात आणि ते थिएटरात लागले तरी कितीजण बघतात हा चिंतेचा विषय आहे. आशयघनासोबत मराठी चित्रपटांची संख्याही वाढली. पण त्यांना आर्थिक यश मिळत नसेल. प्रेक्षकांपर्यंत ते पोहचत नसेल तर काय उपयोग, असा विचार लावणारा प्रश्न प्रसिद्ध निर्माता, निर्देशक आणि नट अरुण नलावडे यांचा आहे.अरुण नलावडे यांच्या दिग्दर्शनात ‘ताटवा’ हा चित्रपट बनत आहे. त्यात त्यांची प्रमुख भूमिका आहे. या चित्रपटाचे ९० टक्के चित्रीकरण चंद्रपूर जिल्ह्यातील नवरगाव येथे तब्बल २० दिवस चालले. नलावडे यांचा या दरम्यान नवरगावलाच मुक्काम होता. ‘लोकमत’ने तेथे त्यांची मुलाखत घेतली. त्याप्रसंगी त्यांनी मराठी चित्रपटांबाबत वरील शब्दात चिंता व्यक्त केली. आपले भाषेवर प्रेम करण्याकरिता मराठी माणूस बराच मागे आहे. दक्षिण भारतात याहून वेगळे चित्र आहे. तेथील प्रेक्षक आपल्या मातृभाषेतील चित्रपट उचलून धरतात. त्यामुळे, तिकडील निर्माता व दिग्दर्शकांना आपला चित्रपट चालणारच अशी हमी असते. या विश्वासानेच ते चित्रपटांवर मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवितात. मराठीत तशी शाश्वती नाही.चित्रपट चालणार का, त्याला थिएटर मिळणार का, ही चिंता मराठी चित्रपटांच्या निर्मात्यांना लागलेली असते, असे सांगत नलावडे यांनी निर्माण केलेल्या व त्यात त्यांची आजोबाची भूमिका असलेल्या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ‘श्वास’ ला पडद्यावर झळकविण्याकरिता कसे कष्ट घ्यावे लागले, याबाबत सांगितले. ‘श्वास’ हा वेगळ्या विषयाचा चित्रपट तयार झाला. पण त्याला कुणीच वितरक मिळेना. हा काय चित्रपट आहे? असे म्हणत तो घ्यायला सारेच नकार देऊ लागले. शेवटी आम्ही प्रोजेक्टरची व्यवस्था करुन गावोगावी फिरुन लोकांना वेगवेगळ्या क्तृप्त्यांनी जमवून त्यांना हा चित्रपट मोफत दाखवू लागलो. लोकांना तो आवडला. तोंडातोंडी त्याची प्रसिद्धी झाली. मग, थिएटरवाले त्याला थिएटरात लावायला तयार झाले. पुढे काय झाले हे आपण सारेजण जाणतातच! नलावडे हे मूळचे कोकणचे! सध्या एका मालिकेतून कोकणातील लोकांचा भूत पिशाच्यावर भयंकर विश्वास आह,े असे दाखविले जात आहे. यावर बोलताना ते म्हणाले, कोकणात ग्रामीण भागात तशी स्थिती आहे. पण, आता जागरुकता येऊन चित्र बदलत चालले आहे. नलावडे यांचे ४० वर्षापूर्वी रंगभूमीवर डॉ. श्रीराम लागू यांच्यासोबत पदार्पण झाले होते. अग्निपंथ या नाटकातील त्यांची भूमिका गाजली. श्वास हा त्यांचा पहिला चित्रपट, विदर्भात तयार झालेल्या ‘तानी’ या चित्रपटात त्यांनी महत्वपूर्ण भूमिका केली होती. का रे दुरावा या मालिकेतील त्यांचा केतकर काका प्रेक्षकांना खूप आवडला. नागपूरचे प्रसिद्ध समजासेवी, विमल आश्रमात वेश्यांच्या मुलांना संस्कारित करीत असलेल्या रामभाऊ इंगोले यांच्या कार्यावर ‘वारसा‘ हा चित्रपट ते बनवित आहेत. त्यात ते रामभाऊचे पात्र करीत आहेत. संपूर्ण चित्रीकरण नागपुरातच होणार आहे. हे ऐकून आपले विदर्भावर बरेच प्रेम दिसते, असे विचारता ‘हो’ असे हसत म्हणाले. आपणाला कोणत्याही प्रकारची भूमिका करणे आवडते. खलनायकसुद्धा. असे सांगत कलाकाराने चौकटीत बंदिस्त राहू नये, असे मत त्यांनी व्यक्त केले.