शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
ट्रम्प यांनी दंड थोपटले! अमेरिकेच्या तीन युद्ध नौका व्हेनेझुएलाच्या दिशेने रवाना; ४००० सैन्यही सज्ज
3
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
4
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
5
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
6
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
7
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
8
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
9
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
10
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
11
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
12
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
13
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
14
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
15
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
16
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
17
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
18
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
19
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
20
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा

आंतरराज्यीय निम्न पैनगंगा सिंचन प्रकल्प कोमात

By admin | Updated: December 17, 2015 01:14 IST

औद्योगिकरण वाढत आहे, तरीही शेती व्यवसाय तग धरून आहे. शेतीच्या व्यवसायातून देशभरात ६४ टक्के रोजगार निर्मिती होत आहे.

शेतकऱ्यांची व्यथा : सरकारची उदासीनता, दोन लाख हेक्टरवर होणार होती सिंचनाची सुविधाअनेकश्वर मेश्राम बल्लारपूर औद्योगिकरण वाढत आहे, तरीही शेती व्यवसाय तग धरून आहे. शेतीच्या व्यवसायातून देशभरात ६४ टक्के रोजगार निर्मिती होत आहे. ग्रामीण अर्थ व्यवस्थाच शेतीवर अवलंबून असल्याने शेती व्यवसायाला बळकट करण्यासाठी निम्न पैनगंगा सिंचन प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली. या प्रकल्पाद्वारे चंद्रपूर, यवतमाळ व तेलंगाणा राज्यातील दोन लाख २७ हजार २७१ हेक्टर जमीन ओलीताखाली येणार आहे. मात्र सरकारच्या उदासीनतेमुळे निम्न पैनगंगा हा आंतरराज्यीय सिंचन प्रकल्पच कोमात गेला आहे.महाराष्ट्र राज्यातील चंद्रपूर व यवतमाळ जिल्हा आणि तेलंगाणा राज्यातील आदिलाबाद जिल्ह्यासाठी निम्न पैनगंगा सिंचन प्रकल्प वरदान ठरणारा आहे. गोदावरी पाणी तंटा लवादानुसार प्रस्तावित धरण केवळ दोन किलोमीटर लांबीचे आहे. या आंतरराज्यीय महत्त्वाकांक्षी सिंचन प्रकल्पामुळे या भागातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. त्याचप्रमाणे शेती व्यवसायासह औद्योगिकीकरण, मत्स्यव्यवसाय, पर्यटन व दळणवळणासाठी उपयुक्त विकासासाठी मोलाचा हातभार लागणार आहे. यामुळे वाढत्या बेरोजगारीवर काही प्रमाणात नियंत्रण येणार आहे. या प्रकल्पाची निर्मिती झाल्यास ११६४.३० दलघमी पाणी वापरण्यास मिळणार असल्याने हरितक्रांतीला पोषक ठरणारे आहे.महाराष्ट्र सरकारने निम्न पैनगंगा सिंचन प्रकल्पाला २६ जून १९९७ प्रशासकीय मान्यता दिली. त्यावेळी १४०२.४३ कोटी रुपये खर्चाला सुद्धा संमती देण्यात आली होती. त्यानंतर विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने १४ आॅगस्ट २००९ मध्ये सुधारित दराप्रमाणे १०४२९.३९ कोटी रुपये खर्चाच्या अंदाजपत्रकाला मान्यता प्रदान केली. मात्र आजतागायत निम्न पैनगंगा सिंचन प्रकल्पाचे घोडे जागेवरच अडले आहे. सरकारच्या अनास्थेमुळे महत्त्वाकांक्षी सिंचन प्रकल्पच कोमात गेल्यागत आहे.निम्न पैनगंगा सिंचन प्रकल्प निर्माण झाल्यास यवतमाळ जिल्ह्यातील १ लाख ४१ हजार ६०७ हेक्टर क्षेत्र, चंद्रपूर जिल्ह्यातील ५८ हजार ३५५ हेक्टर क्षेत्र तर तेलंगाणा राज्यातील आदिलाबाद जिल्ह्यातील २७ हजार ३०९ हेक्टर क्षेत्र असे एकूण दोन लाख २७ हजार २७१ हेक्टर क्षेत्रातील शेती योग्य जमीन ओलिताखाली आणण्याचे उद्दिष्ट आहे. यातून शेतकऱ्यांना सुजलाम-सुफलाम करण्यास या प्रकल्प महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहे. प्रकल्प कार्यान्वित करण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र व आंध्र प्रदेश (तेलंगणा) दोन राज्यात आंतरराज्यीय करार करण्यात आला आहे. त्याप्रमाणे त्या त्या राज्यातील सचिव स्तरावरुन ८८:१२ या प्रमाणात प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी खर्च केला जाणार आहे. मात्र सध्या कोणत्याही हालचाली झालेल्या नाही. त्यामुळे या प्रकल्पाचे काम रेंगाळलेलेच आहे.