शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

संगणक परिचालकांचे कामबंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 00:32 IST

गेल्या सहा महिन्यांपासून मानधन रखडल्याने उपासमारीची वेळ आली असून, राज्यातील ग्रामपंचायत स्थरावरील सर्व संगणक परिचालकांचे २५ सप्टेंबरपासून विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू असल्याने ग्रामपंचायतींच्या आॅनलाइन सुविधा व कामकाज ठप्प झाले आहे.

वडनेर : गेल्या सहा महिन्यांपासून मानधन रखडल्याने उपासमारीची वेळ आली असून, राज्यातील ग्रामपंचायत स्थरावरील सर्व संगणक परिचालकांचे २५ सप्टेंबरपासून विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू असल्याने ग्रामपंचायतींच्या आॅनलाइन सुविधा व कामकाज ठप्प झाले आहे.  ग्रामपंचायतींच्या कामकाजात पारदर्शकता व सुसूत्रता आणण्यासाठी शासनाने महाआॅनलाइन कंपनीशी २०११ मध्ये करार करून प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये संग्राम प्रकल्पात एक संगणक परिचालक असे राज्यात २७ हजार संगणक परिचालकांची नियुक्ती केली. त्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायती असे तीन स्थरात विभागणी कारण्यात आली होती; परंतु २०१५ साली शासनाने महाआॅनलाइन कंपनीशी केलेला करार संपुष्टात आल्याने राज्यातील २७ हजार संगणक परिचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे.  राज्य संगणक परिचालक संघटनेने राज्यात अधिवेशनाच्या काळात ठिकठिकाणी आंदोलने केली. शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीत आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करून त्यात ‘संग्राम’मधील संगणक परिचालकांचाच केंद्र ाालक म्हणून समावेश करण्यात आला तसेच मासिक ६ हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला; परंतु प्रत्यक्षात सहा ते सात महिने काम करुनही मानधनाची रक्कम मिळालेली नाही. टास्क कन्फर्मेशेनची जाचक अट लावल्याने केंद्रचालकांना मानधनापासून वंचित रहावे लागत आहे. छत्रपती शिवाजी महाराज सन्मान कर्जमाफी योजनेचे अर्ज रात्रंदिवस केंद्रचालकांनी विनामोबदला भरून दिले. टास्क कन्फर्मेशनची अट रद्द करून निर्णयाप्रमाणे ६ हजार इतके मानधन प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला मिळावे, संग्राममधील राहिलेले परिचालकाना आपले सरकारमध्ये सामावून घ्यावे, कपात केलेले मानधन अदा करावे, थकीत मानधन अदा करणे आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. संघटनेतर्फे गटविकास अधिकारी आनंदराव पिंगळे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष नितीन खोमणे, उपाध्यक्ष भूषण बागुल, सचिव दुर्गेश बच्छाव, सुनील पाटील, मिलिंद खडताळे, प्रमोद बोरसे, अशपाक मन्सुरी, नरेंद्र अहिरे, जयराम सोनवणे आदीसह केंद्र चालक उपस्थित होते.टास्क कन्फर्मेशनची अट रद्द करण्याची मागणीमासिक ६ हजार मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला; परंतु प्रत्यक्षात सहा ते सात महिने काम करूनही मानधन मिळालेले नाही. टास्क कन्फर्मेशेनची जाचक अट लावल्याने केंद्रचालकांना मानधनापासून वंचित रहावे लागत आहे. मालेगाव टास्क कन्फर्मेशनची अट रद्द करून शासन निर्णयाप्रमाणे निश्चित केलेले ६ हजार इतके मानधन प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला मिळावे, संग्राममधील परिचालकांना आपले सरकारमध्ये सामावून घ्यावे, कपात केलेले मानधन अदा करावे, थकीत मानधन अदा करणे आदी मागण्यांचे निवेदन परिचालक संघटनेतर्फे गटविकास अधिकारी आनंद पिंगळे यांना सादर करण्यात आले.