शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

जिल्हा बंदला संमिश्र प्रतिसाद

By admin | Updated: May 27, 2015 01:21 IST

केंद्रात मोदी सरकार स्थापनेला २६ मे रोजी वर्षपूर्ती झाली. मात्र मोदी सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्याने व जनविरोधी धोरणाने ...

चंद्रपूर : केंद्रात मोदी सरकार स्थापनेला २६ मे रोजी वर्षपूर्ती झाली. मात्र मोदी सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्याने व जनविरोधी धोरणाने त्रस्त जनतेच्या समस्या मांडण्यासाठी मंगळवारी जिल्हा काँग्रेसतर्फे जिल्हा बंदचे आयोजन केले होते. या बंदला जिल्ह्यात समिश्र प्रतिसाद मिळाला. तर काही ठिकाणी धरणे आंदोलन करून भाजप सरकारचा निषेध करण्यात आला. चंद्रपूर येथे नंदू नागरकर यांच्या नेतृत्वातील काँग्रेस गटाने ‘अच्छे दिनची पहिली पुण्यतिथी’ साजरी केली. त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्याना निवेदन पाठविण्यात आले. यावेळी आमदार विजय वडेट्टीवार, नंदू नागरकर, ग्रामीण जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश देवतळे, विनायक बांगडे, सुभाषसिंह गौर, सुनिता लोढीया, अ‍ॅड. विजय मोगरे, अश्विनी खोब्रागडे, नंदा अल्लूरवार, महेश मेंढे यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.तर नरेश पुगलिया गटाने जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या चालु सत्रात सुरू करावे या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांठी धरणे आंदोलन व जिल्हा बंद आंदोलन केले. आंदोलनात ज्येष्ठ नेते नरेश पुगलिया यांच्यासह चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष गजानन गावंडे, युवक काँग्रेसचे महासचिव राहूल पुगलिया, जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासचिव अ‍ॅड. अविनाश ठावरी, मजदूर काँग्रेसचे अध्यक्ष चंद्रशेखर पोडे, एनएसयुआय अध्यक्ष स्वप्नील तिवारी, प्रा. प्रमोद राखुंडे, मनपा गटनेते प्रशांत दानव, अ‍ॅड. शिल्पा आंबेकर आदी सहभागी झाले होते. राजुरा : राजुरा शहरात बंद आणि धरणे आंदोलन करण्यात आले. माजी खासदार नरेश पुगलिया यांचे कार्यकर्ते शहरात फिरुन बंद यशस्वी केले तर राजुरा क्लबजवळ माजी आमदार सुभाष धोटे, माजी आमदार प्रभाकरराव मामुलकर, तालुका काँग्रेस कमिट अध्यक्ष दादा पाटील लांडे, न.प. उपाध्यक्ष अरुण धोटे यांच्या उपस्थितीत निषेध सभा झाली. शासन विरोधात घोषणा देऊन राजुऱ्यातील झोपडपट्टीवासीयांना जागा द्यावी अशी मागणी करण्यात आली. याप्रसंगी साईनाथ बुचे, अ‍ॅड. अरुण धोटे, जि.प. सदस्य अविनाश जाधव, राधा आत्राम, कल्पना सातपुते, भूविंदरसिंग घोतरा, सुधाकर लांडे, क्रिष्णा खामनकर, साधु जयस्वाल, कामगार सचिव अजय मानवटकर, संगिता गोगुलवार, उषा सिडाम, सपना खामनकर, फातिमा शेख, अनिता मरस्कोले यांच्यासह शेकडो काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. ब्रह्मपुरी : जिल्ह्यातील विविध मागण्या संदर्भात स्थानिक शिवाजी चौक येथे धरणे आंदोलन करण्यात आले. मजूर काँग्रेसतर्फे आयोजित आंदोलनात गौरव पेपर मिलचे मजदूर मोठ्या संख्येने उपस्थित होते. धरणे आंदोलनात संजय हटवार, एच.एन. सिंह, श्रीकांत राय, बी.आर.पाटील, सोमेश्वर उपासे, किशोर जवादे, विजय तुमाणे, शालीक सहारे, सुखदेव सेलोटे, दर्शन नाकतोडे, योगीराज पारधी, दिलीप अंबादे, सुधाकर उपरे, उमेश खरकाटे, नानाजी तलमले यांचा समावेश होता. सावली : भाजप सरकारच्या निषेधार्थ सावली येथील काँग्रेस कमिटी सावलीच्या वतीने बंद पाळण्यात आला. तहसील कार्यालयासमोर काँग्रेस कमिटीचे कार्यकर्ता उत्तम गेडाम यांच्या नेतृत्त्वात धरणे आंदोलन करण्यात आला. तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी बबन वाढई, मनोहर नन्नेवार, बबन वाढई यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.भद्रावती : जिल्ह्यातील विविध मागण्यांसाठी भद्रावती काँग्रेस कमिटीने तहसीलदारामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले. भद्रावतीकरांनी बंदला अल्प प्रतिसाद देत प्रतिष्ठाणे बंद ठेवली होती. गांधी चौक येथील काँग्रेस कार्यालयापासून ते तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. यावेळी डॉ. विजय देवतळे, धनंजय गुंडावार, प्रकाश दास, संजय दुबे, शामसुंदर पोडे, दिलीप ठेंगे, दिलीप मांढरे, धर्मराज गायकवाड, अजित चौधधरी, शेखर नक्षिणे, सुधाकर आत्राम, प्रेमदास पाटील आस्वले, जितेंद्र माहुरे, भगतसिंग मालुसरे, शंकर बोरघरे, साहेबराव ठाकरे, बंडू डोये, दीपक घोडमारे, पुष्पाताई ताटेवार, निर्मला कापकर, वंदना पेंदाम, अर्चना आरेकर आदी उपस्थित होते.बल्लारपूर : येथे बंद पाळून धरणे आंदोलन करण्यात आले. येथील बंदला व्यापारी वर्गाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी प्रभारी तहसीलदार विकास अहीर यांना जिल्ह्यासह तालुक्याच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी तालुका काँग्रेस अध्यक्ष घनश्याम मुलचंदानी, नगराध्यक्ष छाया मडावी, गटनेता देवंद्र आर्य, वसंत मांढरे, नगरसेवक नासीर खान, जि.प. सदस्य रामभाऊ टोंगे, पं.स. उपसभापती अनकेश्वर मेश्राम, हरिश शेडाम, रजनी मुलचंदानी, डॉ. मधूकर बावणे, छबु मेश्राम, टी. पद्माराव, ईस्माईल ढाकवाला, विनोद आत्राम, नरसिंग रेब्बावार, अनिल खरतड, बंडू गौरकार, जयकरण बजगोती, अशोक खाडीलकर, आर.आर. यादव, भुपाल बोरकर, मल्लेश कोडारी, अ‍ॅड. मेघा भाले, अ‍ॅड. पवनमेश्राम, मयुर परसुटकर, राजू मारमवार, नावेद खान यांचा समावेश होता. (लोकमत चमू)