शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
2
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
3
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
4
"माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
5
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
6
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
7
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
8
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
9
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
10
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
11
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
12
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
13
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
15
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
16
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
17
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
18
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
19
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
20
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बंदला संमिश्र प्रतिसाद

By admin | Updated: May 27, 2015 01:21 IST

केंद्रात मोदी सरकार स्थापनेला २६ मे रोजी वर्षपूर्ती झाली. मात्र मोदी सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्याने व जनविरोधी धोरणाने ...

चंद्रपूर : केंद्रात मोदी सरकार स्थापनेला २६ मे रोजी वर्षपूर्ती झाली. मात्र मोदी सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्याने व जनविरोधी धोरणाने त्रस्त जनतेच्या समस्या मांडण्यासाठी मंगळवारी जिल्हा काँग्रेसतर्फे जिल्हा बंदचे आयोजन केले होते. या बंदला जिल्ह्यात समिश्र प्रतिसाद मिळाला. तर काही ठिकाणी धरणे आंदोलन करून भाजप सरकारचा निषेध करण्यात आला. चंद्रपूर येथे नंदू नागरकर यांच्या नेतृत्वातील काँग्रेस गटाने ‘अच्छे दिनची पहिली पुण्यतिथी’ साजरी केली. त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्याना निवेदन पाठविण्यात आले. यावेळी आमदार विजय वडेट्टीवार, नंदू नागरकर, ग्रामीण जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश देवतळे, विनायक बांगडे, सुभाषसिंह गौर, सुनिता लोढीया, अ‍ॅड. विजय मोगरे, अश्विनी खोब्रागडे, नंदा अल्लूरवार, महेश मेंढे यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.तर नरेश पुगलिया गटाने जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या चालु सत्रात सुरू करावे या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांठी धरणे आंदोलन व जिल्हा बंद आंदोलन केले. आंदोलनात ज्येष्ठ नेते नरेश पुगलिया यांच्यासह चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष गजानन गावंडे, युवक काँग्रेसचे महासचिव राहूल पुगलिया, जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासचिव अ‍ॅड. अविनाश ठावरी, मजदूर काँग्रेसचे अध्यक्ष चंद्रशेखर पोडे, एनएसयुआय अध्यक्ष स्वप्नील तिवारी, प्रा. प्रमोद राखुंडे, मनपा गटनेते प्रशांत दानव, अ‍ॅड. शिल्पा आंबेकर आदी सहभागी झाले होते. राजुरा : राजुरा शहरात बंद आणि धरणे आंदोलन करण्यात आले. माजी खासदार नरेश पुगलिया यांचे कार्यकर्ते शहरात फिरुन बंद यशस्वी केले तर राजुरा क्लबजवळ माजी आमदार सुभाष धोटे, माजी आमदार प्रभाकरराव मामुलकर, तालुका काँग्रेस कमिट अध्यक्ष दादा पाटील लांडे, न.प. उपाध्यक्ष अरुण धोटे यांच्या उपस्थितीत निषेध सभा झाली. शासन विरोधात घोषणा देऊन राजुऱ्यातील झोपडपट्टीवासीयांना जागा द्यावी अशी मागणी करण्यात आली. याप्रसंगी साईनाथ बुचे, अ‍ॅड. अरुण धोटे, जि.प. सदस्य अविनाश जाधव, राधा आत्राम, कल्पना सातपुते, भूविंदरसिंग घोतरा, सुधाकर लांडे, क्रिष्णा खामनकर, साधु जयस्वाल, कामगार सचिव अजय मानवटकर, संगिता गोगुलवार, उषा सिडाम, सपना खामनकर, फातिमा शेख, अनिता मरस्कोले यांच्यासह शेकडो काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. ब्रह्मपुरी : जिल्ह्यातील विविध मागण्या संदर्भात स्थानिक शिवाजी चौक येथे धरणे आंदोलन करण्यात आले. मजूर काँग्रेसतर्फे आयोजित आंदोलनात गौरव पेपर मिलचे मजदूर मोठ्या संख्येने उपस्थित होते. धरणे आंदोलनात संजय हटवार, एच.एन. सिंह, श्रीकांत राय, बी.आर.पाटील, सोमेश्वर उपासे, किशोर जवादे, विजय तुमाणे, शालीक सहारे, सुखदेव सेलोटे, दर्शन नाकतोडे, योगीराज पारधी, दिलीप अंबादे, सुधाकर उपरे, उमेश खरकाटे, नानाजी तलमले यांचा समावेश होता. सावली : भाजप सरकारच्या निषेधार्थ सावली येथील काँग्रेस कमिटी सावलीच्या वतीने बंद पाळण्यात आला. तहसील कार्यालयासमोर काँग्रेस कमिटीचे कार्यकर्ता उत्तम गेडाम यांच्या नेतृत्त्वात धरणे आंदोलन करण्यात आला. तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी बबन वाढई, मनोहर नन्नेवार, बबन वाढई यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.भद्रावती : जिल्ह्यातील विविध मागण्यांसाठी भद्रावती काँग्रेस कमिटीने तहसीलदारामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले. भद्रावतीकरांनी बंदला अल्प प्रतिसाद देत प्रतिष्ठाणे बंद ठेवली होती. गांधी चौक येथील काँग्रेस कार्यालयापासून ते तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. यावेळी डॉ. विजय देवतळे, धनंजय गुंडावार, प्रकाश दास, संजय दुबे, शामसुंदर पोडे, दिलीप ठेंगे, दिलीप मांढरे, धर्मराज गायकवाड, अजित चौधधरी, शेखर नक्षिणे, सुधाकर आत्राम, प्रेमदास पाटील आस्वले, जितेंद्र माहुरे, भगतसिंग मालुसरे, शंकर बोरघरे, साहेबराव ठाकरे, बंडू डोये, दीपक घोडमारे, पुष्पाताई ताटेवार, निर्मला कापकर, वंदना पेंदाम, अर्चना आरेकर आदी उपस्थित होते.बल्लारपूर : येथे बंद पाळून धरणे आंदोलन करण्यात आले. येथील बंदला व्यापारी वर्गाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी प्रभारी तहसीलदार विकास अहीर यांना जिल्ह्यासह तालुक्याच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी तालुका काँग्रेस अध्यक्ष घनश्याम मुलचंदानी, नगराध्यक्ष छाया मडावी, गटनेता देवंद्र आर्य, वसंत मांढरे, नगरसेवक नासीर खान, जि.प. सदस्य रामभाऊ टोंगे, पं.स. उपसभापती अनकेश्वर मेश्राम, हरिश शेडाम, रजनी मुलचंदानी, डॉ. मधूकर बावणे, छबु मेश्राम, टी. पद्माराव, ईस्माईल ढाकवाला, विनोद आत्राम, नरसिंग रेब्बावार, अनिल खरतड, बंडू गौरकार, जयकरण बजगोती, अशोक खाडीलकर, आर.आर. यादव, भुपाल बोरकर, मल्लेश कोडारी, अ‍ॅड. मेघा भाले, अ‍ॅड. पवनमेश्राम, मयुर परसुटकर, राजू मारमवार, नावेद खान यांचा समावेश होता. (लोकमत चमू)