शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

मानव-वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी परिसर स्वच्छता महत्त्वाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 23:55 IST

नागरिकांनी घरोघरी शौचालयाचे बांधकाम करुन त्याचा योग्य वापर करणे महत्त्वाचे आहे.

ठळक मुद्देनियती ठाकेर : जिल्हा पोलीस दलातर्फे प्रशासन-जनता संवाद

आॅनलाईन लोकमतमूल : नागरिकांनी घरोघरी शौचालयाचे बांधकाम करुन त्याचा योग्य वापर करणे महत्त्वाचे आहे. जंगलाला लागून असलेल्या गावात घरोघरी झाडेझुडपी असल्यामुळेच वन्यजीव आणि मानवांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता असते. नागरिकांनी परिसर स्वच्छतेला महत्त्व दिल्यास मानव-वन्यजीव संघर्ष रोखण्यास मदत मिळेल, असे मत जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकेर यांनी मांडले.चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी मूल आणि ब्रह्मपुरी येथील गावागावातील नागरिकांसाठी आयोजित केलेल्या मानव-वन्यजीव संघर्षाबाबत प्रशासन आणि जनता यांच्यात संवाद कार्यक्रम मूल येथील कन्नमवार सभागृहात पार पडला. याप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंग राजपूत, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे उपवनसंरक्षक नरवने, उपवनसंरक्षक सोनकुसरे, मध्य चांदाचे उपवनसंरक्षक गजेंद्र हिरे, मूलचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल हिरे, ब्रह्मपुरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी परदेशी, वन्यजीव रक्षक बंडू धोतरे, पूनम धनवटे, नागभीडचे पोलीस निरीक्षक शेवाळे, सावलीचे पोलीस निरीक्षक धुळे, सिंदेवाहीचे पोलीस निरीक्षक इंगळे, ब्रह्मपूरची पोलीस निरीक्षक चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक बोरकुटे, लबडे आदी यावेळी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल हिरे यांनी केले. संचालन पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण यांनी तर आभार पाथरीचे सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड यांनी मानले.यशस्वीतेसाठी सहायक पोलीस निरीक्षक शिंदे, पोलीस उपनिरीक्षक गौरकार, संतोष रायपूरे, भगवान चौधरी, सुनील घोडमारे, रामटेके, सचिन सायकार, पोलीस मित्र सुरेश खोब्रागडे व पोलीस कर्मचाºयांनी परिश्रम घेतले. यावेळी सरपंच, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, पोलीस पाटील व गावागावातील प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्ह्यात वन्यप्राण्यांचे हल्ले मोठ्या प्रमाणावर होत आहेत. असे असतानाही जिल्ह्यातील नागरिकांमध्ये मोठी सहनशक्ती आहे. यामुळे जिल्ह्यात वन्यप्राण्यांचा वावर आहे. जिल्ह्याला वरदान असून वन्यसृष्टी टिकली पाहिजे, यासाठी गावात इको डेव्हलपमेंट समिती कार्यरत असून जंगलाच्या संरक्षणासाठी त्यांची भूमिका महत्वाची आहे. त्यांच्या समन्वयाची गरज असून समन्वयन नसल्यास अशा गावात विनाकारण वाद उफाळून येतात. गावातील प्रश्न गावकºयांनी समन्वयातून सोडविण्याचे आवाहन उपवनसंरक्षक नरवने यांनी केले.