शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
2
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
3
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
4
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
5
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
6
संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
7
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
8
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
9
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
10
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
11
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
12
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
13
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
14
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
15
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
16
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
17
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
18
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
19
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
20
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?

‘हॅलो चांदा’वरील प्रलंबित तक्रारी पूर्ण निकाली काढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 23:39 IST

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या ‘हॅलो चांदा’ या चंद्रपूर जिल्ह्यातील पालकमंत्री तक्रार निवारण केंद्राच्या कामात आणखी गती वाढविण्यात यावी.

ठळक मुद्देगती वाढविण्याचे निर्देश : पालकमंत्र्यांनी घेतला विभागवार आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या ‘हॅलो चांदा’ या चंद्रपूर जिल्ह्यातील पालकमंत्री तक्रार निवारण केंद्राच्या कामात आणखी गती वाढविण्यात यावी. केवळ तक्रारी सोडविण्याचे आश्वासन नव्हे तर सामान्य माणसाच्या चेहºयावर हसू फुलविण्याचे कौशल्य या टोल फ्री क्रमांकामध्ये असले पाहिजे, अशा शब्दात या नव्या प्रयोगाला देशात लोकप्रिय करण्याचे आवाहन वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.जिल्ह्याच्या प्रशासनात रुजू झालेल्या नव्या नियोजन भवनात ‘हॅलो चांदा’ या अभिनव प्रयोगाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाभरातील उच्चपदस्थ अधिकाºयांची सर्व नगरपालिकांच्या मुख्याधिकाºयांची, या योजनेसाठी काम करणाºया तज्ञांची बैठक आयोजित करण्यात आली होती. जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी १५ जुलैला सुरु झालेल्या अभिनव प्रयोगाचा आढावा यावेळी सादर केला.आतापर्यंत जवळपास पाच हजारावर नागरिकांनी हॅलो चांदावर संपर्क साधला आहे. नागरिकांमध्ये आपल्या सोयी सुविधांविषयी जागृता निर्माण होत आहे. या योजनेमध्ये काही अधिकाºयांनी झोकून देवून काम केले. तथापि अनेक ठिकाणी तक्रारी सोडविण्याची प्रक्रिया दिर्घकाळ रेंगाळत राहिल्याचेही त्यांनी नमूद केले.पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी या नव्या प्रयोगातील सहभागाबद्दल अधिकाºयों कौतुक केले. केवळ कार्यवाही सुरु केली, हे दाखविण्यासाठी ‘हॅलो चांदा’ सुरु करण्यात आलेले नाही. त्यामुळे ज्या अधिकाºयांनी तक्रारी सोडविण्यासाठी पुढाकार घेतला नाही किंवा ज्यांच्याकडून तक्रारी सोडविण्यात विलंब होत आहे, अशा अधिकारी, कर्मचाºयांवर गंभीरतेने कारवाई करा, असे निर्देश त्यांनी दिले.या बैठकीला आ. नाना शामकुळे, अ‍ॅड.संजय धोटे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, जिल्हा पोलीस अधिक्षक नियति ठाकर, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, आयुक्त संजय काकडे, उपमहापौर अनिल फुलझेले, स्थायी समिती अध्यक्ष राहुल पावडे, अप्पर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर आदी उपस्थित होते.१ हजार ७४६ तक्रारीदीड महिन्यामध्ये १७४६ तक्रारीपैकी ७५९ तक्रारी सोडविण्यात आल्या. उर्वरित तक्रारी महिन्याच्या आत सोडवण्याच्या अटीवर पूर्ण करा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. यापूर्वी अनेक लोकांचे मला शासकीय कामासाठी प्रत्यक्ष फोन येत होते. त्यांना प्रशासकीय कामासाठी ‘हॅलो चांदा’ ही एक दुसरी हेल्पलाईन निर्माण झाली आहे. पुढील काही दिवसात प्रशासकीय कामासाठी थेट ‘हॅलो चांदा’ वरच समाधान होते. जिवतीपासून चिमूरपर्यंत सर्वसामान्य लोकांच्या समस्या सुटल्या पाहिजेत. पाच हजार लोकांना आपल्या कामांसाठी या यंत्रणेवर मोबाईल करावा वाटले. याचा अर्थ नागरिकांच्या समस्या आणखी जोमाने सोडविण्याची आवश्यकता असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.