शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
4
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
5
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
6
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
7
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
8
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
9
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
10
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
11
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
12
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
13
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
14
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
15
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
16
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
17
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
18
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
19
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
20
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
Daily Top 2Weekly Top 5

सिमेंट रस्त्याची कामे त्वरित पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:29 IST

नागभीड : तालुक्यातील अनेक गावांमध्ये सिमेंट रस्ते बांधण्याचे काम सुरू करण्यात आले. परंतु, कोरोनामुळे काही कामे बंद आहेत. तर ...

नागभीड : तालुक्यातील अनेक गावांमध्ये सिमेंट रस्ते बांधण्याचे काम सुरू करण्यात आले. परंतु, कोरोनामुळे काही कामे बंद आहेत. तर काही कामे कासवगतीने सुरू आहेत. आता रहदारी कमी असल्याने कामाला गती द्यावी, अशी मागणी आहे.

व्यावसायिकांकडून ग्राहकांची लूट

चंद्रपूर : ग्राहकांना वस्तू मोजून देणे व वजनानुसार बरोबर पैसे घेणे, ही व्यवहाराची पद्धत आहे, पण पैसे बरोबर देऊनही वजनात तूट निर्माण होण्याच्या प्रकारामुळे ग्राहक लुटले जात आहेत. लहान-मोठ्या विक्रेत्यांकडून सर्रासपणे अशी लूट सुरू आहे. यावर आळा घालण्यासाठी संबंधितांनी ग्रामीण, तसेच शहरी भागात विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी केली जात आहे.

अंगणवाडी केंद्रांमध्ये सुविधांचा अभाव

ब्रह्मपुरी : तालुक्यातील ग्रामीण भागातील अंगणवाडी केंद्राची दुरवस्था झाली असून, बालकांच्या पूर्व शालेय शिक्षणाची उपेक्षा होत आहे. आता कोरोनामुळे अंगणवाडी बंद असल्याने या अंगणवाडीची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

व्यवसायासाठी कर्ज द्यावे

चंद्रपूर : महिला बचत गटांची संंख्या बरीच वाढली, परंतु स्वयंरोजगार उभे करण्यासाठी अपयश येत आहे. बँकेकडून कर्ज उपलब्ध होत नसल्याने, महिला बचतगट अत्यंत छोट्या व्यवसायात अडकल्या आहेत. यातून पुरेसा आर्थिक मोबदला मिळत नाही. त्यामुळे महिलांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी बचत गटांना कर्ज देण्यात यावे, अशी मागणी बचत गटातील महिलांकडून करण्यात येत आहे.

धान उत्पादक शेतकरी आर्थिक विवंचनेत

सावली : यंदा अल्प उत्पादन झाल्याने तालुक्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. त्यातच नुकत्याच खताच्या किमतीमध्ये प्रचंड वाढ करण्यात आली. त्यामुळे नव्या हंगामासाठी पैशाची तडजोड कशी करावी, असा प्रश्न पडला आहे.

नियमबाह्य वाहतूक ठरतेय धोक्याची

चंद्रपूर : गावात नियमबाह्य व विना परवाना अल्पवयीन चालक अशा प्रकारच्या वाहतुकीचे प्रमाण वाढले आहे. यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. लॉकडाऊन असल्याने रस्त्यावरील रहदारी कमी झाली आहे. त्यामुळे ही मुले वाहने सुसाट पळविताना दिसून येतात.

अनावश्यक सेवांनी मोबाईल धारक त्रस्त

चंद्रपूर : मोबाईलचा वापर सर्वत्र वाढला आहे, पण कंपन्यांकडून अनावश्यक सेवांचा भडिमार ग्राहकांवर होत आहे. यामुळे मोबाईल धारक त्रस्त झाले आहेत. याची तक्रार संबंधित ग्राहक तक्रार केंद्राकडे केली जाते, पण त्याचा निपटारा होत नसल्याचे दिसते. त्यामुळे ग्राहक वर्ग त्रस्त झाले आहे.

एटीएममध्ये नोटांचा तुटवडा

गोडपिपरी : शहरातील मुख्य मार्गावर एटीएम मशीन बसविण्यात आल्या आहेत. मात्र, अनेक वेळा पैशाचा ठणठणाट दिसून येत आहे, तर कधी तांत्रिक अडचणीमुळे या एटीएम मशीन बंद असतात. त्यामुळे नागरिकांना रांगेत लागून पैसे काढावे लागत आहेत.

उमा नदीवरील पुलाची उंची वाढवा

सिंदेवाही : तालुक्यातील कळमगाव जवळील उमा नदीवर अस्तित्वात असलेला पूल कमी उंचीचा आहे. त्यामुळे पावसाच्या दिवसामध्ये पुलावरून पाणी जात असल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे या नदीवर पावसाळ्यापूर्वी नवीन पूल बांधण्याची मागणी केली जात आहे.

रोहयो कामांची संख्या वाढवावी

भद्रावती : तालुक्यात रोजगार हमी योजनेची कामे सुरू आहेत. मात्र, कामांची संख्या कमी असल्याने अनेक जाॅबकार्ड धारकांना कामे मिळत नाहीत. सध्या शेतीपासून पुरेसा रोजगार नाही. त्यामुळे रोहयो कामांची संख्या वाढवावी.

बांबू अभावी बुरड कामगार अडचणीत

मूल : तालुक्यात बुरड कामगारांची संख्या बरीच आहे. मात्र वनविभागाकडून निस्तार हक्काद्वारे पुरेसा बांबू मिळत नाही. त्यामुळे कारागीर व शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. हा प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी केली जात आहे.

शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याची मागणी

चंद्रपूर : मागील काही वर्षापासून शेतकऱ्यांची बिकट अवस्था आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना शेती तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देऊन त्यांचा आर्थिक स्रोत वाढविणे गरजेचे आहे. त्यामुळे कृषी विभागाने याकडे लक्ष देऊन तालुकानिहाय प्रशिक्षण द्यावे, अशी मागणी आहे.

रस्त्यावरील झुडपे जीवघेणी

कोरपना : ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुतर्फा वाढलेल्या झुडपामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामळे झुडपे तोडून दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

घरकूल प्रकरणांचा निपटारा करावा

जिवती : तालुक्यातील रमाई आवास योजना व शबरी आदिवासी घरकूल योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे जमा करूनही बरीच प्रकरणे प्रलंबित आहेत. मंजूर झालेली बांधकामे रेती अभावी अर्धवट आहे.

मैदानी खेळाबद्दल जनजागृती गरजेची

चंद्रपूर : काही वर्षांपूर्वी ग्रामीण भागात मैदानी खेळ मोठ्या प्रमाणात खेळले जायचे. त्यामुळे त्यांचे आरोग्य सुदृढ असायचे. मात्र, सध्या मुले मैदानी खेळ खेळताना दिसत नाही. मोबाईल गेमने हा ट्रेंडच बदलवून टाकला आहे. आता मुले मोबाईलवर विविध खेळ खेळताना दिसत आहे. त्यामुळे त्यांच्या शरीरावर विपरित परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मैदानी खेळाची गरज आहे.

रस्त्यावरील पार्किंगमुळे नागरिक हैराण

मूल : गांधी चौक परिसरात रस्त्यावर वाहने पार्किंगसाठी ठेवली जातात. काही दिवसांपूर्वी नगरपरिषदेने दंडात्मक कारवाई केली होती. पण कोरोनापासून कारवाई थंडावली. या मार्गावर रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे वाहनधारक व सर्वसामान्य नागरिकांना मार्गक्रमण करताना त्रास होत आहे. यापूर्वी अनेकदा रस्त्यावरील पार्किंग हटविण्यासंदर्भात नागरिकांनी मागणी केली होती.