शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

शिक्षणातूनच समाजाची प्रगती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 00:00 IST

शिक्षणातूनच माणूस खऱ्या अर्थाने घडतो. समाजाची प्रगती होते. त्यामुळे माणसाचे उत्थान व्हावे असेच शिक्षण सर्वांना मिळावे, असे प्रतिपादन भारतीय शिक्षण मंडळाच्या विदर्भ प्रांत अध्यक्ष प्राचार्य डॉ. उज्ज्वला चक्रदेव यांनी केले. न्यू इंडिया कॉन्व्हेंटमध्ये घेण्यात आलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

ठळक मुद्देउज्वला चक्रदेव : शिक्षण मंडळाच्या कार्यक्रमात विचारमंथन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शिक्षणातूनच माणूस खऱ्या अर्थाने घडतो. समाजाची प्रगती होते. त्यामुळे माणसाचे उत्थान व्हावे असेच शिक्षण सर्वांना मिळावे, असे प्रतिपादन भारतीय शिक्षण मंडळाच्या विदर्भ प्रांत अध्यक्ष प्राचार्य डॉ. उज्ज्वला चक्रदेव यांनी केले. न्यू इंडिया कॉन्व्हेंटमध्ये घेण्यात आलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी डॉ. शरदचंद्र सालफळे मंचावर प्रांत उपाध्यक्ष डॉ.शशी अग्रवाल, विनोदकुमार पांडे प्रकाश कौर धीर व अन्य उपस्थित होते.प्राचार्या डॉ. चक्रेदव म्हणाल्या, स्वामी विवेकानंद म्हणतात आपल्या आत एक संपूर्ण मनुष्य विद्यमान आहे. शिक्षणाच्या माध्यमातून त्याला बाहेर काढायचे असते. दगडातून मुर्ती प्रकट करतो. मूर्तीकार अथवा विद्यार्थी एखादे चित्र काढताना जेव्हा स्वत:ला हरवतो तेव्हा खरे तर तो स्वत:ला सापडलेला असतो. शिक्षणात नेमके हेच व्हायला हवे आहे. इंग्रजांच्या आगमनानंतर कला व अध्यात्माचे शिक्षण बंद झाले. पुनरूत्थान आवश्यकता आहे. त्यासाठी अनुसंधानाची आवश्यकता आहे.विदर्भ प्रांत उपाध्यक्ष डॉ. अग्रवाल यांनी संस्थेचे कार्य व आवश्यकतेविषयी विचार व्यक्त करून म्हणाल्या, शिक्षणात भारतीयता येण्यासाठी भारतीय शिक्षण मंडळाची स्थापना झाली.भारतीय म्हणजे एकात्म विचार आपल्या ध्येयपूर्तीसाठी अनुसंधान, प्रबोधन, प्रकाशन व संघटन या पाच सोपानांच्या माध्यमातून भारतीय शिक्षण मंडळ काम करते. त्यासाठी अनुसंधान प्रकोष्ठ, शैक्षणिक प्रकोष्ठ, महिला प्रकल्प, शालेय प्रकल्प, गुरुकुल प्रकल्प व युवा आयाम अशा प्रकल्प प्रकोष्ठांची रचना भारतीय शिक्षण मंडळाने केली आहे. भा.शि.मंडळाचे विस्तारक पांडे यांनी संघटनगीत सांगितले तर वैयक्तिक गीत मंगेश देऊरकर यांनी सादर केले. संचालन मंडळाच्या चंद्रपूर जिल्हा सचिव प्रकाश कौर धीर यांनी केले. आभार सुनीता सोमाणी यांनी मानले. संघटनमंत्र व शांतीमंत्र अश्विनी दाणी यांनी गायले. यावेळी अखिल भारतीय महिला प्रकल्प सहप्रमुख अरूंधती कावडकर, जिल्हाध्यक्ष डॉ. चंद्रशेखर कुंभारे कुंभारे, जयश्री भारत, माया मिश्रा, संजना कोंतमवार, मंगेश देऊरकर व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. 

टॅग्स :Educationशिक्षण