शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

सैनिकांचे मनोबल उंचावण्यास कटिबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 01:38 IST

देशाच्या सीमेवर तणाव स्थिती व युद्ध असे दोन प्रकार घडतात. मात्र, अशा अप्रिय घटनांमध्ये आपल्या सेनेची क्षती होऊ नये, हा सरकारचा नेहमीच प्रयत्न असतो. सैनिकांचे मनोबल वाढावे आणि त्यांच्या सोयी-सुविधांत वाढ व्हावी याकरिता २५ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिली.

ठळक मुद्देहंसराज अहीर यांचे प्रतिपादन : बल्लारपुरात सैनिकांना मानवंदना

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : देशाच्या सीमेवर तणाव स्थिती व युद्ध असे दोन प्रकार घडतात. मात्र, अशा अप्रिय घटनांमध्ये आपल्या सेनेची क्षती होऊ नये, हा सरकारचा नेहमीच प्रयत्न असतो. सैनिकांचे मनोबल वाढावे आणि त्यांच्या सोयी-सुविधांत वाढ व्हावी याकरिता २५ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिली.बल्लारपूर येथील महात्मा ज्योतीबा फुले महाविद्यालयाच्या प्रांगणात नेताजी सुभाषचंद्र बोस जयंतीनिमित्त आयोजित सैनिकांना मानवंदनाच्या ‘सलाम सैनिक’ या कार्यक्रमात ते बोलत होते. येथील श्री लक्ष्मी नृसिंह नागरी सहकारी पतसंस्था, लक्ष्य बहुउद्देशिय संस्था व संत गाडगेबाबा वाचनालयाच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून मुंबई येथील सैनिक परिवार मित्रचे हिरालाल यादव होते. अध्यक्षस्थानी ना. अहीर तर प्रमुख अतिथी म्हणून वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, नगराध्यक्ष हरिश शर्मा, उपाध्यक्ष मीना चौधरी, उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, मुख्याधिकारी विपीन मुद्धा, तहसीलदार विकास अहीर, ठाणेदार प्रदीप शिरस्कर, संजय कायरकर, प्राचार्य ज्योती भूते, माजी नगराध्यक्ष लखनसिंह चंदेल आदी उपस्थित होते.यावेळी जवानांच्या स्मृती स्तंभाला पुष्पचक्र वाहून त्यांना सलामीने अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केल्यानंतर यादव तसेच ना. अहीर यांचा सत्कार करण्यात आला. श्रीनिवास सुंचूवार यांनी कार्यक्रमाची भूमिका विषद केली. संचालन प्रा. मनिष कायरकर व आभार इजाज शेख यांनी मानले.