शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

सैनिकांचे मनोबल उंचावण्यास कटिबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 01:38 IST

देशाच्या सीमेवर तणाव स्थिती व युद्ध असे दोन प्रकार घडतात. मात्र, अशा अप्रिय घटनांमध्ये आपल्या सेनेची क्षती होऊ नये, हा सरकारचा नेहमीच प्रयत्न असतो. सैनिकांचे मनोबल वाढावे आणि त्यांच्या सोयी-सुविधांत वाढ व्हावी याकरिता २५ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिली.

ठळक मुद्देहंसराज अहीर यांचे प्रतिपादन : बल्लारपुरात सैनिकांना मानवंदना

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : देशाच्या सीमेवर तणाव स्थिती व युद्ध असे दोन प्रकार घडतात. मात्र, अशा अप्रिय घटनांमध्ये आपल्या सेनेची क्षती होऊ नये, हा सरकारचा नेहमीच प्रयत्न असतो. सैनिकांचे मनोबल वाढावे आणि त्यांच्या सोयी-सुविधांत वाढ व्हावी याकरिता २५ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिली.बल्लारपूर येथील महात्मा ज्योतीबा फुले महाविद्यालयाच्या प्रांगणात नेताजी सुभाषचंद्र बोस जयंतीनिमित्त आयोजित सैनिकांना मानवंदनाच्या ‘सलाम सैनिक’ या कार्यक्रमात ते बोलत होते. येथील श्री लक्ष्मी नृसिंह नागरी सहकारी पतसंस्था, लक्ष्य बहुउद्देशिय संस्था व संत गाडगेबाबा वाचनालयाच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून मुंबई येथील सैनिक परिवार मित्रचे हिरालाल यादव होते. अध्यक्षस्थानी ना. अहीर तर प्रमुख अतिथी म्हणून वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, नगराध्यक्ष हरिश शर्मा, उपाध्यक्ष मीना चौधरी, उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, मुख्याधिकारी विपीन मुद्धा, तहसीलदार विकास अहीर, ठाणेदार प्रदीप शिरस्कर, संजय कायरकर, प्राचार्य ज्योती भूते, माजी नगराध्यक्ष लखनसिंह चंदेल आदी उपस्थित होते.यावेळी जवानांच्या स्मृती स्तंभाला पुष्पचक्र वाहून त्यांना सलामीने अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केल्यानंतर यादव तसेच ना. अहीर यांचा सत्कार करण्यात आला. श्रीनिवास सुंचूवार यांनी कार्यक्रमाची भूमिका विषद केली. संचालन प्रा. मनिष कायरकर व आभार इजाज शेख यांनी मानले.