शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

वरोरा तालुक्यात सोयाबीन बीजप्रक्रिया मोहिमेचा प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:19 IST

वरोरा : तालुक्यात जवळपास २७ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाची दरवर्षी पेरणी केली जाते. बियाणे क्षमता तपासणी व बीजप्रक्रिया ...

वरोरा : तालुक्यात जवळपास २७ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाची दरवर्षी पेरणी केली जाते. बियाणे क्षमता तपासणी व बीजप्रक्रिया न केल्यामुळे वेळेवर बियाणे न उगविणे, किडी व रोगाचा प्रादुर्भाव आदी कारणांमुळे मोठ्या प्रमाणात उत्पन्नात घट येते.

त्यामुळे तालुका कृषी अधिकारी, वरोरा कार्यालयाच्यावतीने तालुक्यातील सर्वच गावांत मागील आठवड्यात बियाणे उगवण क्षमता तपासणी मोहीम मोठ्या प्रमाणात राबविण्यात आली.

शेतकऱ्यांनी सोयाबीन ग्रामबीजोत्पादनमध्ये घरीच तयार केलेले सोयाबीन बियाणे व कृषी केंद्रातून विकत घेतलेले बियाणे यांच्या घरच्या घरी उगवण क्षमता तपासून बघितल्या. ७० टक्केच्यावर उगवण झालेले बियाणे शेतकऱ्यांनी पेरणी करण्यास राखून ठेवले.

तालुक्यातील सोयाबीन बियाणे उगवण क्षमता तपासणी मोहिमेच्या यशस्वीतेनंतर मंडल कृषी अधिकारी, शेगाव कार्यक्षेत्रात मौजा- धानोली व अर्जुनी या गावात सोयाबीन बीजप्रक्रिया मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. साधारणतः शेतकरी सोयाबीनला बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करतात. परंतु कीटकनाशकाची बीजप्रक्रिया न केल्यामुळे मागीलवर्षी खोडमाशी व चक्रीभुंगामुळे सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान झाले होते. त्या पार्श्वभूमीवर कीटकनाशकाची बीजप्रक्रिया शेतकऱ्यांसमोर प्रत्यक्ष बीजप्रक्रिया मशीनच्या माध्यमातून प्रात्यक्षिकाद्वारे करून दाखविण्यात आली. सोबतच बिबीएफवर सोयाबीन पेरणी, तणनाशकाचा वापर, खत व्यवस्थापन आदी विषयांवर सविस्तर मार्गदर्शन मंडल कृषी अधिकारी, विजय काळे यांनी केले. कृषी सहायक पवन मत्ते यांनी बीजप्रक्रियेचे महत्त्व उपस्थित शेतकऱ्यांना समजावून सांगितले.

===Photopath===

100621\img-20210526-wa0186.jpg

===Caption===

image