शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

बल्लारपुरात शासनाच्या ई संजीवनी आरोग्य सेवेचा प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:34 IST

कोरोना काळात सर्व सीमा बंद होत्या. गावांमध्येही संचारबंदी होती. अशा आणीबाणीच्या प्रसंगी रुग्णांना उपचारार्थ बाहेर जाणे धोक्याचे होते. अशा ...

कोरोना काळात सर्व सीमा बंद होत्या. गावांमध्येही संचारबंदी होती. अशा आणीबाणीच्या प्रसंगी रुग्णांना उपचारार्थ बाहेर जाणे धोक्याचे होते. अशा स्थितीत रुग्णांना घरूनच ॲप प्रणालीद्वारे डॉक्टरांकडून उपचार मिळावा याकरिता राज्य शासन यांच्यावतीने ई संजीवनी बाह्यरुग्ण सेवा सुरू करण्यात आली. ई संजीवनी ॲप डॉक्टर आणि रुग्ण यांच्यात माध्यम ठरेल. यावरून रुग्णांना त्यांच्या आजारावर घरबसल्या सेवा मिळू लागली. याप्रसंगी ही सेवा मुंबई-पुणे यापुरतीच मर्यादित होती. ती यशस्वी ठरली व आता राज्यात इतर ठिकाणी ती सुरू केली आहे. येथील ग्रामीण रुग्णालयात ई संजीवनी सेवा या आठवड्यापासून सुरू झाली आहे. ही सेवा सर्वांकरिता आहे. मोबाईल ॲपचा उपयोग करून ऑनलाईन उपलब्ध असलेल्या डॉक्टरांशी रुग्णांना त्यांच्या आजारावर विनामूल्य उपचार घेता येणार आहे. चर्चेनंतर ई प्रिस्क्रिप्शन (औषध चिट्ठी) प्राप्त होईल. रुग्णांना त्या औषधीच्या दुकानातून विकत घ्यावे लागेल. सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत या सेवेकरिताही डॉक्टर उपलब्ध असतील. बल्लारपूर रुग्णालयात ही सेवा वैद्यकीय अधीक्षक डॉ. अर्पिता वावरकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन मेश्राम, डॉ. आशा साळवे, डॉ. सुकेशनी कांबळे बघत आहेत, अशी माहिती डॉ. वावरकर यांनी दिली आहे. रुग्णांनी ई संजीवनीच्या ॲपवरून संपर्क साधणे आवश्यक आहे.