शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

घरांची व गुरांच्या गोठ्याची पडझड; शेकडो नागरिक अजूनही नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेतच

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2024 13:18 IST

घरे कोसळली : पंचनामेही झाले; मात्र नुकसानभरपाईचे काय?

लोकमत न्यूज नेटवर्क मूल : तालुक्यात जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना मोठी झळ पोहोचली असून अनेकांच्या घरांची व गुरांच्या गोठ्याची पडझड झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले. तालुका प्रशासनाने अधिकाऱ्यांमार्फत तत्काळ पंचनामे केले. मात्र, दोन महिन्यांचा कालावधी लोटूनही अद्याप नुकसानभरपाई न मिळाल्याने नागरिक नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत आहे.

मूल तालुक्यातील ग्रामीण भागात अतिवृष्टीचा जास्त फटका बसला. अनेकांची घरे पडल्याने त्यांच्या निवाऱ्यांचा प्रश्न निर्माण झाला. नागरिकांना निवाऱ्यासाठी इतरत्र शोधाशोध करावी लागली. अनेकांच्या घरातील अन्नधान्य भिजल्याने वेळेवर त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली, तर गुरांच्या गोठ्याची पडझड झाल्याने गुरे रस्त्यावर बांधण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. तालुका प्रशासनाने आपल्या अधिकाऱ्यांमार्फत तत्काळ पंचनामे केले. मात्र, पंचनामे करून बराच कालावधी लोटूनही नुकसानभरपाई न मिळाल्याने नुकसानग्रस्त नागरिकांमध्ये शासानाप्रती तीव्र संताप व्यक्त केल्या जात आहे. प्रशासनाने त्वरित भरपाई द्यावी. 

इतक्या घरांची पडझड तालुक्यात झालेल्या अतिवष्टीमुळे जवळपास ७४० घरांची, तर ६० गुरांच्या गोठ्यांची पडझड झाल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. शासनाकडून तत्काळ नुकसानभरपाई मिळणे अपेक्षित होते. मात्र, बराच कालावधी लोटूनही अद्याप नुकसानभरपाई मिळाली नाही.

"अतिवृष्टीमुळे माझी झोपडी पडली. घरातील अन्नधान्य पूर्णतः भिजले. त्यामुळे माझे मोठे नुकसान झाले असून माझ्या निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने पंचनामे केले. मात्र, अजूनही नुकसानभरपाई मिळाली नाही. त्यामुळे शासनाने तत्काळ नुकसानभरपाई द्यावी." - राजेंद्र वेट्टी, नुकसानग्रस्त लाभार्थी

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर