शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

घरांची व गुरांच्या गोठ्याची पडझड; शेकडो नागरिक अजूनही नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेतच

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2024 13:18 IST

घरे कोसळली : पंचनामेही झाले; मात्र नुकसानभरपाईचे काय?

लोकमत न्यूज नेटवर्क मूल : तालुक्यात जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना मोठी झळ पोहोचली असून अनेकांच्या घरांची व गुरांच्या गोठ्याची पडझड झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले. तालुका प्रशासनाने अधिकाऱ्यांमार्फत तत्काळ पंचनामे केले. मात्र, दोन महिन्यांचा कालावधी लोटूनही अद्याप नुकसानभरपाई न मिळाल्याने नागरिक नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत आहे.

मूल तालुक्यातील ग्रामीण भागात अतिवृष्टीचा जास्त फटका बसला. अनेकांची घरे पडल्याने त्यांच्या निवाऱ्यांचा प्रश्न निर्माण झाला. नागरिकांना निवाऱ्यासाठी इतरत्र शोधाशोध करावी लागली. अनेकांच्या घरातील अन्नधान्य भिजल्याने वेळेवर त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली, तर गुरांच्या गोठ्याची पडझड झाल्याने गुरे रस्त्यावर बांधण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. तालुका प्रशासनाने आपल्या अधिकाऱ्यांमार्फत तत्काळ पंचनामे केले. मात्र, पंचनामे करून बराच कालावधी लोटूनही नुकसानभरपाई न मिळाल्याने नुकसानग्रस्त नागरिकांमध्ये शासानाप्रती तीव्र संताप व्यक्त केल्या जात आहे. प्रशासनाने त्वरित भरपाई द्यावी. 

इतक्या घरांची पडझड तालुक्यात झालेल्या अतिवष्टीमुळे जवळपास ७४० घरांची, तर ६० गुरांच्या गोठ्यांची पडझड झाल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. शासनाकडून तत्काळ नुकसानभरपाई मिळणे अपेक्षित होते. मात्र, बराच कालावधी लोटूनही अद्याप नुकसानभरपाई मिळाली नाही.

"अतिवृष्टीमुळे माझी झोपडी पडली. घरातील अन्नधान्य पूर्णतः भिजले. त्यामुळे माझे मोठे नुकसान झाले असून माझ्या निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने पंचनामे केले. मात्र, अजूनही नुकसानभरपाई मिळाली नाही. त्यामुळे शासनाने तत्काळ नुकसानभरपाई द्यावी." - राजेंद्र वेट्टी, नुकसानग्रस्त लाभार्थी

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर