शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

कोळसा खाणींमुळे घोंगावतेय जलसंकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 00:40 IST

वेस्टर्न कोलफिल्ड लिमीटेडच्या कोळसा खाणीत दररोज पाण्याचा प्रचंड उपसा होत असल्याने कोळसा खाण परिसरातील गावागावात पाणी टंचाई जाणवू लागली आहे. गावकऱ्यांची तहाण भागविणाऱ्या बोअरवेलही आटायला लागल्याने गोवरी परिसारातील गावागावात जलसंकट निर्माण झाले असून नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

ठळक मुद्देपाण्याचा प्रचंड उपसा : बोअरवेलही लागल्या आटायला

प्रकाश काळे।लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : वेस्टर्न कोलफिल्ड लिमीटेडच्या कोळसा खाणीत दररोज पाण्याचा प्रचंड उपसा होत असल्याने कोळसा खाण परिसरातील गावागावात पाणी टंचाई जाणवू लागली आहे. गावकऱ्यांची तहाण भागविणाऱ्या बोअरवेलही आटायला लागल्याने गोवरी परिसारातील गावागावात जलसंकट निर्माण झाले असून नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.राजुरा तालुक्यात वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रांतर्गत येणाऱ्या भूमिगत व खुल्या कोळसा खाणी आहेत. गोवरी, सास्ती, पोवनी, साखरी, गोयेगाव, माथरा, अंतरगाव, चिंचोली, मानोली, बाबापूर परिसरात वेकोलिच्या खुल्या कोळसा खाणींचे जाळे आहे. वेकोलिच्या कोळसा खाणी ३०० ते ४०० फुट खोल आहे. या कोळसा खाणीत दिवसरात्र पाण्याचा प्रचंड उपसा करण्यात येत असल्याने गोवरी परिसरातील व शिवारातील बोअरवेलला पाणी येत नाही. कोळसा खाणींनी पाण्याच्या पातळीत कमालीची घट झाल्याने यंदा पाण्याची भिषण टंचाई होण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे. उन्हाळ्यापूर्वीच नदी, नाले, तलाव कोरडे पडल्याने पाण्याची पातळी खाली गेली आहे. गोवरी परिसरात मोठ्या प्रमाणात वेकोलिच्या खुल्या कोळसा खाणींमुळे गावागावात जलसंकट घोंगवयाला सुरूवात झाली आहे. पाण्यासाठी जीव कासावीस होत असताना ४३ अंश सेल्सिअसच्या तापमानात पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. वेकोलित होणाºया शक्तीशाली ब्लास्टिंगमुळे बहुतांश बोअरवेल खचल्याने अनेक बोअरवेलला पाणी येत नाही तर काही बोअरवेल व विहीरी नावापुरत्याच उरल्या आहेत.शेतकऱ्यांनी सिंचनासाठी शेतात बोअरवेल खोदल्या. मात्र वेकोलिच्या शक्तीशाली स्फोटांनी बोअरवेल पूर्णत: खाली गेल्याने शेतकºयांना त्यांचा मोठाा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहै. पूर्वी वेकोलि परिसरातील गावात पाणी टचांई नव्हती. परंतू कोळसा खाणीे निर्माण झाल्यापासून पाण्याची पातळी अक्षरश: खाली गेल्याचे खाण परिसरातील गावातील प्रकल्पग्रस्त जाणकार नागरिक सांगतात. कोळस खाणींनी पाण्याची पातळी कमालीची घटल्याने गोवरी परिसरातील गावागावात भविष्यात भीषण पाणी टंचाई होण्याची शक्यता आहे.वेकोलिचे दुष्परिणाम गावकऱ्यांच्या माथीवेकोलिच्या कोळसा खाणी निर्माण झााल्यापासून प्रकल्पग्रस्त गावातील नागरिकांना वेकोलिचे दुष्परिणाम सहन करावे लागत आहे. मात्र प्रशासनाने आजपर्यंत गावकऱ्यांच्या हितासाठी कोणतीही कायमस्वरूपी उपाययोजना केली नाही, हे येथील नागरिकांचे दुर्दैव आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई