शहरं
Join us  
Trending Stories
1
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
2
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
3
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
4
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
5
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
6
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
7
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
8
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
9
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
10
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
11
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
12
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
13
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
14
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
15
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
16
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
17
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
18
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
19
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
20
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर

गोवरी, पोवनीवासीयांनी पुन्हा रोखली कोळसा वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:29 IST

गोवरी : बल्लारपूर वेकोलि अंतर्गत गोवरी डीप, पोवनी २ कोळसा खदानीतून होणारी अवजड वाहतूक थांबवण्यासाठी नागरिकांनी ...

गोवरी : बल्लारपूर वेकोलि अंतर्गत गोवरी डीप, पोवनी २ कोळसा खदानीतून होणारी अवजड वाहतूक थांबवण्यासाठी नागरिकांनी अनेकदा चक्काजाम आंदोलन केले. तब्बल सात तास वाहतूक ठप्प झाली होती. वेकोलिचे अधिकारी यांनी गावकऱ्यांच्या मागण्यांची पूर्तता करण्याचे लेखी आश्वासन दिले. मात्र दोन दिवसांतच पुन्हा ओव्हरलोड वाहतुकीमुळे धुळीचा त्रास सुरू झाल्याने १६ सप्टेंबर रोजी चक्काजाम आंदोलन केले. त्यानंतर वेकोलिने आश्वासन न पाळल्याने नागरिकांचा संताप अनावर झाला आणि पुन्हा शनिवारी सकाळी ११ वाजता गोवरी व पोवनीवासीयांनी राजुरा-गोवरी-कवठाळा या मुख्य मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.

सकाळपासून नागरिकांनी ओव्हरलोड कोळसा वाहतूक रोखून धरली. गावकऱ्यांना दिलेले आश्वासन वेकोलि अधिकाऱ्याने पाळले नाही. त्यामुळे गोवरी येथे सामाजिक कार्यकर्ते भास्कर जूनघरी, तर पोवनी येथील सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल कावळे यांच्या नेतृत्वातील गावकऱ्यांनी चक्काजाम आंदोलन केले. पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या चक्काजाम आंदोलनात वेकोलिच्या पोवनी २ व गोवरी डीप कोळसा खाण व्यवस्थापनाने गोवरी मुख्य मार्गावर रस्त्यावर पाणी मारण्याचे व ओव्हरलोड कोळसा वाहतूक करणार नाही, असे लेखी आश्वासन दिले. चौकात सुरक्षारक्षक देण्याचे आश्वासन दिले होते. ओव्हरलोड कोळसा वाहतूक सुरू आहे, तर टँकरने पाणी मारणे बंद आहे. रस्त्यावरील खड्डे जैसे थे आहेत. सिक्युरिटी गार्डचा पत्ता नाही. धुळीचा प्रचंड त्रास नागरिकांना होत आहे. मात्र वेकोलिचे अधिकारी याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. रस्त्याच्या कडेला झुडपी जंगले वाढलेली आहेत. त्यामुळे वळणावरून येताना समोरचे नागरिक दिसत नाहीत. या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे. वेकोलिने या मार्गावरील चालणाऱ्या वाहतुकीबाबत दिलेले आश्वासन पाळले नाही तर २ ऑक्टोबरला गांधी जयंतीपासून गोवरी, पोवनी येथील गावकरी वेकोलितून सुरू असणारी ओव्हरलोड कोळसा वाहतूक बंद करतील, असा इशारा भास्कर जुनघरी व प्रफुल्ल कावळे यांच्या नेतृत्वात गावकऱ्यांनी वेकोलि अधिकाऱ्यांना दिलेला आहे.

बॉक्स

आरटीओ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

वेकोलिच्या कोळसा खाणीतून होणारी ओव्हरलोड वाहतूक जीवघेणी आहे. गोवरी-पोवनी-कवठाळा मार्गावर मोठ्या प्रमाणात अपघातांत वाढ झाली आहे. डोळ्यादेखत ओव्हरलोड वाहतूक होत आहे. ओव्हरलोड वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी आरटीओ विभागाची आहे. मात्र आरटीओ व पोलीस विभागाचे याकडे कायमचे दुर्लक्ष होत आहे.

180921\img_20210918_162521.jpg~180921\img_20210918_162310.jpg

गोवरी_पोवनी वासियांनी पुन्हा वेकोलिची ओव्हरलोड कोळसा वाहतूक रोखली~गोवरी_पोवनी वासियांनी पुन्हा वेकोलिची ओव्हरलोड कोळसा वाहतूक रोखली