शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

विजेची मागणी वाढल्याने ‘महानिर्मिती’वर कोळशाचे संकट

By राजेश मडावी | Updated: September 20, 2023 16:31 IST

वीजनिर्मिती घटणार : चार केंद्रांत पाच दिवस पुरेल एवढाच कोळसा

चंद्रपूर : पावसाने उसंत दिल्याने उष्णता वाढली. त्यातच विजेची मागणी वाढली असताना वीज केंद्रांमध्ये आवश्यक कोळशाचा साठा उपलब्ध नाही. राज्यातील चार केंद्रांत तर पाच दिवस पुरेल एवढाच कोळसा आहे. त्यामुळे वीजनिर्मिती ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली. दरम्यान, ‘महानिर्मिती’ने कोळसा मिळविण्यासाठी हालचाली सुरू केल्याची माहिती सूत्राने दिली.

राज्यात ‘महानिर्मिती’च्या औष्णिक वीज प्रकल्पांची क्षमता ९ हजार ५०० मेगावॉटच्या घरात आहे. सध्या महानिर्मिती सहा ते सात हजार मेगावॉट एवढी वीजनिर्मिती करीत आहे. यासाठी दररोज जवळपास एक लाख मेट्रिक टन कोळसा लागतो. महानिर्मितीकडे सध्या साडेआठ लाख मेट्रिक टन कोळसा आहे. मात्र, नशिक आणि कोराडी वीज केंद्र वगळता इतर पाच वीज केंद्रांत चार-पाच दिवस पुरेल एवढा कोळसा आहे.

त्यामुळे कोळसा खाणीत पावसाचे पाणी शिरल्यास किंवा रेल्वेच्या तांत्रिक अडचणींमुळे वाहतुकीत अडथळा निर्माण होऊन कोळसा पुरवठा ठप्प झाल्यास महानिर्मितीला पुरेशी वीजनिर्मिती करणे कठीण होणार आहे. औष्णिक वीज केंद्रातून अखंडितपणे वीजनिर्मिती करता यावी, म्हणून केंद्रात सात दिवस पुरेल एवढ्या कोळशाचा साठा ठेवावा लागतो. त्यापेक्षा कोळशाचा साठा खाली आल्यास क्रिटिकल परिस्थिती, तर चार दिवसांपेक्षा कमी कोळसा उपलब्ध असल्यास सुपर क्रिटिकल परिस्थिती समजली जाते.

वीज केंद्रनिहाय उपलब्ध कोळसा

खापरखेडा, परळी, चंद्रपूर, भुसावळ या चार वीजनिर्मिती केंद्रात ५ दिवस पुरेल एवढाच कोळसा शिल्लक आहे. पारस केंद्रात ४ दिवस, नाशिक केंद्रात ८ दिवस, तर कोराडी वीज केंद्रामध्ये ९-१० दिवस पुरेल एवढा कोळसा शिल्लक असल्याने वेळेवर उपलब्ध झाले नाही तर उत्पादन ठप्प होऊ शकते.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर