शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

विजेची मागणी वाढल्याने ‘महानिर्मिती’वर कोळशाचे संकट

By राजेश मडावी | Updated: September 20, 2023 16:31 IST

वीजनिर्मिती घटणार : चार केंद्रांत पाच दिवस पुरेल एवढाच कोळसा

चंद्रपूर : पावसाने उसंत दिल्याने उष्णता वाढली. त्यातच विजेची मागणी वाढली असताना वीज केंद्रांमध्ये आवश्यक कोळशाचा साठा उपलब्ध नाही. राज्यातील चार केंद्रांत तर पाच दिवस पुरेल एवढाच कोळसा आहे. त्यामुळे वीजनिर्मिती ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली. दरम्यान, ‘महानिर्मिती’ने कोळसा मिळविण्यासाठी हालचाली सुरू केल्याची माहिती सूत्राने दिली.

राज्यात ‘महानिर्मिती’च्या औष्णिक वीज प्रकल्पांची क्षमता ९ हजार ५०० मेगावॉटच्या घरात आहे. सध्या महानिर्मिती सहा ते सात हजार मेगावॉट एवढी वीजनिर्मिती करीत आहे. यासाठी दररोज जवळपास एक लाख मेट्रिक टन कोळसा लागतो. महानिर्मितीकडे सध्या साडेआठ लाख मेट्रिक टन कोळसा आहे. मात्र, नशिक आणि कोराडी वीज केंद्र वगळता इतर पाच वीज केंद्रांत चार-पाच दिवस पुरेल एवढा कोळसा आहे.

त्यामुळे कोळसा खाणीत पावसाचे पाणी शिरल्यास किंवा रेल्वेच्या तांत्रिक अडचणींमुळे वाहतुकीत अडथळा निर्माण होऊन कोळसा पुरवठा ठप्प झाल्यास महानिर्मितीला पुरेशी वीजनिर्मिती करणे कठीण होणार आहे. औष्णिक वीज केंद्रातून अखंडितपणे वीजनिर्मिती करता यावी, म्हणून केंद्रात सात दिवस पुरेल एवढ्या कोळशाचा साठा ठेवावा लागतो. त्यापेक्षा कोळशाचा साठा खाली आल्यास क्रिटिकल परिस्थिती, तर चार दिवसांपेक्षा कमी कोळसा उपलब्ध असल्यास सुपर क्रिटिकल परिस्थिती समजली जाते.

वीज केंद्रनिहाय उपलब्ध कोळसा

खापरखेडा, परळी, चंद्रपूर, भुसावळ या चार वीजनिर्मिती केंद्रात ५ दिवस पुरेल एवढाच कोळसा शिल्लक आहे. पारस केंद्रात ४ दिवस, नाशिक केंद्रात ८ दिवस, तर कोराडी वीज केंद्रामध्ये ९-१० दिवस पुरेल एवढा कोळसा शिल्लक असल्याने वेळेवर उपलब्ध झाले नाही तर उत्पादन ठप्प होऊ शकते.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर