शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
4
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
5
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
6
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
7
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
8
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
9
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
10
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
11
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
12
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
13
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
17
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
18
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
20
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

विजेची मागणी वाढल्याने ‘महानिर्मिती’वर कोळशाचे संकट

By राजेश मडावी | Updated: September 20, 2023 16:31 IST

वीजनिर्मिती घटणार : चार केंद्रांत पाच दिवस पुरेल एवढाच कोळसा

चंद्रपूर : पावसाने उसंत दिल्याने उष्णता वाढली. त्यातच विजेची मागणी वाढली असताना वीज केंद्रांमध्ये आवश्यक कोळशाचा साठा उपलब्ध नाही. राज्यातील चार केंद्रांत तर पाच दिवस पुरेल एवढाच कोळसा आहे. त्यामुळे वीजनिर्मिती ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली. दरम्यान, ‘महानिर्मिती’ने कोळसा मिळविण्यासाठी हालचाली सुरू केल्याची माहिती सूत्राने दिली.

राज्यात ‘महानिर्मिती’च्या औष्णिक वीज प्रकल्पांची क्षमता ९ हजार ५०० मेगावॉटच्या घरात आहे. सध्या महानिर्मिती सहा ते सात हजार मेगावॉट एवढी वीजनिर्मिती करीत आहे. यासाठी दररोज जवळपास एक लाख मेट्रिक टन कोळसा लागतो. महानिर्मितीकडे सध्या साडेआठ लाख मेट्रिक टन कोळसा आहे. मात्र, नशिक आणि कोराडी वीज केंद्र वगळता इतर पाच वीज केंद्रांत चार-पाच दिवस पुरेल एवढा कोळसा आहे.

त्यामुळे कोळसा खाणीत पावसाचे पाणी शिरल्यास किंवा रेल्वेच्या तांत्रिक अडचणींमुळे वाहतुकीत अडथळा निर्माण होऊन कोळसा पुरवठा ठप्प झाल्यास महानिर्मितीला पुरेशी वीजनिर्मिती करणे कठीण होणार आहे. औष्णिक वीज केंद्रातून अखंडितपणे वीजनिर्मिती करता यावी, म्हणून केंद्रात सात दिवस पुरेल एवढ्या कोळशाचा साठा ठेवावा लागतो. त्यापेक्षा कोळशाचा साठा खाली आल्यास क्रिटिकल परिस्थिती, तर चार दिवसांपेक्षा कमी कोळसा उपलब्ध असल्यास सुपर क्रिटिकल परिस्थिती समजली जाते.

वीज केंद्रनिहाय उपलब्ध कोळसा

खापरखेडा, परळी, चंद्रपूर, भुसावळ या चार वीजनिर्मिती केंद्रात ५ दिवस पुरेल एवढाच कोळसा शिल्लक आहे. पारस केंद्रात ४ दिवस, नाशिक केंद्रात ८ दिवस, तर कोराडी वीज केंद्रामध्ये ९-१० दिवस पुरेल एवढा कोळसा शिल्लक असल्याने वेळेवर उपलब्ध झाले नाही तर उत्पादन ठप्प होऊ शकते.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर