शहरं
Join us  
Trending Stories
1
इंग्रज ढासळले...! ब्रिटिश इंडियन्स, उद्योजक ब्रिटन सोडू लागले! अब्जाधीश हरमन नरुला दुबईला स्थायिक होणार
2
"आता मैदान मोकळं, बघू कोण येतंय!"; संरक्षणातील पोलिसांना परत पाठवत जरांगेंचे आव्हान
3
जम्मूमध्ये 'काश्मीर टाईम्स'च्या कार्यालयावर SIA चा मोठा छापा; AK-47 च्या गोळ्या आणि ग्रेनेडचा लिव्हर जप्त!
4
बाजारात तेजीचा डबल धमका! निफ्टी वर्षभरानंतर २६,२०० पार, गुंतवणूकदारांची ६८,००० कोटींची कमाई
5
Red Fort Blast: दिल्लीतील स्फोट प्रकरणात आणखी चार प्रमुख आरोपींना अटक, एनआयएची मोठी कारवाई
6
सप्तपदी झाले, डीजेवर नाचली, पाठवणीच्या वेळी पसार, नवरदेव म्हणतो, "जमीन गहाण ठेवून लग्न..."
7
दिल्ली दंगल सूनियोजित कट होता; उमर खालिद-शरजील इमामच्या जामिनास पोलिसांचा विरोध
8
अ‍ॅसिड हल्ल्यातील 'ममता'चा अखेर मृत्यू; फेसबुकवर वेदना मांडणाऱ्या आईची दोन मुले झाली पोरकी
9
नेपाळमध्ये पुन्हा एकदा Gen-Z रस्त्यावर उतरले, मोठा गोंधळ सुरू; कर्फ्यू लागू
10
EVM मध्ये ३६ मतांची आघाडी, पण ३६० पोस्टल मते बाद झाली आणि पारडे फिरले, बिहारमधील अजब निकाल चर्चेत
11
Supreme Court: संसद न्यायालयीन निर्णयावर कुरघोडी करू शकत नाही; लवाद सुधारणा कायद्याच्या तरतुदी सुप्रीम कोर्टाकडून रद्द
12
रॅपिडो ड्रायव्हर महिन्याला कमावतोय १ लाख रुपये, उत्पन्नाचे स्रोत वाचून बसेल धक्का
13
...याचं फळ म्हणून मला एकटं पाडलं का?; शहाजीबापू संतापले, मुख्यमंत्र्यांना विचारला थेट सवाल
14
"AI मुळे असे दिवस येतील की, ना नोकरी गरज असेल, ना पैशांची", एलन मस्क यांची मोठी भविष्यवाणी
15
"मी रुतबीला फिरायला नेतो..."; दीड वर्षांच्या लेकीला वडिलांनी फेकलं नदीत, हवा होता मुलगा
16
'धुरंधर' सिनेमात 'भाबीजी घर पर है' फेम सौम्या टंडनची एन्ट्री, म्हणाली - "माझ्या सीन्सकडे..."
17
होम लोन स्वस्त आणि पर्सनल लोन महाग का असतं? बँका का ठेवतात व्याजदरात फरक, जाणून घ्या
18
“दिल्ली स्फोटानंतर काश्मिरींकडे संशयाने पाहिले जातेय”; ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केली खंत
19
मुंबईचा महापौर मराठी माणूस करणार का?; आशिष शेलारांचं उत्तर व्हायरल, "भाजपाचा महापौर हा..."
20
लोकलमध्ये हिंदीत बोलल्याने टोळक्याकडून मारहाण, व्यथित झालेल्या विद्यार्थ्याने संपवलं जीवन   
Daily Top 2Weekly Top 5

ढगाळ वातावरणाचा हरभरा पिकाला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:39 IST

चंद्रपूर : जिल्ह्यात काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने हरभरा पिकावर अळीचा प्रादूर्भाव झाला. या वातावरणामुळे हरभरा पीक वाया ...

चंद्रपूर : जिल्ह्यात काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने हरभरा पिकावर अळीचा प्रादूर्भाव झाला. या वातावरणामुळे हरभरा पीक वाया जाण्याची भिती शेतक-यांनी वर्तविली आहे.

यावर्षी सुरुवातीला शेतकºयांना ओल्या दुष्काळाचा सामना करावा लागला. यानंतर परतीच्या अवकाळी पावसाने घात केला. खरीप हंगामातील पिके ऐन कापणीच्या अवस्थेत असतानाच पावसाने थैमान घातले. त्यामुळे शेतकºयांचे मोठे नुकसान झाले.

या संकटातून सावरुन शेतकºयांनी उधार-उसणवारी करीत रब्बी हंगामातील गहू, हरभरा या पिकाची पेरणी केली. जिल्ह्यात हरभरा पिकाचा पेरा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र काही दिवसांपासून ढगाळ वातावरण व पहाटे पडणारे दाट धुके पडत आहेत. अशा हवामान बदलामुळे या पिकाला जोरदार फटका बसण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. खरीपातून पुरेसे उत्पन्न मिळाले नाही. त्यामुळे रब्बी पिकही वाया जाते की काय अशी भीती शेतक-यांना सतावत आहे.

यावर्षी निसर्गाने साथ न दिल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अशीच स्थिती राहिल्यास शेतक-यांनी जगायचे कसे, असा प्रश्न विचारला जात आहे.

कृषी विभागाकडून सर्वेक्षण

वरोरा, भद्रावती, गोंडपिपरी, राजुरा, मूल, सिंदेवाही, नागभीड तालुक्यातील शेतक-यांनी कीडीबाबत माहिती दिल्यानंतर कृषी विभागाच्या पथकाने सर्वेक्षण सुरू केले. अन्य तालुक्यातही हेच वातावरण असल्याने जिल्ह्यात सर्वत्रं मोहीम सुरू करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.