शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

ढगाळ वातावरणाचा हरभरा पिकाला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:39 IST

चंद्रपूर : जिल्ह्यात काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने हरभरा पिकावर अळीचा प्रादूर्भाव झाला. या वातावरणामुळे हरभरा पीक वाया ...

चंद्रपूर : जिल्ह्यात काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने हरभरा पिकावर अळीचा प्रादूर्भाव झाला. या वातावरणामुळे हरभरा पीक वाया जाण्याची भिती शेतक-यांनी वर्तविली आहे.

यावर्षी सुरुवातीला शेतकºयांना ओल्या दुष्काळाचा सामना करावा लागला. यानंतर परतीच्या अवकाळी पावसाने घात केला. खरीप हंगामातील पिके ऐन कापणीच्या अवस्थेत असतानाच पावसाने थैमान घातले. त्यामुळे शेतकºयांचे मोठे नुकसान झाले.

या संकटातून सावरुन शेतकºयांनी उधार-उसणवारी करीत रब्बी हंगामातील गहू, हरभरा या पिकाची पेरणी केली. जिल्ह्यात हरभरा पिकाचा पेरा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र काही दिवसांपासून ढगाळ वातावरण व पहाटे पडणारे दाट धुके पडत आहेत. अशा हवामान बदलामुळे या पिकाला जोरदार फटका बसण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. खरीपातून पुरेसे उत्पन्न मिळाले नाही. त्यामुळे रब्बी पिकही वाया जाते की काय अशी भीती शेतक-यांना सतावत आहे.

यावर्षी निसर्गाने साथ न दिल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अशीच स्थिती राहिल्यास शेतक-यांनी जगायचे कसे, असा प्रश्न विचारला जात आहे.

कृषी विभागाकडून सर्वेक्षण

वरोरा, भद्रावती, गोंडपिपरी, राजुरा, मूल, सिंदेवाही, नागभीड तालुक्यातील शेतक-यांनी कीडीबाबत माहिती दिल्यानंतर कृषी विभागाच्या पथकाने सर्वेक्षण सुरू केले. अन्य तालुक्यातही हेच वातावरण असल्याने जिल्ह्यात सर्वत्रं मोहीम सुरू करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.