शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
3
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
4
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
5
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
6
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
7
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
8
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
9
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
10
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
11
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
12
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
13
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
14
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
15
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
16
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
17
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
18
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
19
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
20
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरात जल्लोष

By admin | Updated: November 9, 2014 22:29 IST

खासदार हंसराज अहीर यांनी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. तब्बल २४ वर्षानंतर जिल्ह्याला केंद्रात स्थान

साजरी झाली पुन्हा दिवाळी : हंसराज अहीर यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेशचंद्रपूर : खासदार हंसराज अहीर यांनी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. तब्बल २४ वर्षानंतर जिल्ह्याला केंद्रात स्थान मिळाल्याचा आनंद कार्यकर्त्यांसह नागरिकांनाही झाला. विशेष म्हणजे, एकाच वॉर्डात केंद्रीय राज्यमंत्री हंजराज अहीर आणि राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार असल्याने जिल्ह्याचाच नाही तर विदर्भाचा विकास आता सहज शक्य असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या. रविवारी खासदार हंसराज अहीर यांच्या निवासस्थानासमोर कार्यकर्त्यांची गर्दी उसळली होती. फटाक्याच्या आतिषबाजी करून जल्लोष करण्यात आला. चंद्रपूर शहरासह जिल्ह्यातही हा आनंदोत्सव साजरा झाला. त्यामुळे पुन्हा एकदा दिवाळी आली की काय, असा भास होत होता.तब्बल चारवेळा खासदार म्हणून निवडून आल्यानंतर हंसराज अहीर यांना केंद्रात स्थान मिळाले आहे. यापूर्वी केंद्रात काँग्रेसचे सरकार असताना त्यांनी कोळसा घोटाळा, कोलगेट घोटाळा उघडकीस आणून सरकारला चौकशी समिती नेमण्यास भाग पाडले होते. त्यांच्या कामाची दखल मोदी सरकारने घेत कामाची पावती म्हणून त्यांना केंद्रातील मंत्रीमंडळात स्थान दिले आहे. तगडा जनसंपर्क आणि सामान्यांचा नेता अशी ओळख असलेल्या अहीर यांना केंद्रातील मंत्रीपद मिळाल्यामुळे नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.मंत्रीमंडळातील त्यांचे स्थान दोन दिवसापूर्वीच निश्चित झाले होते. तत्पूर्वी त्यांना पंतप्रधानांच्या कार्यालयातून दिल्ली येथे उपस्थित राहण्याचे निमंत्रण आले होते. तेव्हापासूनच चंद्रपूर जिल्ह्यात आनंद व्यक्त केला जात होता. दरम्यान रविवारी शपथविधी सोहळ्यानंतर गावागावांत फटाके तथा मिठाई वाटून भाजपा पदाधिकारी तसेच नागरिकांनी आनंदोत्सव साजरा केला.चंद्रपुरातील गोल बाजार परिसरात असलेल्या हंसराज अहीर यांच्या घरी रविवारी सकाळपासूनच कार्यकर्त्यांनी गर्दी केली. शपथविधी आटोपल्यानंतर ढोल ताशाच्या गजरात कार्यकर्त्यांनी शहरातून मिरवणूक काढली. कस्तुरबा चौकामध्ये प्रचंड आतिषबाजी करण्यात आली. त्यानंतर गांधी चौक, जेटपुरा गेट मार्गे शहरात मिरवणूक काढण्यात आली. बल्लारपूर, वरोरा, राजुरा, भद्रावती, कोरपनासह गावागावांत कार्यकर्त्यांनी मिरवणूक काढली. अनेकांनी पेढे वाटले. कस्तुरबा चौकामध्ये कार्यकर्त्यांनी वाहनधारकांना थांबवून पेढे वाटले. (नगर प्रतिनिधी)