शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
3
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
4
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
5
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
6
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
7
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
8
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
9
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
10
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
11
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
12
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
13
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
14
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
15
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
16
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
17
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
18
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
19
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
20
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
Daily Top 2Weekly Top 5

कोसंबी गावात अस्वच्छतेचा कळस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 21:51 IST

गावातील जनतेचे आरोग्य चांगले राहावे यासाठी ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात येते. ग्रामस्वच्छता अभियानापासून जनतेला स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न शासनस्तरावर केले जात असताना देखील .....

ठळक मुद्देग्रामपंचायतचे दुर्लक्ष : नागरिकांचे आरोग्य धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्कमूल : गावातील जनतेचे आरोग्य चांगले राहावे यासाठी ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात येते. ग्रामस्वच्छता अभियानापासून जनतेला स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न शासनस्तरावर केले जात असताना देखील मूल तालुक्यातील कोसंबी गावात अस्वच्छतेने कळस गाठल्याचे दिसून येते. याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याने गावात आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता बळावली आहे.दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत केंद्रशासन स्वच्छतेवर भर देवून जनतेचे आरोग्य सुधारण्याचा प्रयत्न करीत आहे. उघड्यावर शौचास बसणाºयांवर दंड आकारण्याचा फतवा देखील काढण्यात आला असून शौचालय बांधण्यावर भर दिला जात आहे. गावातील रस्त्याच्या कडेला अस्वच्छता दिसायला नको यासाठी शासनस्तरावर मार्गदर्शन केले जात आहे. मात्र मूल तालुक्यातील कोसंबी गाव अपवाद आहे. गावात अस्वच्छता असून जागोजागी शेणाचे ढिग दिसत आहेत. घराजवळच शेणाचे ढिग असल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण होणे स्वाभाविकच आहे.दरवर्षी २ आॅक्टोबर रोजी महात्मा गांधी यांच्या जयंतीपासून ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात येते. स्वच्छतेचा मूलमंत्र देण्याचा प्रयत्न शासन स्तरावरुन केला जात असतो. मात्र याकडे दुर्लक्ष केल्या जात असल्याने जनतेच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार यानिमित्ताने दिसून येत आहे. गावात स्वच्छता राहावी यासाठी कोसंबी गावात ग्रामपंचायतीने पुढाकार घेवून स्वच्छता अभियान राबवावा, जेणेकरून भविष्यातील लहान मुलांवर स्वच्छतेचे महत्त्व तसेच चांगले आरोग्य राखण्यासाठी स्वच्छता मदत होईल. त्यामुळे येथे स्वच्छता अभियान काळाची गरज असल्याचे या निमित्ताने नागरिकांना कळायला लागले आहे.