शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
4
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
5
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
6
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
7
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
8
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
9
धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
10
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
11
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
12
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
13
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
14
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
15
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
16
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
18
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
19
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
20
Air India Plane Crash Insurance Claim : अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?

कोसंबी गावात अस्वच्छतेचा कळस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 21:51 IST

गावातील जनतेचे आरोग्य चांगले राहावे यासाठी ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात येते. ग्रामस्वच्छता अभियानापासून जनतेला स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न शासनस्तरावर केले जात असताना देखील .....

ठळक मुद्देग्रामपंचायतचे दुर्लक्ष : नागरिकांचे आरोग्य धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्कमूल : गावातील जनतेचे आरोग्य चांगले राहावे यासाठी ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात येते. ग्रामस्वच्छता अभियानापासून जनतेला स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न शासनस्तरावर केले जात असताना देखील मूल तालुक्यातील कोसंबी गावात अस्वच्छतेने कळस गाठल्याचे दिसून येते. याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याने गावात आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता बळावली आहे.दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत केंद्रशासन स्वच्छतेवर भर देवून जनतेचे आरोग्य सुधारण्याचा प्रयत्न करीत आहे. उघड्यावर शौचास बसणाºयांवर दंड आकारण्याचा फतवा देखील काढण्यात आला असून शौचालय बांधण्यावर भर दिला जात आहे. गावातील रस्त्याच्या कडेला अस्वच्छता दिसायला नको यासाठी शासनस्तरावर मार्गदर्शन केले जात आहे. मात्र मूल तालुक्यातील कोसंबी गाव अपवाद आहे. गावात अस्वच्छता असून जागोजागी शेणाचे ढिग दिसत आहेत. घराजवळच शेणाचे ढिग असल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण होणे स्वाभाविकच आहे.दरवर्षी २ आॅक्टोबर रोजी महात्मा गांधी यांच्या जयंतीपासून ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात येते. स्वच्छतेचा मूलमंत्र देण्याचा प्रयत्न शासन स्तरावरुन केला जात असतो. मात्र याकडे दुर्लक्ष केल्या जात असल्याने जनतेच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार यानिमित्ताने दिसून येत आहे. गावात स्वच्छता राहावी यासाठी कोसंबी गावात ग्रामपंचायतीने पुढाकार घेवून स्वच्छता अभियान राबवावा, जेणेकरून भविष्यातील लहान मुलांवर स्वच्छतेचे महत्त्व तसेच चांगले आरोग्य राखण्यासाठी स्वच्छता मदत होईल. त्यामुळे येथे स्वच्छता अभियान काळाची गरज असल्याचे या निमित्ताने नागरिकांना कळायला लागले आहे.