शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

संकटाच्या काळात ग्राहकांची आर्थिक लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 05:01 IST

चंद्रपुरात दोन दिवसापूर्वी साखर ३६ रुपये प्रति किलो होती तर खाद्यतेल (सोयाबीन) ९० ते ९५ रुपये प्रती किलो मिळायचे. सद्या साखरेचे भाव ४० ते ४२ रुपये प्रती किलो झाले असून खाद्यतेल (सोयाबीन) ११० ते ११५ रुपये प्रती किलो मिळत आहेत. विशेष म्हणजे, ग्रामीण भागातील नागरिक या दोन्ही बाबी पॅकींग केलेल्या वापरत नसल्याने त्यांना या दोन्ही वस्तूंच ‘एमआरपी’ कळायला मार्ग नाही. सोबतच भाजीपाल्याच्या किमतीही वाढल्या आहेत. पूर्वी १० ते ५ रूपये पाव मिळणारा भाजीपाला आता २० ते २५ रुपये पाव विकला जात आहे. शासनाने जीवनावश्यक वस्तू आणि भाजीपाल्याच्या वाहतुकीला परवानगी दिली आहे.

ठळक मुद्देनागरिकांमध्ये संताप : प्रशासनाने प्रतिबंध घालण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : संचारबंदी आणि लॉकडाऊनमुळे दळणवळण ठप्प झाले. त्यातच दुकानदारांनी जीवनश्यक वस्तूंच्या आणि भाजीपाल्यांच्या किंमतीत वाढ केली आहे. संकटाच्या काळात सामान्य नागरिकांना लुटण्याचा हा प्रकार असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.चंद्रपुरात दोन दिवसापूर्वी साखर ३६ रुपये प्रति किलो होती तर खाद्यतेल (सोयाबीन) ९० ते ९५ रुपये प्रती किलो मिळायचे. सद्या साखरेचे भाव ४० ते ४२ रुपये प्रती किलो झाले असून खाद्यतेल (सोयाबीन) ११० ते ११५ रुपये प्रती किलो मिळत आहेत. विशेष म्हणजे, ग्रामीण भागातील नागरिक या दोन्ही बाबी पॅकींग केलेल्या वापरत नसल्याने त्यांना या दोन्ही वस्तूंच ‘एमआरपी’ कळायला मार्ग नाही. सोबतच भाजीपाल्याच्या किमतीही वाढल्या आहेत. पूर्वी १० ते ५ रूपये पाव मिळणारा भाजीपाला आता २० ते २५ रुपये पाव विकला जात आहे. शासनाने जीवनावश्यक वस्तू आणि भाजीपाल्याच्या वाहतुकीला परवानगी दिली आहे. डिस्ट्रिब्युटर आणि डीलर आपल्याला एमआरपीमध्ये त्या वस्तू देत असल्याने त्याची विक्री नाईलाजास्तव चढ्या भावाने करावी लागत असल्याच्या प्रतिक्रिया काही किराणा दुकानदारांनी बोलताना व्यक्त केल्या आहेत. कोरोनामुळे शेतीच्या कामाला मजूर मिळत नाही. मिळाल्यास त्यांना अधिक मजूरी द्यावी लागते. त्यामुळे भाजीपाल्याचे भाव वाढले. आम्ही नाईलाज म्हणून दर वाढविला असल्याचे काही भाजीपाला उत्पादकांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. मात्र, जिल्ह्यातील नागरिक संकटात सापडले आहेत. अशा कठीण काळात नफेखोरीला महत्व न देता सामान्य नागरिकांची ही आर्थिक लूट थांबवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.एसी, कूलर वापराला लागलेत ‘ब्रेक’चंद्रपूर : राज्यात कोरोनाने काहूर माजविले. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी एसी व कूलरचा वापर करू नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यासोबतच वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी केले आहे. त्यामुळे ही उपकरणे अडगळीतच पडली आहेत. लॉकडाऊनमुळे खरेदीलाही ब्रेक लागले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भात साधारणत: महाशिवरात्रीनंतर वातावरणात बदल होतो. चंद्रपुरात तर धूळवडीनंतर उन्हाचे चटके जाणवायला लागतात. मात्र, मध्यंतरीच्या काळात काही भागात अवकाळी पावसाने झोडपून काढले. त्यामुळे पारा वाढला नाही. कोरोना विषाणूचा राज्यातही मोठ्या प्रमाणावर फैलाव होत आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि खबरदारी म्हणून कूलर, एसीचा वापर टाळण्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी आवाहन केले आहे. यामुळेच मार्चमध्येच घरोघरी लागणारे कुलर अद्याप अडगळीत आहेत. एसीही भिंतीची केवळ शोभा वाढवताना दिसत आहेत. साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या गुढीपाडव्याला टीव्ही, रेफ्रिजरेटर, एसी, कूलर, आदींसह वाहनांची मोठी खरेदी होते. यातून बाजारपेठेत कोट्यवधींची उलाढाल होते. मात्र यावेळी गुढीपाडव्यावरही कोरोनाचे सावट असल्याने ही उलाढाल होऊ शकली नाही. त्यामुळे इलेक्ट्रानिक साधने व्यवसायालाही मोठा आर्थिक फटका बसला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या