शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

वरोऱ्यात स्वच्छता अभियानाचा फज्जा

By admin | Updated: June 20, 2016 00:40 IST

शहराची लोकसंख्या लक्षात घेता येथील नागरिकांना मुुलभूत सुविधेपासून वंचित राहावे लागत आहे.

सांडपाणी रस्त्यावर : साफसफाईकडेही नगरपालिकेचे दुर्लक्षवरोरा : शहराची लोकसंख्या लक्षात घेता येथील नागरिकांना मुुलभूत सुविधेपासून वंचित राहावे लागत आहे. सांडपाण्याच्या समस्येसह सध्या अनेक समस्यांनी शहराला ग्रासले आहे. नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांकडून साफसफाई करण्यास टाळाटाळ होत आहे. काही भागात नियमित घंटागाडी येत नसल्याने ओला व सुखा कचरा पसरून दुर्गंधी येत असल्याच्या तक्रारीही नागरिकातून व्यक्त होत आहे.शहरातील राममंदिर वॉर्डातील जमीन लेवलला असणाऱ्या नालीचे पाणी रस्त्यावर साचून राहत असल्याने ऐन उन्हाळ्यातही दुर्गंधीयुक्त पाण्याचा निचरा होत आहे. याची माहिती मागील काही वर्षांपासून वारंवार लोकप्रतिनिधीसह नगर परिषद कर्मचाऱ्यांना दिली जात आहे. तरीही याकडे त्यांच्याकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे निदर्शनास येते. सफाई कामगारांना नाली साफ करण्याबाबत सांगितले असता त्यांच्याकडून चालढकल केली जात असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे. परिणामी नाली भरुन पाणी रस्त्यावरुन वाहत असल्याचे सर्वत्र दिसून येत आहे. याच रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून नागरिकांना ये- जा करावी लागत आहे. घरासमोरच सांडपाणी वाहत असल्याने आरोग्य धोक्यात आले आहे. अनेकदा याची माहिती न.प. कर्मचाऱ्यांना, नगरसेवकांना देऊनही जाणूनबुजून ही कामे टाळली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.शहरातील मुख्य मार्गावर डोंगरवार चौक ते बँक आॅफ इंडियासमोरील नाली ही ठिकठिकाणावरुन बंद असून कचऱ्याचा ढिग साचलेला दिसतो. त्यामुळे पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचल्याचे चित्र पहावयास मिळते. शहरात शहीद शेडमाके चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत ड्रेनेजचे बांधकाम करण्यात आले. त्या बांधकामाला अंदाजे दोन वर्षांचा कालावधी होत असताना अजूनपर्यंत साफसफाई न केल्यामुळे त्यातून निघणाऱ्या उग्र वासामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. काही भागात अद्यापही नाल्या न बांधल्यामुळे कच्चा नाल्यांच्या कडेला मुंगूस, घुस यांनी बिळे केली आहेत. परिणामी नाल्या तुंबून किटकांची उत्पत्ती होत आहे. शिवाय इतर नाल्यांमध्ये काळेकुट पाणी, प्लॉस्टिक आणि अन्य टाकावू वस्तु तुंबून गेल्या आहेत. लोकप्रतिनिधीकडून आश्वासनाशिवाय कामाची अपेक्षा करणे व्यर्थ आहे. कारण ज्या मुलभूत सुविधांसाठी आदी खर्च करायला पाहिजे, ते न करता एकाच कामावर अनेकदा लोकांच्या पैशाची उधळण करणारे लोकप्रतिनिधी नगर परिषदेमध्ये असल्याने शहराचे वाटोळे होत आहे. असे काही नागरिकांनी बोलून दाखविले. पावसाळ्याचे दिवस असल्याने रोगराईला आमंत्रण देण्यापेक्षा शहरातील नाल्यांची सफाई केल्यास नागरिकांच्या हिताचे ठरेल.गेल्या तीन महिन्यांपासून औषध फवारणीही करण्यात आलेली नाही आणि केल्यास ती इतकी थातूरमातूर असते की सकाळी औषध फवारल्यानंतर दुपारपर्यंत माश्या, डास यांचे आमगन होते. औषध फवारणीचा केवळ देखावा नगरपरिषदेकडून केला जातो. पावसाळ्यापूर्वीच साचलेल्या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे परिसरात डासांचे प्रमाण वाढले असून ताप, अशक्तपणा, उलट्या, हगवण व डेंग्युचे लक्षणे असणारे आजार उद्भवत आहेत. पावसापूर्वीच नगरपालिकेकडून त्वरित या समस्येचे निवारण करण्यात यावे, अशी मागणी आहे. (शहर प्रतिनिधी)