शहरं
Join us  
Trending Stories
1
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
2
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
3
धक्कादायक! राजस्थानमधील झालावाड शाळेतील दुर्घटनेनंतर आणखी एक निष्काळजीपणा, विद्यार्थ्याचे टायर पेटवून अंत्यसंस्कार
4
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
5
गृहकर्जावरील व्याज अनुदान; सविस्तर जाणून घ्या, मोदी सरकारची ही खास योजना; पूर्ण होईल घर घेण्याचं स्वप्न!
6
पहिला श्रावणी रविवार: वैभवप्राप्तीसाठी आदित्य राणूबाई व्रत; वाचा व्रतविधी आणि द्या खिरीचा नैवेद्य!
7
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  
8
Shravan Somvar 2025: महादेवाला वाहिलेले बेलाचे पान टाकू नका, तेच करेल धनवृद्धी!
9
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
10
ओठ फुटलेत, कोरडे झालेत... ओठांना मॉइश्चरायझ करण्यासाठी लिप बाम की ऑइल काय आहे बेस्ट?
11
"मला दु:ख आहे की मी अशा सरकारला पाठिंबा देतोय जे..."; चिराग पासवान यांची संतप्त प्रतिक्रिया
12
१७ वर्ष जुनी कंपनी आणतेय IPO, SEBI कडे केला अर्ज; BSE आणि NSE मध्ये लिस्टिंगची शक्यता
13
Period Pain : ‘तिच्या’ आयुष्यातील ‘ते’ चार दिवस; कोवळ्या कळ्यांना पाळीचा अर्थ समजावताना कुठे कमी पडतोय आपण?
14
चीन नंबर १ आणि भारत दुसऱ्या क्रमांकावर, ही कोणती यादी ज्यात अमेरिका-इंडो​नेशिया आणि तुर्कीही राहिले मागे
15
भारत-यूके मुक्त व्यापार कराराने लक्झरी कारच्या किंमती दणक्यात कमी होणार; या वाहनांना मोठा फायदा मिळणार; तुमचा विश्वास बसणार नाही!
16
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
17
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
18
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
19
माता न तू वैरिणी! बिर्याणीवाल्याच्या प्रेमात वेडी झाली टिकटॉक स्टार, पोटच्या लेकरांना संपवलं अन्...
20
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड

वरोऱ्यात स्वच्छता अभियानाचा फज्जा

By admin | Updated: June 20, 2016 00:40 IST

शहराची लोकसंख्या लक्षात घेता येथील नागरिकांना मुुलभूत सुविधेपासून वंचित राहावे लागत आहे.

सांडपाणी रस्त्यावर : साफसफाईकडेही नगरपालिकेचे दुर्लक्षवरोरा : शहराची लोकसंख्या लक्षात घेता येथील नागरिकांना मुुलभूत सुविधेपासून वंचित राहावे लागत आहे. सांडपाण्याच्या समस्येसह सध्या अनेक समस्यांनी शहराला ग्रासले आहे. नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांकडून साफसफाई करण्यास टाळाटाळ होत आहे. काही भागात नियमित घंटागाडी येत नसल्याने ओला व सुखा कचरा पसरून दुर्गंधी येत असल्याच्या तक्रारीही नागरिकातून व्यक्त होत आहे.शहरातील राममंदिर वॉर्डातील जमीन लेवलला असणाऱ्या नालीचे पाणी रस्त्यावर साचून राहत असल्याने ऐन उन्हाळ्यातही दुर्गंधीयुक्त पाण्याचा निचरा होत आहे. याची माहिती मागील काही वर्षांपासून वारंवार लोकप्रतिनिधीसह नगर परिषद कर्मचाऱ्यांना दिली जात आहे. तरीही याकडे त्यांच्याकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे निदर्शनास येते. सफाई कामगारांना नाली साफ करण्याबाबत सांगितले असता त्यांच्याकडून चालढकल केली जात असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे. परिणामी नाली भरुन पाणी रस्त्यावरुन वाहत असल्याचे सर्वत्र दिसून येत आहे. याच रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून नागरिकांना ये- जा करावी लागत आहे. घरासमोरच सांडपाणी वाहत असल्याने आरोग्य धोक्यात आले आहे. अनेकदा याची माहिती न.प. कर्मचाऱ्यांना, नगरसेवकांना देऊनही जाणूनबुजून ही कामे टाळली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.शहरातील मुख्य मार्गावर डोंगरवार चौक ते बँक आॅफ इंडियासमोरील नाली ही ठिकठिकाणावरुन बंद असून कचऱ्याचा ढिग साचलेला दिसतो. त्यामुळे पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचल्याचे चित्र पहावयास मिळते. शहरात शहीद शेडमाके चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत ड्रेनेजचे बांधकाम करण्यात आले. त्या बांधकामाला अंदाजे दोन वर्षांचा कालावधी होत असताना अजूनपर्यंत साफसफाई न केल्यामुळे त्यातून निघणाऱ्या उग्र वासामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. काही भागात अद्यापही नाल्या न बांधल्यामुळे कच्चा नाल्यांच्या कडेला मुंगूस, घुस यांनी बिळे केली आहेत. परिणामी नाल्या तुंबून किटकांची उत्पत्ती होत आहे. शिवाय इतर नाल्यांमध्ये काळेकुट पाणी, प्लॉस्टिक आणि अन्य टाकावू वस्तु तुंबून गेल्या आहेत. लोकप्रतिनिधीकडून आश्वासनाशिवाय कामाची अपेक्षा करणे व्यर्थ आहे. कारण ज्या मुलभूत सुविधांसाठी आदी खर्च करायला पाहिजे, ते न करता एकाच कामावर अनेकदा लोकांच्या पैशाची उधळण करणारे लोकप्रतिनिधी नगर परिषदेमध्ये असल्याने शहराचे वाटोळे होत आहे. असे काही नागरिकांनी बोलून दाखविले. पावसाळ्याचे दिवस असल्याने रोगराईला आमंत्रण देण्यापेक्षा शहरातील नाल्यांची सफाई केल्यास नागरिकांच्या हिताचे ठरेल.गेल्या तीन महिन्यांपासून औषध फवारणीही करण्यात आलेली नाही आणि केल्यास ती इतकी थातूरमातूर असते की सकाळी औषध फवारल्यानंतर दुपारपर्यंत माश्या, डास यांचे आमगन होते. औषध फवारणीचा केवळ देखावा नगरपरिषदेकडून केला जातो. पावसाळ्यापूर्वीच साचलेल्या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे परिसरात डासांचे प्रमाण वाढले असून ताप, अशक्तपणा, उलट्या, हगवण व डेंग्युचे लक्षणे असणारे आजार उद्भवत आहेत. पावसापूर्वीच नगरपालिकेकडून त्वरित या समस्येचे निवारण करण्यात यावे, अशी मागणी आहे. (शहर प्रतिनिधी)