शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे विधान असंवेदनशील नव्हते, तर...", कर्जमाफीबद्दलच्या वादग्रस्त विधानावर बाबासाहेब पाटलांचा खुलासा
2
VIDEO: "निवडून यायचं म्हणून आम्ही आश्वासने देतो"; सहकार मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर चोळलं मीठ, म्हणाले, "वेळ मारण्यासाठी..."
3
वयाच्या २३ व्या वर्षी 'शतकी रोमान्स'चा सिलसिला! यशस्वी जैस्वालनं कॅप्टन शुबमन गिलचा विक्रमही मोडला
4
छोटा राजनचा धाकटा भाऊ ठाकरेंच्या शिवसेनेत, प्रवेशावेळी उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
5
सासऱ्यांची ७ लाख कोटींची कंपनी, पत्नी अब्जाधीश; माजी पंतप्रधान मायक्रोसॉफ्टमध्ये करणार जॉब
6
इंजिनिअरच्या घरात सापडलं मोठं घबाड; नोटांचा ढीग आणि सोनं-चांदीही जप्त
7
सावधान! दिवाळीत तुमच्या घरीही येऊ शकतं 'विष'; 'अशी' झटपट ओळखा भेसळयुक्त मिठाई
8
भारताचे मोठे पाऊल! काबुलमधील दूतावास पुन्हा सुरू होणार, अफगाणिस्तानशी 'दहशतवादा'वर चर्चा
9
निष्काळजीपणाचा कळस! सिरपनंतर आता गोळ्या... लाखो मुलांना दिलं टेस्टमध्ये फेल झालेलं औषध
10
“CJI गवई दलित असल्यानेच सवर्णाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न, कारवाई व्हावी”: रामदास आठवले
11
डोनाल्ड ट्रम्प भारतीयांना आणखी एक धक्का देणार! H-1B व्हिसा नियमांमध्ये आणखी बदल करण्याची तयारी
12
Yashasvi Jaiswal Record : यशस्वीचा मोठा पराक्रम; गांगुली- द्रविडसह गिल अन् विराटलाही टाकले मागे
13
LG Electronics IPO: एलजी इलेक्ट्रॉनिक्स आयपीओचं आज अलॉटमेंट, तुम्हाला मिळालेत का शेअर्स? कसं चेक कराल?
14
हिंदू अभिनेत्याशी दुसरं लग्न केल्याने ट्रोल करणाऱ्यांना सारा खानचं सडेतोड उत्तर, म्हणाली- "आमचा धर्म..."
15
"ते माझ्यावर हसले...", ऑफिसमध्ये मानसिक आरोग्याबाबत तरुणीला आला वेदनादायी अनुभव
16
दिवाळी बोनसवर किती टॅक्स? रोख रक्कम, मिठाई की गिफ्ट व्हाउचर; कर नियमांबद्दलच्या 'या' चुका टाळा!
17
संजय राऊतांच्या गैरहजेरीत बैठका! ‘मातोश्री’वर केली महत्त्वाची खलबते, ठाकरे बंधूंनी डावललं?
18
KL राहुलनं सेंच्युरीत जमलं नाही ते केलं; पण क्लासला दांडी मारून आलेल्या चाहत्यांसमोर नको ते घडलं
19
प्लॅन A विष, प्लॅन B गोळीबार... नवऱ्याचा काटा काढण्यासाठी बायकोचा बॉयफ्रेंडसह भयंकर कट
20
...तर मग लाडक्या बहिणींना योजनेचे १५०० रुपये मिळणार नाहीत का? अजित पवारांनी दिले उत्तर

स्वच्छता अभियान नावापुरतेच?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 05:24 IST

महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी शहरातील काही भागांत राजकीय पक्षाच्या नेत्यांनी स्वच्छता भारत अभियानांतर्गत स्वच्छता मोहीम राबविली.

पुणे : महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी शहरातील काही भागांत राजकीय पक्षाच्या नेत्यांनी स्वच्छता भारत अभियानांतर्गत स्वच्छता मोहीम राबविली. मात्र, कचरा नसलेल्या ठिकाणी राजकीय नेत्यांकडून झाडू फिरवला जात असल्याचे दिसून येत आहे. केंद्र शासनातर्फे देशभर राबविल्या जाणाºया स्वच्छ भारत अभियानाचा उद्देश चांगला असला तरी त्याचा उपयोग केवळ राजकारण आणि प्रसिद्धीसाठी होत असल्याने त्यावर टीका होत आहे.देशातील नागरिकांचा राहणीमानाचा दर्जा वाढविण्यासाठी शासनातर्फे स्वच्छ भारत अभियान राबविले जात आहे. तसेच या अभियानास तीन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त १५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर या कालावधीत ‘स्वच्छता हीच सेवा’ ही मोहीम राबविण्यात यावी, अशा सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, केवळ महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्तच राजकीय पक्षाचे नेते रस्त्यावर उतरल्याचे दिसून आले. वर्षभर पहाटे उठून शहरात स्वच्छता करणाºया पालिकेच्या व स्वयंसेवी संस्थेच्या कामगारांचा नेत्यांना विसर पडल्याचे दिसून आले.गेल्या अनेक वर्षांपासून पुण्याच्या कचºयाचा प्रश्न सुटलेला नाही. शहरात दररोज जमा होणाºया सुमारे सोळाशे टन कचºयापैकी पालिकेतर्फे सुमारे ६०० ते ७०० टन कचºयावरच प्रक्रिया केली जात आहे. उर्वरित कचरा शहरालगतच्या कचरा डेपोत टाकला जात आहे. त्यातच कचरा गोळा करणाºया कामगारांच्या आरोग्याला हानी पोहेचू नये, यासाठी त्यांना आवश्यक साहित्य देण्याबाबत पालिका प्रशासनाकडून गांभीर्य दाखविले जात नाही. स्वच्छता राखणाºया कामगारांना नोकरीची शाश्वती नाही. नियमित वेतन देण्याबाबतही काळजी घेतली नाही.शहरातील पेठांमध्ये व उपनगरांमध्ये अनेक ठिकाणी कचरा पेटी तुडुंब भरून वाहत आहेत. रस्त्यालगतच्या कचरा पेटीसह गल्लीतील कचरा पेटीजवळ दुर्गंधी पसरली आहे. मात्र, या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्याऐवजी इतर ठिकाणीच झाडू घेऊन नेते फोटो काढून घेतले असल्याने सोशल मीडियावरूनही टीका केली आहे. स्वच्छता मोहिमेच्या कार्यक्रमात काही नेत्यांनी स्वत:ची ताकद दाखविण्याचाही प्रयत्न केला. त्यामुळे स्वच्छता अभियान हे नावापुरतेच राहिले का? असा प्रश्न उपस्थित झाला.