शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
4
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
5
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
6
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
7
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
8
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
9
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
10
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
11
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
12
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
13
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
14
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
15
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
16
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
17
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
18
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
19
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
20
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला

स्वच्छ भारत मिशनला चलनबंदीमुळे ‘ब्रेक’

By admin | Updated: December 22, 2016 01:42 IST

देश स्वच्छ आणि सुंदर व्हावा म्हणून पंतप्रधानांनी स्वच्छतेला प्राधान्य दिले आहे.

बँकाकडून धनादेशाची रक्कम देण्यास नकार सिंदेवाही : देश स्वच्छ आणि सुंदर व्हावा म्हणून पंतप्रधानांनी स्वच्छतेला प्राधान्य दिले आहे. इतकेच नव्हे तर नवीन नोटा छापताना त्यावर ‘स्वच्छ भारत’ असा संदेश लिहिला आहे. मात्र शासनाच्या चलनबंदीच्या आदेशाने स्वच्छता मिशनला ‘ब्रेक’ लागल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. स्वच्छतेची मोहिम हाती घेताना शौचालय निर्मितीला प्राधान्य देण्यात आले आहे. जे गाव गोदरीमुक्त आहे, अशाच गावाना या अभियानात भाग घेता येतो. यामुळे पहिली पात्रता पूर्ण करण्याकरिता प्रत्येक गाव आणि ग्राम पंचायत त्या दृष्टीने प्रयत्न करीत आहे. या प्रयत्नांना बँकेच्या नियमाने मोठा अडसर निर्माण केला आहे. कामाची गती मंदावल्याने स्वच्छता मिशनमध्ये प्रथम असणारे तालुके मागे पडत असल्याने दिसत आहे. घरी शौचालय बांधण्यासाठी स्वच्छ भारत आणि एमआरईजीएसमधून १२ ते १७ हजार रुपये दिले जातात. मात्र याकरिता एक अट आहे. पहिल्यांदा शौचालयाचे काम टप्प्या-टप्प्याने पूर्ण करायचे. त्यानुसार निधी वितरीत करण्यात येतो. शौचालय बांधण्याचे काम हाती घेणारे कुटुंबिय आर्थिक दृष्ट्या कुमकुवत आहे. यामुळे आजपर्यंत त्यांना शौचालय उभारता आले नाही. अशा स्थितीत योजनेत सहभाग घेतला गेला. इकडून- तिकडून काही पैसे गोळा झाले. मात्र बँकेचा धनादेश वढतच नाही. यामुळे नविन काम थांबले आहे. अनेक मजूर कामावर येण्यास तयार नाही. धनादेश मंजूर झाला असला तरी बँकेतून दोन हजारांवर लाभार्थ्यांचे पैसे निघत नाही. यातील बहुतांश लाभार्थी जिल्हा बँकेचे खातेदार आहे. यामुळे लाभार्थ्यांना दररोज तासन्तास बँकेत थांबावे लागत आहे. यानंतरही पैसे मिळण्याची शक्यता नाही, यामुळे कामे थांबली आहेत. (शहर प्रतिनिधी)