शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
2
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
3
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
4
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
5
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
6
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
7
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
8
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
9
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
10
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
11
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
12
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
13
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
14
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
15
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
16
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
17
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
18
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
19
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
20
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र

कपाशी जमिनीतून उमलण्यापूर्वीच कोमेजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2017 00:45 IST

पाऊस येईल, या आशेवर शेतकरी होते. या एकाच आशेवर शेतकऱ्यांनी पेरणी केली. त्यानंतर तुरळक पाऊस येऊन गायब झाला.

पावसाचा दगा : शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कायमप्रकाश काळे । लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : पाऊस येईल, या आशेवर शेतकरी होते. या एकाच आशेवर शेतकऱ्यांनी पेरणी केली. त्यानंतर तुरळक पाऊस येऊन गायब झाला. त्या पावसाने कपाशीला कोंब अंकुरले. पावसाची आवश्यकता असताना ऐनवेळी पावसाने शेतकऱ्यांना हुलकावणी दिली. आज उद्या पाऊस येईल, या प्रतीक्षेत शेतकरी आहे. परंतु, पाऊस येण्याचे कोणतेच संकेत नसल्याने कपाशी जमिनीतून उमलण्यापूर्वीच कोमेजली आहे.शेतकऱ्यांचे मागील चार पाच वर्ष कोरड्या, ओल्या दुष्काळात गेले. यावर्षी कर्जमाफीने शेतकऱ्यांना दिलासा दिला. चांगला पाऊस येईल आणि यावर्षी शेतात चांगले उत्पादन होईल, अशी आस शेतकरी बाळगून होते. हवामान खात्यानेही ९८ टक्के पाऊस पडेल, असे भाकीत वर्तविले होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या होत्या. दिवसंरात्र शेतात काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांचे यावर्षी सुखाचे दिवस येईल, असे वाटत होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी लगबगीने धूळपेरणी केली. मात्र तुरळक आलेल्या पावसाने कपाशीला जमिनीतच कोंब आले. त्यानंतर तीन दिवस पाऊस पडणे अपेक्षित असते. मात्र पावसानेही ऐनवेळी शेतकऱ्यांना दगा दिला. शेतकऱ्यांनी जमिनीत पेरलेले कपाशीचे बियाणे पावसाअभावी जमिनीतच सडून गेले आहे. त्याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. शेतकऱ्यांनी पावसासाठी गावोगावी आराधना करायला सुरुवात केली आहे. मात्र चार दिवसांपूर्वी आलेला पाऊस अचानक गायब झाल्याने पावसाअभावी दुबार पेरणीचे संकट घोंगावत आहे. उसनवारी करून शेतकऱ्यांनी बी-बियाणांची कशीबशी जुळवाजुळव केली. कर्ज काढून बियाणे विकत घेतले. पण पावसाने दगा दिला आहे. दुबार पेरणीचे संकट अटळआज, उद्या पाऊस येईल, या आशेवर शेतकरी आहे. शेतकऱ्यांनी जमिनीत बियाण्यांची लागवड केली. तुरळक आलेल्या पावसाने कपाशीची सरकी जमिनीतच खराब झाली. पाऊस पडत नसल्याने शेतकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकायला लागला असून पावसाअभावी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट अटळ आहे.हवामान खात्याचा अंदाज चुकला१० जून पासून पाऊस येईल, असे भाकीत हवामान खात्याने वर्तविले होते. विदर्भाच्या काही भागात पाऊस पडला तर चंद्रपूर जिल्ह्याला पावसाने हुलकावणी दिली. हवामान खात्याचा अंदाज खोटा ठरल्याने शेतकऱ्यांचा हवामान खात्यावरचा विश्वासच उडत चालला आहे.