शहरं
Join us  
Trending Stories
1
"...महाराष्ट्राच्या इतिहास एवढा मोठा विजय कुणालाच मिळालेला नाही, ही तर...," फडणवीसांनी नगराध्यक्ष, नगरसेवकांचा आकडाच सांगितला
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

कपाशी जमिनीतून उमलण्यापूर्वीच कोमेजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2017 00:45 IST

पाऊस येईल, या आशेवर शेतकरी होते. या एकाच आशेवर शेतकऱ्यांनी पेरणी केली. त्यानंतर तुरळक पाऊस येऊन गायब झाला.

पावसाचा दगा : शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कायमप्रकाश काळे । लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : पाऊस येईल, या आशेवर शेतकरी होते. या एकाच आशेवर शेतकऱ्यांनी पेरणी केली. त्यानंतर तुरळक पाऊस येऊन गायब झाला. त्या पावसाने कपाशीला कोंब अंकुरले. पावसाची आवश्यकता असताना ऐनवेळी पावसाने शेतकऱ्यांना हुलकावणी दिली. आज उद्या पाऊस येईल, या प्रतीक्षेत शेतकरी आहे. परंतु, पाऊस येण्याचे कोणतेच संकेत नसल्याने कपाशी जमिनीतून उमलण्यापूर्वीच कोमेजली आहे.शेतकऱ्यांचे मागील चार पाच वर्ष कोरड्या, ओल्या दुष्काळात गेले. यावर्षी कर्जमाफीने शेतकऱ्यांना दिलासा दिला. चांगला पाऊस येईल आणि यावर्षी शेतात चांगले उत्पादन होईल, अशी आस शेतकरी बाळगून होते. हवामान खात्यानेही ९८ टक्के पाऊस पडेल, असे भाकीत वर्तविले होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या होत्या. दिवसंरात्र शेतात काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांचे यावर्षी सुखाचे दिवस येईल, असे वाटत होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी लगबगीने धूळपेरणी केली. मात्र तुरळक आलेल्या पावसाने कपाशीला जमिनीतच कोंब आले. त्यानंतर तीन दिवस पाऊस पडणे अपेक्षित असते. मात्र पावसानेही ऐनवेळी शेतकऱ्यांना दगा दिला. शेतकऱ्यांनी जमिनीत पेरलेले कपाशीचे बियाणे पावसाअभावी जमिनीतच सडून गेले आहे. त्याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. शेतकऱ्यांनी पावसासाठी गावोगावी आराधना करायला सुरुवात केली आहे. मात्र चार दिवसांपूर्वी आलेला पाऊस अचानक गायब झाल्याने पावसाअभावी दुबार पेरणीचे संकट घोंगावत आहे. उसनवारी करून शेतकऱ्यांनी बी-बियाणांची कशीबशी जुळवाजुळव केली. कर्ज काढून बियाणे विकत घेतले. पण पावसाने दगा दिला आहे. दुबार पेरणीचे संकट अटळआज, उद्या पाऊस येईल, या आशेवर शेतकरी आहे. शेतकऱ्यांनी जमिनीत बियाण्यांची लागवड केली. तुरळक आलेल्या पावसाने कपाशीची सरकी जमिनीतच खराब झाली. पाऊस पडत नसल्याने शेतकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकायला लागला असून पावसाअभावी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट अटळ आहे.हवामान खात्याचा अंदाज चुकला१० जून पासून पाऊस येईल, असे भाकीत हवामान खात्याने वर्तविले होते. विदर्भाच्या काही भागात पाऊस पडला तर चंद्रपूर जिल्ह्याला पावसाने हुलकावणी दिली. हवामान खात्याचा अंदाज खोटा ठरल्याने शेतकऱ्यांचा हवामान खात्यावरचा विश्वासच उडत चालला आहे.