शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

वसतीगृहातून निघणाऱ्या सांडपाण्यामुळे नागरिक त्रस्त

By admin | Updated: November 29, 2014 23:19 IST

रत्नापूर ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या इंदिरानगर परिसरातील भारत वस्तीगृहाचे शौचालय, बाथरूम व मुत्रीघराच्या सांडपाण्याचे व्यवस्थापन केल्या जात नसल्याने परिसरातील नागरिकांना

नवरगाव : रत्नापूर ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या इंदिरानगर परिसरातील भारत वस्तीगृहाचे शौचालय, बाथरूम व मुत्रीघराच्या सांडपाण्याचे व्यवस्थापन केल्या जात नसल्याने परिसरातील नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे वसतीगृह प्रशासनाने व्यवस्थापन करण्याची मागणी रत्नापूर ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्य व नागरिकांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली.भारत वसतीगृहातील आंघोळीचे पाणी, मलमुत्र, शिळे अन्न व भांडे धुतलेले घाणेरडे पाणी अंगणवाडी क्रमांक चारजवळील नालीमध्ये सोडले जाते. त्यामुळे नालीमध्ये दुर्गंधी पसरली असून डुकरांचा व कुत्र्यांचा त्रास वाढला आहे. याच परिसरात लोकवस्ती असून नागरिकांनाही या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत असल्याने काही नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. सदर तक्रारीची दखल घेऊन रत्नापूर ग्रामपंचायतीने संबंधित वसतीगृह प्रशासनाला लेखीपत्र देऊन सांडपाण्याची सोय करण्याची सुचना केली. परंतु वसतीगृह प्रशासनाने कोणतीही सुधारणा केली नाही. मागील तीन ते चार वर्षांपासून हा प्रकार सुरू असल्याने परिसरातील नागरिकांच्या तसेच शेजारील अंगणवाडी मुलांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झालेला आहे.संबंधित सांडपाण्याची व्यवस्था वसतीगृह प्रशासनाने करावी, अशी मागणी सरपंच निलिमा गभणे यांनी केली. यावेळी ग्रा.पं. सदस्य विनोद निनावे, उद्धव तोंडफोडे, मोरेश्वर पर्वते व परिसरातील नागरिक उपस्थित होते. या संबंधीचे तक्रार समाजकल्याण अधिकारी, गटशिक्षणाधिकारी पं.स. सिंदेवाही, संवर्ग विकास अधिकारी यांना दिली आहे. (वार्ताहर)