शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

सिटी स्कॅन, एमआरआय चालकांच्या बंदमुळे रुग्णांच्या जीवाशी खेळ

By admin | Updated: June 21, 2016 00:41 IST

पुणे येथे एका रेडिओलॉजिस्टवर केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी बंदचा फटका संपाच्या ..

बेमुदत संप: चंद्रपुरात एक्स रे आणि सोनोग्राफी सेंटरही बंदचंद्रपूर : पुणे येथे एका रेडिओलॉजिस्टवर केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी बंदचा फटका संपाच्या पहिल्याच दिवशी गंभीर रूग्णांना बसला. इंडियन रेडिआॅलॉजिकल अँड इमेजिंग असोसिएशनने संघटनात्मकदृष्ट्या हे बंदचे पाऊल उचलले असले तरी अत्यावश्यक सेवाच ठप्प झाल्या. अनेक गंभीर रूग्णांची तपासणीच न झाल्याने या बंदमुळे रूग्णांच्या जीवाशी खेळ झाल्याच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत.चंद्रपुरातील इंडियन रेडिआॅलॉजिकल अँड इमेजिंग असोसिएशनच्या शाखेच्या आवाहनानुसार सोमवारपासून चंद्रपुरातील सीटी स्कॅन मशिन, एमआरआय, सोनोग्राफी आणि एक्स रे मशिन्स बंद ठेवण्यात आल्या. शहरात सुमारे पाच सीटी स्कॅन मशिन, तीन एमआरआय, असोसिएशनच्या सदस्यांकडे असलेल्या १३ आणि खाजगी डॉक्टरांकडे असलेल्या ६० ते ७० एक्स रे मशिन्स आणि सुमारे ४० सोनोग्राफी मशिन्स आहेत. त्या बंद असल्याचा दावा संघटनेने केला आहे.पुणे येथे तेथील महानगर पालिकेच्या वैद्यकीय पथकाने १२ जूनला केलेल्या कारवाईत एका केंद्रावरील मशिन जप्त केली होती. ही कारवाई रात्री ९ ते पहाटे दोन वाजपर्यंत चालली होती. या संदर्भात प्रशासनाला निवेदन देवून आपला संताप इंडियन रेडिआॅलॉजिकल अँड इमेजिंग असोसिएशनने व्यक्त केला होता. चाचणी करताना विसाव्या क्रमांकाच्या रकान्यात भरावयाच्या माहितीमध्ये चुकी झाली. यात केंद्रचालकाला दोषी ठरवून कारवाई करण्याची प्रकिया अवलंबल्याने हा संताप होता, दरम्यान, १३ जूनला पुण्यातील डॉक्टरांनी बंद पाळला. त्यानंतर १४ जूनला राज्यातील डॉक्टरांनी बंद पाळून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र सरकाने लक्ष: न दिल्याने २० जूनपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे.संघटनेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार, मागील दोन ते तीन वर्षात सुमारे ५४० मशिन सिल करण्यात आल्या आहेत. त्यातील ९९ टक्के कारवाया निव्वळ कारकुनी चुकांमुळे झाल्या आहेत. ही बाब सरकारच्या आणि आरोग्य विभागाच्या लक्षात आणूनही कसलीही दखल घेतली गेली नसल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.दरम्यान, संघटनेचे पदाधिकारी मंगळवारी मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांच्या भेटीसाठी रवाना होत आहेत. सरकारने यावर तोडगा काढावा आणि जनतेला बंदमुळे होणारा त्रास दूर करावा, अशी अपेक्षा पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)सर्वसामान्यांच्या त्रासाची आम्हाला कल्पना आहे. मात्र सरकारकडे वारंवार पाठपुरावा करूनही लक्ष न दिल्याने हे आंदोलनाचे पाऊल उचलावे लागत आहे. आम्ही दूरवरून आलेल्या ग्रामीण रूग्णांना तात्काळ सेवा देतो, निकड आणि परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेवून कागदपत्रांसाठी परत पाठविणे योग्य वाटत नाही. आंदोलनकाळात रूग्णांनी सरकारी सेवांचा आधार घ्यावा, केवळ क्लिष्ट कायदे दूर करावे, ही मागणी आहे. - डॉ. नवल राठी, सचिव, इंडियन रेडिआॅलॉजिकल अँड इमेजिंग असोसिएशन जिल्हा शाखा