लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने लागू झालेले लॉकडाऊन काही अटी शिथिल करून उठविल्यानंतर चंद्रपूरसह जिल्ह्यातील सर्वच शहरांनी सोमवारी प्रचंड गर्दी अनुभवली. आतापर्यंत केवळ जीवनाश्यक वस्तुंपुरतेच गरजा भागविणाऱ्या नागरिकांनी विविध वस्तुंची खरेदीसाठी बाजारात आल्याने झुंबळ उडाली होती. शहरातील सर्वच रस्त्यांवर दुपारी २ वाजेपर्यंत वाहनांची वर्दळ दिसून आली.कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने २३ मार्च रोजी लॉकडाऊन लागू केले. त्यानंतर केंद्र शासनाच्या आदेशानुसार लॉकडाऊनमध्ये वाढ करण्यात आली. या कालावधीत भाजीपाला, किराणा, औषधी आदी जीवनावश्यक वस्तुंची दुकाने वगळून सर्व व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली. दरम्यान, जिल्ह्यात कोरोनाचा एक आढळल्याने प्रशासनाने लॉकडाऊन आणखी कडक केले. रूग्ण आढळलेल्या परिसराला सील करून संचारावर निर्बंध घातले. तेव्हापासून १० मे पर्यंत एकही रूग्ण न आढळल्याने लॉकडाऊमध्ये शिथिलता आणण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. त्यानुसार वेळापत्रक जारी करून जीवनाश्यक वस्तुंची दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ आणि अन्य सर्व दुकाने सकाळी १० ते दुपारी २ वाजतापर्यंत सुरू ठेवण्याची परवानी दिली. त्यामुळे सोमवारी शहरातील सर्व रस्ते गर्दीने फु लून गेले होते. खरेदीसाठी बाजारात झुंबड उडाल्याचे दिसून आले.व्यावसायिकांनी केली दुकानांची स्वच्छताजिल्हा प्रशासनाने लॉकडाऊन शिथिलतेची घोषणा केल्यानंतर मनपाच्या सूचनेनुसार चंद्रपूर शहरातील बहुतेक व्यावसायिकांनी रविवारी दुकाने सॅनिटाईझ केली. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, याकरिता ग्राहकांना उभे राहण्यासाठी बांबू व दोरी लावून अंतर ठेवण्याची व्यवस्था केली.बांधकाम साहित्याच्या किंमती वधारल्याउन्हाळ्याचे दिवस असल्याने अनेकांनी घरांचे बांधकाम सुरू केले होते. मात्र, लॉकडाऊनमध्ये बांधकाम साहित्य विक्रीची हार्डवेअर दुकाने बंद झाली. त्यामुळे बांधकाम रखडले होते. दुकाने सुरू होताच सर्वाधिक गर्दी याच दुकानांमध्ये दिसून आली. दरातही मोठी वाढ झाली होती.गॅरेजसमोर नादुरूस्त वाहनांच्या रांगादीड महिन्यांपासून बिघडलेली वाहने घरीच अडगळीत पडून होती. लॉकडाऊन असल्याने घराबाहेर निघण्याचा प्रश्न नव्हता. मात्र, सोमवारी निर्बंध उठताच शेकडो नागरिकांनी दुरूस्तीसाठी गॅरेजसमोर वाहनांची रांग लावल्याचे पाहायला मिळाले.
लॉकडाऊननंतर शहराने अनुभवली गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 05:01 IST
कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने २३ मार्च रोजी लॉकडाऊन लागू केले. त्यानंतर केंद्र शासनाच्या आदेशानुसार लॉकडाऊनमध्ये वाढ करण्यात आली. या कालावधीत भाजीपाला, किराणा, औषधी आदी जीवनावश्यक वस्तुंची दुकाने वगळून सर्व व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली.
लॉकडाऊननंतर शहराने अनुभवली गर्दी
ठळक मुद्देखरेदीसाठी झुंबळ : दीड महिन्यानंतर नागरिक रस्त्यावर