शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

साथीच्या आजाराने नागरिक बेजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 06:00 IST

वातावरणात सतत बदल होत असताना प्रत्येक व्यक्तीच्या शरीराला या वातावरणात जुळवून घेणे सहज शक्य होत नाही. लहान बालके, वृद्ध व रोग प्रतिकार शक्ती कमी असलेल्या व्यक्तींना आजाराची लवकर लागण होते. रात्री थोडी थंडी व दिवसा उकाडा, त्यातच अधून मधून पावसाच्या सरी अशा वातावणामुळे साथीचे आजार बळावत आहे.

ठळक मुद्देवातावरणात बदल : उबदार कपड्यांची मागणी वाढली

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील काही दिवसांपासून वातावरण सातत्याने बदलत आहे. कधी थंडी तर कधी कोरड्या वाऱ्यांमुळे विविध आजारांनी डोके वर काढले आहे. ऐन दिवाळीच्या दिवसात व्हायरल फीवर आणि सर्दी-खोकल्यांच्या तक्रारी वाढल्या असतानाच साथीचे आजारही वाढत आहेत. घरोघरी सर्दी, खोकला व तापाचे रुग्ण आढळून येत आहे. परिणामी, शासकीय रुग्णालयासह खासगी दवाखानेही फुल्लं झाले आहेत. अनेक नागरिकांची दिवाळीही आजारपणातच गेली.वातावरणात सतत बदल होत असताना प्रत्येक व्यक्तीच्या शरीराला या वातावरणात जुळवून घेणे सहज शक्य होत नाही. लहान बालके, वृद्ध व रोग प्रतिकार शक्ती कमी असलेल्या व्यक्तींना आजाराची लवकर लागण होते. रात्री थोडी थंडी व दिवसा उकाडा, त्यातच अधून मधून पावसाच्या सरी अशा वातावणामुळे साथीचे आजार बळावत आहे. वातावरणातील बदलामुळे विषाणूजन्य आजारातही मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे पाहावयास मिळते. आधीच श्वसनाचे विकार असणाºया व्यक्तींना या वातावरणाचा अधिक त्रास होतो. गावागावांतील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये व खासगी दवाखाने रुग्णांच्या संख्येमुळे भरल्याचे चित्र आहे.सर्दी-पडसा, खोकला व त्यामुळे आलेल्या तापावर वेळीच उपचार न केल्यास ताप वारंवार येतो. परिणामी, अनेकदा रुग्णांना जीवही गमवावा लागतो. यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे झाले आहे. यासाठी आरोग्याप्रती जनजागृती करणे महत्त्वाचे आहे.मागील काही दिवसांपासून व्हायरल फिवरने कहर केला आहे. प्रत्येक घरातील बालके आजारी दिसून येत आहे. सर्दी, खोकला, ताप आणि घसा दुखत असल्याने चिमुकल्यांची त्राही होत असल्याचे दिसते. ग्रामीण भागातही विविध आजारांची डोके वर काढले असून नागरिक जेरीस आले आहेत.मच्छरदाणीत झोपणे फायद्याचेया वातावरणात मच्छरांची उत्पत्ती अधिक होते. त्यामुळे डासांपासून बचाव व्हावा यासाठी मच्छरदाणीत झोपणे फायद्याचे ठरते. सर्दी, पडसा, खोकला झाल्यास वेळीच डॉक्टरांच्या सल्लाने औषधोपचार करावा.त्वचा कोरडी व्हायला सुरुवातथंडीमध्ये कोरडी हवा श्वासोच्छवासाद्वारे आत जाते व याचा परिणाम फुफ्फुसावर होतो. थंडीमुळे घसा खवखवणे, घशाचा संसर्ग असे आजार होतात. यापासूनच श्वसनाच्या आजाराची सुरुवात होते. दम्याच्या रुग्णांना या वातावरणाचा अधिक त्रास होतो. अशा प्रतिकूल परिस्थितीत वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे. नियमित फिरायला जाणे, व्यायाम करणे, एकाच वेळी न खाता थोडे-थोडे चार ते पाच वेळा खाणे, रोज तीन ते चार लिटर पाणी पिणे, रोज एक फळ वा सुका मेवा खाणे आवश्यक असल्याचे डॉक्टरचे म्हणणे आहे. अधिक वेळा उपाशी राहणे या काळात अपायकारक ठरते. यामुळे नियमित सकस आहार घ्यावा तसेच हात, पाय स्वच्छ धुण्याच्या सूचनाही वैद्यकीय तज्ज्ञांनी दिल्या आहे.

टॅग्स :Healthआरोग्य