शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

'नागभीड जिल्हा' मागणीसाठी नागरिक उतरले रस्त्यावर, शहर कडकडीत बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2023 11:37 IST

तहसीलदारांना दिले निवेदन

नागभीड (चंद्रपूर) : नागभीड जिल्ह्याच्या मागणीसाठी सोमवारी नागभीडकर मोर्चाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरले आणि नागभीड जिल्हा झालाच पाहिजे, अशी एकमुखी मागणी केली. जिल्ह्याच्या मागणीसाठी काढण्यात आलेल्या या मोर्चास तालुकावासियांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नागभीड जिल्हा कृती समितीच्या वतीने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

नागभीड जिल्हा मागणीसाठीच्या या मोर्चाची सुरुवात येथील टीचर्स सोसायटीच्या कार्यालयापासून झाली. खिशाला जिल्हा मागणीचा बिल्ला आणि हातात फलक घेऊन तसेच जिल्हा मागणीच्या विविध घोषणा देत हा मोर्चा अतिशय शिस्तबद्ध रितीने शहरातील प्रमुख मार्गाने काढण्यात आला. हा मोर्चा येथील तहसील कार्यालयावर धडकला. यानंतर या मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाले. या सभेस अनेकांनी मार्गदर्शन केले.

जिल्ह्याच्या दृष्टीने विचार केल्यास मागणी करणाऱ्या इतर तालुक्यांपेक्षा नागभीड हा तालुका सर्वच दृष्टीने योग्य आहे. केवळ क्रांतिभूमी किंवा व्यापारनगरीचे निकष लावून जिल्ह्याची निर्मिती न करता इतर तालुक्यांना सर्वसमावेशक व सर्वांना मध्यवर्ती ठरणाऱ्या नागभीड येथेच जिल्हा निर्मिती करावी, अशी मागणी या सभेत केली. या मोर्चासोबतच जिल्हा मागणीच्या समर्थनार्थ नागभीडकरांनी संपूर्ण नागभीड शहर कडकडीत बंद ठेवून नागभीड जिल्हा मागणीला पाठिंबा दर्शविला. वैद्यकीय प्रतिष्ठाने वगळता शहरातील संपूर्ण बाजारपेठ दिवसभर बंद होती.

अपर जिल्हाधिकारी कार्यालयास विरोध

चिमूर येथे शासनाने अपर जिल्हाधिकारी कार्यालय निर्मितीची घोषणा केली आहे. चिमूर हे ठिकाण एका टोकाला असून, गैरसोयीचे आहे. त्यामुळे नागभीडचा चिमूर अपर जिल्हाधिकारी यात समावेश करू नये, अशी मागणीही या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली.

त्या प्रश्नाचा निषेध

नुकतीच पोलिस पाटील पदाची परीक्षा झाली. या प्रश्नपत्रिकेत कोणत्या तालुक्याची जिल्ह्याची मागणी सुरू आहे, असा प्रश्न विचारण्यात आला होता. पर्यायात ज्या तालुक्याने जिल्ह्याची कधीच मागणी केली नाही त्याही तालुक्याचे पर्यायात नाव देण्यात आले होते. मात्र, नागभीडकर सातत्याने मागणी करीत असूनही नागभीडचे नाव वगळण्यात आले. प्रशासनाने केलेल्या या घोडचुकीची या सभेत तीव्र शब्दात निंदा करण्यात आली.

बैलबंडी आणि दिंडीने वेधले लक्ष

या मोर्चात काही शेतकरी आपल्या बैलबंडीसह सहभागी झाले होते. तर एक भजन दिंडीही सहभागी झाली होती. सहभागी झालेल्या या बैलबंडी आणि दिंडीने अनेकांचे लक्ष वेधून घेतले.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर