शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

पळसगावात मृत्यूच्या भीतीने नागरिकांचा लस घेण्यास नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:29 IST

पळसगाव (पिपर्डा) : चिमूर तालुक्याच्या शेवटच्या टोकावरील ताडोबा बफर क्षेत्रातील पळसगावात अंधश्रद्धा व भीतीपोटी कोरोनाची लस घेतली जात नाही. ...

पळसगाव (पिपर्डा) : चिमूर तालुक्याच्या शेवटच्या टोकावरील ताडोबा बफर क्षेत्रातील पळसगावात अंधश्रद्धा व भीतीपोटी कोरोनाची लस घेतली जात नाही. पळसगावाची लोकसंख्या २५०० इतकी आहे. त्यापैकी केवळ १३ जणांनीच लस घेतली आहे. लस घेतल्यास मृत्यू होतो, अशी भीती येथील नागरिकांमध्ये आहे. प्रशासनाने या गावात लसीकरसाठी अनकेदा दवंडी पिटली. परंतु त्याचा कोणताच फायदा झाला नाही. या गावात आरोग्य विभागाने अनेकदा पाठपुरावा केला, परंतु त्यात केवळ १३ लोकांनीच लस घेतली आहे. उर्वरित नागरिकांनी लस घेण्यास नकार दिला. तालुक्यातील इतर आदिवासी बहुल गावांत अशीच स्थिती असल्याची धक्कादायक माहिती आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग मोठा आहे. मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. चिमूर तालुक्यात एकूण ९५ गावांत कोरोना रुग्ण आढळले. त्यामुळे प्रशासन व आरोग्य विभागात एकच खळबळ माजली. कोरोनापासून बचाव करताना आरोग्य विभागाने प्रत्येक गावात लसीकरणाचे महत्त्व पटवून दिले आहे. कोरोना समितीने लसीमुळे मृत्यू होत नसून लस घेतल्याने कोरोनापासून बचाव होतो, असे समजावून सांगितले. परंतु त्यानेही लोकांचे मत परिवर्तन झालेले दिसत नाही. आरोग्य सेविका, आशा वर्कर यांनी घरोघरी जाऊन लोकांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनाही यश आले नाही. लसीकरण करण्याकरिता आता जिल्हा प्रशासनाने दखल घेण्याची गरज आहे.