शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती

By admin | Updated: April 27, 2016 00:53 IST

औद्योगिक तालुका म्हणून ओळख असलेल्या कोरपना तालक्यामध्ये अनेक गावात पाणी टंचाई दिसून येत आहे.

पाणी पुरवठा समित्या कागदावरच : मुदत संपूनही कंत्राटदारांनी केले नाही कामनांदाफाटा : औद्योगिक तालुका म्हणून ओळख असलेल्या कोरपना तालक्यामध्ये अनेक गावात पाणी टंचाई दिसून येत आहे. तालुक्यातील कोट्यवधीच्या पाणीपुरवठा योजना अपयशी ठरल्याने पाण्यासाठी गावकऱ्यांना वणवण भटकंती करावी आहे. याचबरोबर तालुक्यात १९९८ मध्ये ५३ गावांसाठी सुरू झालेली पाणी पुरवठा योजना नांदा व गडचांदूर वगळता इतर गावात अपयशी ठरली आहे. कित्येक वर्षांपासून पाईपलाईन दुरुस्ती न झाल्याने गावात पाणीच मिळत नसल्याचा प्रकार दिसत आहे. शासनाने गावातील पाणी टंचाई निवारण्यासाठी गावपातळीवर पाणी व्यवस्थापन समित्या नेमण्याचे ग्रामपंचायतीला याआधीच निर्देश दिले आहे. या समितीला निविदा काढणे, पाणी परीक्षण करणे, खर्चाची मंजुरी देणे, कंत्राटदार नेमणे, नळयोजनेचे काम आदी अधिकार देण्यात आले आहे. मात्र काही गावांमध्ये सोयीच्या कंत्राटदाराला कंत्राट दिले आहे. त्यामुळे मुदत संपूनही काम पूर्ण झाले नसल्याचे चित्र दिसते. तालुक्यात कोडशी (खुर्द), शेरज, माथा, कुकडबोरी, कातलाबोडी, लखमापूर, गडचांदूर, हातलोणी, कवठाळा, कान्हाळगाव, मांडवा आदी गावांमध्ये पााणी टंचाईची झळ अधिक आहे. काही गावांमध्ये एकाच कामासाठी चारचार योजनेतून काम करण्यात आले. यात लाखो रुपये खर्च करुनही गावकऱ्यांना पाणी मिळाले नाही. हा प्रकार आदिवासी वस्ती असलेल्या मांगलहिरा येथे दिसून येते. त्याचबरोबर सन २०१३-१४ मध्ये सौरपंपावर आधारित नळयोजना व विविध गावांमध्ये फिल्टर मशीन बसविण्यात आल्या. मात्र एकदा बिघडलेल्या सौरपंपाकडे व फिल्टर मशीनकडे कुणीही ढुंकून पाहले नाही. त्यामुळे ही योजनाही यशस्वी ठरली नाही. यातील पाकडहिरा हे गाव वगळता कान्हाळगाव, तानबाडी कोडशी या गावात योजनेला यश आले नाही. परिणामी ााणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. (वार्ताहर)अमलनाल्याचे पाणी कंपनीच्या घशातसध्या माणिकगड सिमेंट कंपनीच्या अंतर्गत येणाऱ्या लखमापूर, गडचांदूर या गावांमध्ये पाणी टंचाईची समस्या आहे. सदर गावे माणिकगड सिमेंट कंपनीलगत आहे. मात्र या गावांना कंपनीकडून पाणी पुरवठा होत नसल्याचेही दिसते. शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी घेता यावे, यासाठी अंमलनाला व पकडीगुड्डम धरण बांधण्यात आले. यातील उपलब्ध पाण्याचा मोठा साठा सिमेंट कंपन्या उपसा करीत आहे. मात्र दत्तक गावातील पाणी टंचाई निवारण्यासाठी प्रयत्नही होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. धरणाच्या पाण्यावर स्वत:चे वीज प्रकल्प चालविताना नागरिकांच्या हक्काचे पाणी कंपन्या घेत आहे. मात्र गावात पाणी टंचाई निवारण्यासाठी प्रयत्न केला जात आहे, ही शोकांतिका आहे. तेव्हा लोककल्याणासाठी वापरण्यात येणारा माणिकगड सिमेंट कंपनीचा सीएसआर निधी जातोय कुठे, असा सवाल भाजपा नेते आबीद अली यांनी केला आहे