शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
2
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
3
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
4
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
5
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
6
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
7
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
8
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
9
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
10
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
11
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
12
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
13
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
14
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
15
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
16
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
17
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
18
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
19
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
20
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती

By admin | Updated: April 27, 2016 00:53 IST

औद्योगिक तालुका म्हणून ओळख असलेल्या कोरपना तालक्यामध्ये अनेक गावात पाणी टंचाई दिसून येत आहे.

पाणी पुरवठा समित्या कागदावरच : मुदत संपूनही कंत्राटदारांनी केले नाही कामनांदाफाटा : औद्योगिक तालुका म्हणून ओळख असलेल्या कोरपना तालक्यामध्ये अनेक गावात पाणी टंचाई दिसून येत आहे. तालुक्यातील कोट्यवधीच्या पाणीपुरवठा योजना अपयशी ठरल्याने पाण्यासाठी गावकऱ्यांना वणवण भटकंती करावी आहे. याचबरोबर तालुक्यात १९९८ मध्ये ५३ गावांसाठी सुरू झालेली पाणी पुरवठा योजना नांदा व गडचांदूर वगळता इतर गावात अपयशी ठरली आहे. कित्येक वर्षांपासून पाईपलाईन दुरुस्ती न झाल्याने गावात पाणीच मिळत नसल्याचा प्रकार दिसत आहे. शासनाने गावातील पाणी टंचाई निवारण्यासाठी गावपातळीवर पाणी व्यवस्थापन समित्या नेमण्याचे ग्रामपंचायतीला याआधीच निर्देश दिले आहे. या समितीला निविदा काढणे, पाणी परीक्षण करणे, खर्चाची मंजुरी देणे, कंत्राटदार नेमणे, नळयोजनेचे काम आदी अधिकार देण्यात आले आहे. मात्र काही गावांमध्ये सोयीच्या कंत्राटदाराला कंत्राट दिले आहे. त्यामुळे मुदत संपूनही काम पूर्ण झाले नसल्याचे चित्र दिसते. तालुक्यात कोडशी (खुर्द), शेरज, माथा, कुकडबोरी, कातलाबोडी, लखमापूर, गडचांदूर, हातलोणी, कवठाळा, कान्हाळगाव, मांडवा आदी गावांमध्ये पााणी टंचाईची झळ अधिक आहे. काही गावांमध्ये एकाच कामासाठी चारचार योजनेतून काम करण्यात आले. यात लाखो रुपये खर्च करुनही गावकऱ्यांना पाणी मिळाले नाही. हा प्रकार आदिवासी वस्ती असलेल्या मांगलहिरा येथे दिसून येते. त्याचबरोबर सन २०१३-१४ मध्ये सौरपंपावर आधारित नळयोजना व विविध गावांमध्ये फिल्टर मशीन बसविण्यात आल्या. मात्र एकदा बिघडलेल्या सौरपंपाकडे व फिल्टर मशीनकडे कुणीही ढुंकून पाहले नाही. त्यामुळे ही योजनाही यशस्वी ठरली नाही. यातील पाकडहिरा हे गाव वगळता कान्हाळगाव, तानबाडी कोडशी या गावात योजनेला यश आले नाही. परिणामी ााणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. (वार्ताहर)अमलनाल्याचे पाणी कंपनीच्या घशातसध्या माणिकगड सिमेंट कंपनीच्या अंतर्गत येणाऱ्या लखमापूर, गडचांदूर या गावांमध्ये पाणी टंचाईची समस्या आहे. सदर गावे माणिकगड सिमेंट कंपनीलगत आहे. मात्र या गावांना कंपनीकडून पाणी पुरवठा होत नसल्याचेही दिसते. शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी घेता यावे, यासाठी अंमलनाला व पकडीगुड्डम धरण बांधण्यात आले. यातील उपलब्ध पाण्याचा मोठा साठा सिमेंट कंपन्या उपसा करीत आहे. मात्र दत्तक गावातील पाणी टंचाई निवारण्यासाठी प्रयत्नही होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. धरणाच्या पाण्यावर स्वत:चे वीज प्रकल्प चालविताना नागरिकांच्या हक्काचे पाणी कंपन्या घेत आहे. मात्र गावात पाणी टंचाई निवारण्यासाठी प्रयत्न केला जात आहे, ही शोकांतिका आहे. तेव्हा लोककल्याणासाठी वापरण्यात येणारा माणिकगड सिमेंट कंपनीचा सीएसआर निधी जातोय कुठे, असा सवाल भाजपा नेते आबीद अली यांनी केला आहे