शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

सोनेगाव बेगडेतील दूषित पाण्याने नागरिकांना आजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 00:00 IST

चिमूर नगर पालिकेअंतर्गत येणाऱ्या सोनेगाव बेगडे येथे पिण्याच्या पाण्याच्या नळाला गढूळ पाणी येत असून ते पाणी पिल्याने गावातील अनेकांना विविध आजाराची लागण झाली आहे. हगवण, उलट्याचा त्रास वाढल्याने गावातील काहींना चिमूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ठळक मुद्देनागरिकांमध्ये भीती : शुद्ध पाणी पुरवठा करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर: चिमूर नगर पालिकेअंतर्गत येणाऱ्या सोनेगाव बेगडे येथे पिण्याच्या पाण्याच्या नळाला गढूळ पाणी येत असून ते पाणी पिल्याने गावातील अनेकांना विविध आजाराची लागण झाली आहे. हगवण, उलट्याचा त्रास वाढल्याने गावातील काहींना चिमूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले असून शुद्ध पाणी पुरवठा करण्याची मागणी नागगरिकांनी केली आहे.यावर्षी चिमूर येथे पाण्याची पाण्याची बिकट समस्या निर्माण झाली आहे. पालिकेच्या हद्दीत येणाºया सोनेगाव बेगडे येथील पिण्याच्या पाण्याचे नळाला काही दिवसांपासून गढूळ पाणी येत होते. तर काही नळांना मातीचा गाळही येत होता. अशा परिस्थितीत नागरिकांनी ते पाणी पिल्याने नागरिकांना हगवण, उलट्यांचा त्रास होऊ लागला. हा त्रास वाढल्याने येथील शोभा जयगोपाल पिंपळकर, गजानन शत्रुघ्न नन्नावरे, डोमा गजीक, अर्जून कमलाकर नन्नावरे, सपना सचिन नन्नावरे, नामदेव चौधरी, गिरीधर नन्नावरे, रोहन चिंधुजी ढोणे, सुमित चिंधूजी ढोणे, माधुरी भास्कर ढोणे यांच्यासह गावातील १५ नागरिकांना चिमूरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यातील काहींना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. गावातील विहिरी व नळाच्या पाण्याचे नमुन्यांची तपासणी केली असता, ते पाणी पिण्या योग्य नसल्याचे आढळून आल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे पिण्यासाठी पाणीच मिळत नसल्याने आम्ही कुठले पाणी प्यायचे, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.दरम्यान, गावात दवंडी देऊन विहिरीचे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे सांगण्यात आले होते. या विहिरीच्या पाण्याचा वापर पिण्यास करू नका, सार्वजनिक नळाच्या पाण्याचा पिण्यासाठी वापर करा, असे सांगण्यात आले होते. परंतु नळालासुद्धा दूषितच पाणी येत असल्याने कुठले पाणी प्यायचे, हा मोठा प्रश्न नागरिकांसमोर उपस्थित झाला आहे.नगर परिषद प्रशासन या बाबींची दखल घेत नसल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे. गावात आजाराची लागण झाल्याने गावकºयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्या, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.विहिरीच्या उपशाकडे प्रशानाचे दुर्लक्षसध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने सर्वत्र पाणी टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. यापूर्वीच जर प्रशासनाने उपाययोजना केली असती तर आज ग्रामस्थांवर ही वेळ आली नसती.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई