शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी! पाकसमोर टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
8
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
9
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
12
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
13
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
14
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
15
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
16
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
17
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
18
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
19
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
20
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

सोनेगाव बेगडेतील दूषित पाण्याने नागरिकांना आजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 00:00 IST

चिमूर नगर पालिकेअंतर्गत येणाऱ्या सोनेगाव बेगडे येथे पिण्याच्या पाण्याच्या नळाला गढूळ पाणी येत असून ते पाणी पिल्याने गावातील अनेकांना विविध आजाराची लागण झाली आहे. हगवण, उलट्याचा त्रास वाढल्याने गावातील काहींना चिमूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ठळक मुद्देनागरिकांमध्ये भीती : शुद्ध पाणी पुरवठा करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर: चिमूर नगर पालिकेअंतर्गत येणाऱ्या सोनेगाव बेगडे येथे पिण्याच्या पाण्याच्या नळाला गढूळ पाणी येत असून ते पाणी पिल्याने गावातील अनेकांना विविध आजाराची लागण झाली आहे. हगवण, उलट्याचा त्रास वाढल्याने गावातील काहींना चिमूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले असून शुद्ध पाणी पुरवठा करण्याची मागणी नागगरिकांनी केली आहे.यावर्षी चिमूर येथे पाण्याची पाण्याची बिकट समस्या निर्माण झाली आहे. पालिकेच्या हद्दीत येणाºया सोनेगाव बेगडे येथील पिण्याच्या पाण्याचे नळाला काही दिवसांपासून गढूळ पाणी येत होते. तर काही नळांना मातीचा गाळही येत होता. अशा परिस्थितीत नागरिकांनी ते पाणी पिल्याने नागरिकांना हगवण, उलट्यांचा त्रास होऊ लागला. हा त्रास वाढल्याने येथील शोभा जयगोपाल पिंपळकर, गजानन शत्रुघ्न नन्नावरे, डोमा गजीक, अर्जून कमलाकर नन्नावरे, सपना सचिन नन्नावरे, नामदेव चौधरी, गिरीधर नन्नावरे, रोहन चिंधुजी ढोणे, सुमित चिंधूजी ढोणे, माधुरी भास्कर ढोणे यांच्यासह गावातील १५ नागरिकांना चिमूरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यातील काहींना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. गावातील विहिरी व नळाच्या पाण्याचे नमुन्यांची तपासणी केली असता, ते पाणी पिण्या योग्य नसल्याचे आढळून आल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे पिण्यासाठी पाणीच मिळत नसल्याने आम्ही कुठले पाणी प्यायचे, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.दरम्यान, गावात दवंडी देऊन विहिरीचे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे सांगण्यात आले होते. या विहिरीच्या पाण्याचा वापर पिण्यास करू नका, सार्वजनिक नळाच्या पाण्याचा पिण्यासाठी वापर करा, असे सांगण्यात आले होते. परंतु नळालासुद्धा दूषितच पाणी येत असल्याने कुठले पाणी प्यायचे, हा मोठा प्रश्न नागरिकांसमोर उपस्थित झाला आहे.नगर परिषद प्रशासन या बाबींची दखल घेत नसल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे. गावात आजाराची लागण झाल्याने गावकºयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्या, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.विहिरीच्या उपशाकडे प्रशानाचे दुर्लक्षसध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने सर्वत्र पाणी टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. यापूर्वीच जर प्रशासनाने उपाययोजना केली असती तर आज ग्रामस्थांवर ही वेळ आली नसती.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई