शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
2
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
3
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
4
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
5
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
6
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
7
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
8
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
9
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
10
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
11
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
12
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
13
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
14
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
15
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
16
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
17
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
18
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
19
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
20
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?

सोनेगाव बेगडेतील दूषित पाण्याने नागरिकांना आजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 00:00 IST

चिमूर नगर पालिकेअंतर्गत येणाऱ्या सोनेगाव बेगडे येथे पिण्याच्या पाण्याच्या नळाला गढूळ पाणी येत असून ते पाणी पिल्याने गावातील अनेकांना विविध आजाराची लागण झाली आहे. हगवण, उलट्याचा त्रास वाढल्याने गावातील काहींना चिमूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ठळक मुद्देनागरिकांमध्ये भीती : शुद्ध पाणी पुरवठा करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर: चिमूर नगर पालिकेअंतर्गत येणाऱ्या सोनेगाव बेगडे येथे पिण्याच्या पाण्याच्या नळाला गढूळ पाणी येत असून ते पाणी पिल्याने गावातील अनेकांना विविध आजाराची लागण झाली आहे. हगवण, उलट्याचा त्रास वाढल्याने गावातील काहींना चिमूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले असून शुद्ध पाणी पुरवठा करण्याची मागणी नागगरिकांनी केली आहे.यावर्षी चिमूर येथे पाण्याची पाण्याची बिकट समस्या निर्माण झाली आहे. पालिकेच्या हद्दीत येणाºया सोनेगाव बेगडे येथील पिण्याच्या पाण्याचे नळाला काही दिवसांपासून गढूळ पाणी येत होते. तर काही नळांना मातीचा गाळही येत होता. अशा परिस्थितीत नागरिकांनी ते पाणी पिल्याने नागरिकांना हगवण, उलट्यांचा त्रास होऊ लागला. हा त्रास वाढल्याने येथील शोभा जयगोपाल पिंपळकर, गजानन शत्रुघ्न नन्नावरे, डोमा गजीक, अर्जून कमलाकर नन्नावरे, सपना सचिन नन्नावरे, नामदेव चौधरी, गिरीधर नन्नावरे, रोहन चिंधुजी ढोणे, सुमित चिंधूजी ढोणे, माधुरी भास्कर ढोणे यांच्यासह गावातील १५ नागरिकांना चिमूरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यातील काहींना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. गावातील विहिरी व नळाच्या पाण्याचे नमुन्यांची तपासणी केली असता, ते पाणी पिण्या योग्य नसल्याचे आढळून आल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे पिण्यासाठी पाणीच मिळत नसल्याने आम्ही कुठले पाणी प्यायचे, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.दरम्यान, गावात दवंडी देऊन विहिरीचे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे सांगण्यात आले होते. या विहिरीच्या पाण्याचा वापर पिण्यास करू नका, सार्वजनिक नळाच्या पाण्याचा पिण्यासाठी वापर करा, असे सांगण्यात आले होते. परंतु नळालासुद्धा दूषितच पाणी येत असल्याने कुठले पाणी प्यायचे, हा मोठा प्रश्न नागरिकांसमोर उपस्थित झाला आहे.नगर परिषद प्रशासन या बाबींची दखल घेत नसल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे. गावात आजाराची लागण झाल्याने गावकºयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्या, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.विहिरीच्या उपशाकडे प्रशानाचे दुर्लक्षसध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने सर्वत्र पाणी टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. यापूर्वीच जर प्रशासनाने उपाययोजना केली असती तर आज ग्रामस्थांवर ही वेळ आली नसती.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई