शहरं
Join us  
Trending Stories
1
Mallikarjun Kharge : "७५८ वेळा मोदी, ४२१ वेळा मंदिर-मशीद, २२४ वेळा पाकिस्तानचं नाव घेतलं, पण..."; खरगेंनी हिशोबच मांडला
2
विवेकानंदांना जीवनाचा उद्देश सापडला, तिथेच मोदींची ध्यान साधना; ४५ तासांचे मौन व्रत अन् उपास!
3
ENG vs PAK : वर्ल्ड कपच्या तोंडावर पाकिस्तानची बेक्कार धुलाई; शेजाऱ्यांचा ०-२ ने दारूण पराभव
4
1000 हून अधिक ऑडिशन्स, रंगामुळे रिजेक्शनचा सामना; अभिनेत्रीचं 'असं' चमकलं नशीब
5
Karan Bhushan Singh : "ज्या गाडीमुळे अपघात झाला त्यापासून माझी कार 4-5 किमी दूर"; करण भूषण यांचं स्पष्टीकरण
6
साताऱ्यात नवीन महाबळेश्वरची निर्मिती; आचारसंहिता संपताच प्रारूप विकास योजनेला सुरुवात
7
Adani-Ambaniची कंपनी नाही, निवडणुकांच्या काळात 'या' सरकारी कंपन्यांचं मार्केट कॅप सर्वाधिक वाढलं 
8
विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये नरेंद्र मोदींची ध्यानधारणा; पाहा फोटो...
9
३५ दिवसांनी प्रज्वल रेवन्ना मायदेशात; जर्मनीहून येताच एअरपोर्टवरच पोलिसांनी केली अटक
10
सूर्या प्रकल्पाच्या खोदकामात पोकलेनसह चालक ढिगाऱ्याखाली; २४ तासांपासून बचावकार्य सुरूच
11
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना: फिटनेस सर्टिफिकेट देणाऱ्या ऑडिटरला अटक; मुलुंडमध्ये कारवाई
12
अग्रलेख: परत परत 'ससून'च! रुग्णालयाला थोर वारसा, पण अस्वस्थ करणारा घटनांचा आरसा
13
अनुराग कश्यपसाठी जितेंद्र जोशीची पोस्ट, म्हणाला, '"३ दिवसांचं शूट पण २२ वर्ष..."
14
Opening Bell : सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; IT इंडेक्समध्ये घसरण, अपोलो हॉस्पिटलमध्ये तेजी
15
इंडस्ट्रीत घटस्फोटाचं प्रमाण वाढलं; मनोज वाजपेयी म्हणाले, 'प्रत्येक दिवशी नाती...'
16
हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; बिहारमध्ये १२, झारखंडच्या पलामूत ५ जणांचा मृत्यू
17
'माझ्या नवऱ्याची बायको' फेम जेनीचा AI वर संताप; म्हणाली, 'कास्टिंग करणाऱ्यांनी थोडे कष्ट घेतले तर..'
18
मोदींची हॅटट्रिक झाली तर, 'हे' शेअर्स करू शकतात मालामाल; काय म्हणतायत एक्सपर्ट, कोणती आहेत क्षेत्र?
19
मतदानाच्या निकालानंतर यांचे आणि त्यांचे काय होईल? पण एकमेकांच्या नावाने शिमगा अटळ!
20
अमेरिकेत राहणं खूप अवघड! परदेशात असं आयुष्य जगायची मृणाल, म्हणाली- "तिथे घरकामाला..."

चंद्रपुरातील रस्त्यांवरील धुळीने नागरिकांचे आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2018 10:55 PM

शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी मनपाने व सार्वजनिक बांधकाम विभागाने मातीचा वापर केला. त्यामुळे रस्त्यावरुन वाहन गेल्यास मोठ्या प्रमाणात धुळ उडत आहे. परिणामी वाहनचालकांना समोरचे कोणतेही वाहन दिसत नसून अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.मात्र याकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष होत आहे.

ठळक मुद्देरस्त्याची दुरुस्ती करावी : खड्डे बुजविण्यासाठी मातीचा वापर

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी मनपाने व सार्वजनिक बांधकाम विभागाने मातीचा वापर केला. त्यामुळे रस्त्यावरुन वाहन गेल्यास मोठ्या प्रमाणात धुळ उडत आहे. परिणामी वाहनचालकांना समोरचे कोणतेही वाहन दिसत नसून अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.मात्र याकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष होत आहे.मागील महिन्यात चंद्रपुरात बऱ्यापैकी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे चंद्रपुरातील रस्ते पुर्णपणे उखळले. त्यामुळे रामनगर पोलीस स्टेशन ते बंगाली कॅम्प, सावरकर चौक ते वाहतूक कार्यालय, जटपूरा गेट ते रामनगर, दवाबाजार ते पाण्याची टंकी, तुकूम येथील गुरुद्वारा रोड, दुर्गापूर, महाकाली मंदिर ते बाग्ला चौक, जिल्हाधिकारी कार्यालय ते दुध डेअरी, सपना टॉकीज ते रेल्वे स्टेशन आदी रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले.या खड्यांमुळे मागील महिन्यात चंद्रपुरात दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा बळी गेला. त्यानंतर मनपाने व सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याची मलमपट्टी सुरु केली. मात्र रस्त्यावर मातीमिश्रित साहित्याचा वापर केल्याने रस्त्यावरुन जळ वाहन गेल्यास मोठ्या प्रमाणात धुळ उडते.त्यामुळे त्या वाहनाच्या मागे असलेल्या वाहनचालक तसेच पदचाºयांना समोरचे काहीच दिसत नाही. परिणामी अपघाताची शक्यता आहे.चंद्रपूर जिल्हा पूर्वीच प्रदूषणयुक्त म्हणून ओळखला जातो. आता धुळीमुळे नागरिकांना विविध आजाराला समोर जावे लागत आहे. मात्र याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे.श्वसनाच्या आजारात वाढशहरातील रस्त्यावर माती टाकल्याने वाहन गेल्यानंतर मोठ्या प्रमाणात धूळ उडत असते. त्यामुळे नागरिकांना श्वसनाच्या विविध आजाराला सामोर जावे लागत आहे. चंद्रपूर जिल्हा प्रदूषणयुक्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे पूर्वीच नागरिकांना विविध आजारांना सामोर जावे लागत आहेत. त्यातच आता मोठ्या प्रमाणात धुळ निघत असल्याने नागरिकांना आजार बळावण्याची शक्यता आहे.धुळीमधून कॉर्बन, हायड्रोकार्बन वातावरणात समाविष्ट होतात. त्यामुळे श्वसनलिकेला त्रास होत असतो. परिणामी अस्थमा, दमा, छातीमध्ये पाणी, सर्दी, खोकला, आदी रोग नागरिकांना होण्याची शक्यता असते.- मंगेश गुलवाडे,कान, नाक, घसा, रोग तज्ज्ञ, चंद्रपूर