शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
3
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
4
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
5
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
6
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
7
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
8
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
9
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
10
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
11
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
12
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
13
जन्माष्टमी २०२५: ‘या’ राशींवर श्रीकृष्ण कृपा, पैसे कमी पडत नाहीत; सुबत्ता-वैभव-भरभराट लाभते!
14
राजा रघुवंशीच्या घरी अचानक पोहोचला पोलिसांच्या वेशातील व्यक्ती; कुटुंबाला आला संशय, तपास करताच धक्कादायक सत्य उघड
15
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
16
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
17
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
18
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
19
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
20
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ

जमिनीच्या पट्ट्यापासून नागरिक वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 21:50 IST

भिवापुरातील महाकाली मंदिर वॉर्ड लक्ष्मी बजाज शोरूम समोर सुमारे ८० घरांची लोकवस्ती आहे. महाकाली नगर झोपडपट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या वॉर्डातील नागरिकांना अद्याप जमिनीचे पट्टे व मूलभूत सोईसुविधा पुरवण्यात आल्या नाहीत. त्यामुळे प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देमहाकाली वॉर्डातील व्यथा : मनपाकडे निवेदन सादर

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : भिवापुरातील महाकाली मंदिर वॉर्ड लक्ष्मी बजाज शोरूम समोर सुमारे ८० घरांची लोकवस्ती आहे. महाकाली नगर झोपडपट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या वॉर्डातील नागरिकांना अद्याप जमिनीचे पट्टे व मूलभूत सोईसुविधा पुरवण्यात आल्या नाहीत. त्यामुळे प्रचंड संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, नागरिकांनी जिल्हा प्रशासन व मनपाला निवेदन देऊन समस्या सोडविण्याची मागणी केली आहे.महाकाली मंदिरासमोरील झोपडपट्टीमध्ये आदिवासी व बुरड समाजातील नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे. चांदा, मोहल्ला बाबूपेठ, शिट क्रमांक २, ब्लॉक क्रमांक १०४, न.भू. क्रमांक १४७५० मध्ये सुमारे सव्वा एकर क्षेत्रात हे कुटुंबीय ५० वर्षांपासून वास्तव्य करित आहेत. एका व्यावसायिकाच्या अरेरावीमुळे या दोन्ही लोकवस्तीमध्ये विकासाची कामेच झाली नाही. मनपाने प्राथमिक सोयी सुविधा पुरवण्याकडे दुर्लक्ष केले. वॉर्डातील सार्वजनिक रस्ते व नाल्यांचे पक्के बांधकाम झाले नाही. त्यामुळे सर्वत्र घाण पाण्याचे डबके साचल्याचे दिसून येते. रस्त्यांची स्वच्छता व नाल्यांचा उपसा होत नाही. त्यामुळे सर्वत्र घाणी पसरली आहे. घाणीमुळे नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. स्वच्छ भारत योजनेअंतर्गत घरगुती शौचालय बांधून देण्यात आले नाही. परिसरातील अनेक ठिकाणी कचºयाचे ढिगारे दिसून येतात. साथीचे आजार सुरू असूनही मनपाचे आरोग्य पथक लक्ष देत नाही. पिण्याचे पाणी मिळत नाही.त्यामुळे पाण्यासाठी दारोदार भटकंती सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला. सार्वजनिक दिवाबत्तीची सुविधा नाही. देखाव्यासाठी विद्युत खांब उभे आहेत. पण, त्यावर सर्व्हिस लाईन टाकण्यात आली नाही. त्यामुळे अंधार पसरलेला असतो. अंधाराचा फायदा घेऊन चोºया व महिलांची छेड काढण्याच्या घटना सतत घडत आहेत. परिसरात मूलभूत सोयी-सुविधांचा अभाव असल्यामुळे टायफाईड, चिकन गुनिया, डेंग्यू व मलेरिया आजाराची लागण होण्याचा धोका वर्तविण्यात येत आहे. शहरात राहूनही या परिसराला जणू वाळीत टाकण्यात आले. हा प्रकार अन्यायकारक आहे. नागरिकांच्या हितासाठी राजकारणाच्या पलिकडे जाऊन विविध विकासाच्या योजना राबविण्याबाबत मनपा प्रशासन उदासिन आहे. मनपा प्रशासनाकडून सातत्याने नियमित फवारणी केली जात नाही, असा आरोप निवेदनातून करण्यात आला. यावेळी टेकचंद लटरे, जगदीश उके, केदार वाघाडे, रवी शास्त्री, महाकाली वोटापल्ली, पुजा हेडाऊ, सुनिता सोनकुसरे, मलया बेडेकर, अक्षय परचाके, शालीक निमगडे, संतोष मेश्राम, शंकर गेडाम व अन्य उपस्थित होते.