शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

जमिनीच्या पट्ट्यापासून नागरिक वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 21:50 IST

भिवापुरातील महाकाली मंदिर वॉर्ड लक्ष्मी बजाज शोरूम समोर सुमारे ८० घरांची लोकवस्ती आहे. महाकाली नगर झोपडपट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या वॉर्डातील नागरिकांना अद्याप जमिनीचे पट्टे व मूलभूत सोईसुविधा पुरवण्यात आल्या नाहीत. त्यामुळे प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देमहाकाली वॉर्डातील व्यथा : मनपाकडे निवेदन सादर

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : भिवापुरातील महाकाली मंदिर वॉर्ड लक्ष्मी बजाज शोरूम समोर सुमारे ८० घरांची लोकवस्ती आहे. महाकाली नगर झोपडपट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या वॉर्डातील नागरिकांना अद्याप जमिनीचे पट्टे व मूलभूत सोईसुविधा पुरवण्यात आल्या नाहीत. त्यामुळे प्रचंड संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, नागरिकांनी जिल्हा प्रशासन व मनपाला निवेदन देऊन समस्या सोडविण्याची मागणी केली आहे.महाकाली मंदिरासमोरील झोपडपट्टीमध्ये आदिवासी व बुरड समाजातील नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे. चांदा, मोहल्ला बाबूपेठ, शिट क्रमांक २, ब्लॉक क्रमांक १०४, न.भू. क्रमांक १४७५० मध्ये सुमारे सव्वा एकर क्षेत्रात हे कुटुंबीय ५० वर्षांपासून वास्तव्य करित आहेत. एका व्यावसायिकाच्या अरेरावीमुळे या दोन्ही लोकवस्तीमध्ये विकासाची कामेच झाली नाही. मनपाने प्राथमिक सोयी सुविधा पुरवण्याकडे दुर्लक्ष केले. वॉर्डातील सार्वजनिक रस्ते व नाल्यांचे पक्के बांधकाम झाले नाही. त्यामुळे सर्वत्र घाण पाण्याचे डबके साचल्याचे दिसून येते. रस्त्यांची स्वच्छता व नाल्यांचा उपसा होत नाही. त्यामुळे सर्वत्र घाणी पसरली आहे. घाणीमुळे नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. स्वच्छ भारत योजनेअंतर्गत घरगुती शौचालय बांधून देण्यात आले नाही. परिसरातील अनेक ठिकाणी कचºयाचे ढिगारे दिसून येतात. साथीचे आजार सुरू असूनही मनपाचे आरोग्य पथक लक्ष देत नाही. पिण्याचे पाणी मिळत नाही.त्यामुळे पाण्यासाठी दारोदार भटकंती सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला. सार्वजनिक दिवाबत्तीची सुविधा नाही. देखाव्यासाठी विद्युत खांब उभे आहेत. पण, त्यावर सर्व्हिस लाईन टाकण्यात आली नाही. त्यामुळे अंधार पसरलेला असतो. अंधाराचा फायदा घेऊन चोºया व महिलांची छेड काढण्याच्या घटना सतत घडत आहेत. परिसरात मूलभूत सोयी-सुविधांचा अभाव असल्यामुळे टायफाईड, चिकन गुनिया, डेंग्यू व मलेरिया आजाराची लागण होण्याचा धोका वर्तविण्यात येत आहे. शहरात राहूनही या परिसराला जणू वाळीत टाकण्यात आले. हा प्रकार अन्यायकारक आहे. नागरिकांच्या हितासाठी राजकारणाच्या पलिकडे जाऊन विविध विकासाच्या योजना राबविण्याबाबत मनपा प्रशासन उदासिन आहे. मनपा प्रशासनाकडून सातत्याने नियमित फवारणी केली जात नाही, असा आरोप निवेदनातून करण्यात आला. यावेळी टेकचंद लटरे, जगदीश उके, केदार वाघाडे, रवी शास्त्री, महाकाली वोटापल्ली, पुजा हेडाऊ, सुनिता सोनकुसरे, मलया बेडेकर, अक्षय परचाके, शालीक निमगडे, संतोष मेश्राम, शंकर गेडाम व अन्य उपस्थित होते.