शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
2
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
3
₹५००० च्या SIP नं कसा बनेल ₹५ कोटींचा फंड? कमालीची आहे पद्धत, एकदा समजलात तर पैशांचं टेन्शन होईल दूर
4
१२८ किलोची वजनदार पत्नी अंगावर पडून पतीचा मृत्यू; सोशल मीडियावर पुन्हा घटना व्हायरल 
5
Stock Markets Today: वीकली एक्स्पायरीच्या दिवशी शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, निफ्टी ३० अंकांनी वाढून उघडला; ऑटो स्टॉक्समध्ये गुंतवणूकदारांची खरेदी
6
कंपनी मालकीन कर्मचाऱ्याच्या प्रेमात पडली, घटस्फोटासाठी कोट्यवधि रुपये मोजले; प्रकरण न्यायालयात पोहोचले
7
VIRAL : धडकी भरवणारी 'सफर'! अफगाणिस्तानातून विमानाच्या चाकात लपून भारतात पोहोचला १३ वर्षांचा मुलगा
8
अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगाला स्पर्श करणे म्हणजे बलात्कार नव्हे; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
9
अपुऱ्या झोपेमुळे स्मृतिभ्रंशाचा मोठा धोका; ५ वर्षाच्या अभ्यासानंतर समोर आला धक्कादायक रिपोर्ट
10
इस प्यार को क्या नाम दूं? भावोजीसोबत मेहुणी पळाली; जाताना १ लाख रोख अन् २ लाखांचे दागिनेही घेऊन गेली; पुढे काय झालं?
11
स्क्रीनवर सोज्वळ, खऱ्या आयुष्यात बिकिनी? सीतेच्या भूमिकेत दिसणाऱ्या साई पल्लवीवर होतेय टीका
12
ट्रम्प यांच्या एच-1 बी शुल्क आदेशानंतर भारतीय प्रवासी एमिरेट्सच्या विमानातून उतरले, विमान ३ तास उशीरा
13
Mumbai Robbery: मोबाईल आणि ब्रँडेड घड्याळांच्या दुकानात दरोडा; चार सराईत गुन्हेगारांना अटक!
14
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
15
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
16
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
17
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
18
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
19
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
20
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप

विजेच्या लपंडावामुळे नागरिक त्रस्त

By admin | Updated: October 19, 2015 01:40 IST

राजुरा तालुक्यातील देवाडा परिसरातील विजेच्या लपंडावामुळे नागरिक वैतागले आहे.

पाण्याची टंचाई : कमी-अधिक दाबामुळे वीज उपकरणात बिघाडदेवाडा : राजुरा तालुक्यातील देवाडा परिसरातील विजेच्या लपंडावामुळे नागरिक वैतागले आहे.अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या देवाडा परिसरात महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीमुळे नेहमीच ये-जा सुरू असते. नागरिक विद्युत विभागाच्या भोंगळ कारभाराला कंटाळली आहे. मागील कित्येक दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याची तिव्र टंचाई भासत असून महिलांना पाण्यासाठी भटकावे लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच विजेच्या कमी अधिक दाब व सतत होणाऱ्या विजेचा लपंडावामुळे वीज उपकरणात बिघाड होत असून काही उपकरणे जळाल्याची माहिती आहे. विजेचा खेळखंडोबा सुरू असून नागरिकांची अनेकदा गैरसोय होत आहे.सध्या सणासुदीचे दिवस आहेत. घटस्थापना, शारदा नवरात्रारंभ, दसरा, मोहरम (ताजिया), कोजागिरी पोर्णिमा, लक्ष्मीपूजन, दीपावली, पाडवा, भाऊबीज, गुरूनानक जयंती यांच्यासह अनेक सण एका पाठोपाठ येत असून हे सण नागरिक साजरे करण्याचा मन:स्थितीत असताना रात्रंदिवस वीज खंडीत होण्याचे प्रकार देवाडासह सिद्धेश्वर, लक्कडकोट, भुर्रकुंडा, कावळगोंदी, देवापूर, भेंडवी, उमरझरा, काकळघाट, गेरेगुडा, सुकडपाली, आनंदगुडा, जगुगुडा, खिर्डी, सोनुर्ली, कोष्टाळा, घोटरा, देवाडा परिसरातील गावात घडत आहे. हा परिसर अतिदुर्गम भागात मोडत असून या भागात बहुतांश आदिवासी जमात वास्तव्याला आहे. अंधाराचा फायदा घेत जंगली डुक्कर, वन्यप्राणी शेतकऱ्यांची शेती गावालगत असल्यामुळे शेतीमध्ये हैदोस घालत आहे. तेव्हापासूनच नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.मागील एका महिन्यापासून वीज पाच मिनिटे राहते तर अर्धा तास जाते. वीज किती वेळा जाते अन् किती वेळा येते, याचा अंदाज बांधणे कठीण झाले आहे. त्यामुळे विजेवर चालणाऱ्या व्यवसायिकांना जीवण जगणे कठीण झाले आहे. त्यातच वारंवार बंद होणाऱ्या विजेमुळे ओलीत करणारा शेतकरी वर्गसुद्धा त्रस्त झाला आहे. याकडे मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. अलिकडे तर १२ तासाचे भारनियमन होत असल्याचे जाणवते. विजेवर चालणारे उद्योग धंदे प्रभावित झाले आहे. लहान आटाचक्की, कांडप केंद्र, इलेक्ट्रानिक्स वस्तु विकणारे व दुरुस्ती करणारे आदी धंदे धोक्यात आले आहे. अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे या परिसारतील वीज पुरवठा नसल्यासारख्याच असतो. मात्र वीज देयके तेवढेच. याबाबत अनेक वेळा नागरिक महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाब विचारतात. मात्र समाधान केले जात नाही. (वार्ताहर)