शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

‘आधार’साठी नागरिक निराधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 00:16 IST

आॅनलाईन लोकमतमूल: डिजिटल इंडियाचे स्वप्न बघणाऱ्या भारतात बँक खाते व इतर कामासाठी आधारकॉर्ड सक्तीचे करण्यात आले. मात्र मूल शहरात एकही आधार केंद्र देण्यात आले नाही. त्याउलट ग्रामीण भागात दोन आधार केंद्र देण्यात आले. त्यामुळे नागरिकांना आधार कॉर्ड काढण्यासाठी बाहेर जावे लागत आहे. परिणामी नागरिकांमध्ये शासनाप्रति रोष व्यक्त होत आहे.शासकीय व खासगी ...

ठळक मुद्देमूलमध्ये केंद्राची गरज : आधार कॉर्डअभावी कामे प्रलंबित

आॅनलाईन लोकमतमूल: डिजिटल इंडियाचे स्वप्न बघणाऱ्या भारतात बँक खाते व इतर कामासाठी आधारकॉर्ड सक्तीचे करण्यात आले. मात्र मूल शहरात एकही आधार केंद्र देण्यात आले नाही. त्याउलट ग्रामीण भागात दोन आधार केंद्र देण्यात आले. त्यामुळे नागरिकांना आधार कॉर्ड काढण्यासाठी बाहेर जावे लागत आहे. परिणामी नागरिकांमध्ये शासनाप्रति रोष व्यक्त होत आहे.शासकीय व खासगी कामासाठी आधार कॉर्डची सक्ती करण्यात आली. तर ३१ डिसेंबरपूर्वी आधार कॉर्ड बँक खात्याशी जोडणी न केल्यास बँक खाते बंद करण्याच्या सूचना बँकेकडून वारंवार देण्यात येत आहे. यामुळे नागरिक आधार कॉर्ड काढण्यासाठी आधार केंद्रावर जात आहेत. मात्र आधार केंद्र चालक शासनाच्या आदेशानुसार केंद्र बंद करण्यात आलेले आहे, असे सांगून परत पाठवित आहे. महाआॅनलाईन सेवेमार्फत मूल येथे पुपरेड्डीवार आणि वखरांगी ईगर्व्हनल कंपनीमार्फत रामटेके यांचे गांधी चौकात ग्राहक सेवा केंद्र सुरु होते.याआधार केंद्रामधून नागरिकांना नियमित आधार कार्ड काढण्याची सवलत होती. मात्र काही दिवसांपासून यांची सेवा शासनाने बंद केलेली आहे. तसेच शासकीय कार्यालयात आपले आधार सेंटर सुरु करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे हे दोन्ही आधार केंद्र काही दिवसांपासून बंद आहे.आजच्या स्थितीत मूल शहरात एकही आधार केंद्र नसल्यामुळे आधार कॉर्ड काढायचे कसे असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.मूल तालुक्यातील मौजा चिरोली आणि फिस्कूटी येथे महासेवा केंद्र आहेत, मूल तालुक्यासाठी केवळ दोन आधार केंद्र कार्यरत असल्यामुळे याठिकाणी मोठी गर्दी असते, यामुळे शासनाने मूल शहरातही आधारकॉर्ड केंद्र सुरु करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.आधार केंद्र लवकरच सुरु करणारशासनाच्या अधिसूचनेनुसार आधार केंद्राना शासकीय कार्यालयात आपले केंद्र हलविण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. प्रत्येक नागरिकांना आधार कॉर्ड काढणे गरजेचे आहे. यामुळे मूल शहरात लवकरच आधार केंद्र सुरु करण्याच्या सूचना देणार असल्याची माहिती मूलचे उपविभागीय अधिकारी एम. व्ही. खेडीकर यांनी लोकमतशी बोलताना दिली.