शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

‘आधार’साठी नागरिक निराधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 00:16 IST

आॅनलाईन लोकमतमूल: डिजिटल इंडियाचे स्वप्न बघणाऱ्या भारतात बँक खाते व इतर कामासाठी आधारकॉर्ड सक्तीचे करण्यात आले. मात्र मूल शहरात एकही आधार केंद्र देण्यात आले नाही. त्याउलट ग्रामीण भागात दोन आधार केंद्र देण्यात आले. त्यामुळे नागरिकांना आधार कॉर्ड काढण्यासाठी बाहेर जावे लागत आहे. परिणामी नागरिकांमध्ये शासनाप्रति रोष व्यक्त होत आहे.शासकीय व खासगी ...

ठळक मुद्देमूलमध्ये केंद्राची गरज : आधार कॉर्डअभावी कामे प्रलंबित

आॅनलाईन लोकमतमूल: डिजिटल इंडियाचे स्वप्न बघणाऱ्या भारतात बँक खाते व इतर कामासाठी आधारकॉर्ड सक्तीचे करण्यात आले. मात्र मूल शहरात एकही आधार केंद्र देण्यात आले नाही. त्याउलट ग्रामीण भागात दोन आधार केंद्र देण्यात आले. त्यामुळे नागरिकांना आधार कॉर्ड काढण्यासाठी बाहेर जावे लागत आहे. परिणामी नागरिकांमध्ये शासनाप्रति रोष व्यक्त होत आहे.शासकीय व खासगी कामासाठी आधार कॉर्डची सक्ती करण्यात आली. तर ३१ डिसेंबरपूर्वी आधार कॉर्ड बँक खात्याशी जोडणी न केल्यास बँक खाते बंद करण्याच्या सूचना बँकेकडून वारंवार देण्यात येत आहे. यामुळे नागरिक आधार कॉर्ड काढण्यासाठी आधार केंद्रावर जात आहेत. मात्र आधार केंद्र चालक शासनाच्या आदेशानुसार केंद्र बंद करण्यात आलेले आहे, असे सांगून परत पाठवित आहे. महाआॅनलाईन सेवेमार्फत मूल येथे पुपरेड्डीवार आणि वखरांगी ईगर्व्हनल कंपनीमार्फत रामटेके यांचे गांधी चौकात ग्राहक सेवा केंद्र सुरु होते.याआधार केंद्रामधून नागरिकांना नियमित आधार कार्ड काढण्याची सवलत होती. मात्र काही दिवसांपासून यांची सेवा शासनाने बंद केलेली आहे. तसेच शासकीय कार्यालयात आपले आधार सेंटर सुरु करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे हे दोन्ही आधार केंद्र काही दिवसांपासून बंद आहे.आजच्या स्थितीत मूल शहरात एकही आधार केंद्र नसल्यामुळे आधार कॉर्ड काढायचे कसे असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.मूल तालुक्यातील मौजा चिरोली आणि फिस्कूटी येथे महासेवा केंद्र आहेत, मूल तालुक्यासाठी केवळ दोन आधार केंद्र कार्यरत असल्यामुळे याठिकाणी मोठी गर्दी असते, यामुळे शासनाने मूल शहरातही आधारकॉर्ड केंद्र सुरु करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.आधार केंद्र लवकरच सुरु करणारशासनाच्या अधिसूचनेनुसार आधार केंद्राना शासकीय कार्यालयात आपले केंद्र हलविण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. प्रत्येक नागरिकांना आधार कॉर्ड काढणे गरजेचे आहे. यामुळे मूल शहरात लवकरच आधार केंद्र सुरु करण्याच्या सूचना देणार असल्याची माहिती मूलचे उपविभागीय अधिकारी एम. व्ही. खेडीकर यांनी लोकमतशी बोलताना दिली.