शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
3
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
6
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
7
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
8
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
9
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
10
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
11
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
12
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
13
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
14
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
15
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
16
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
17
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
18
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
19
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
20
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव

नागरिकांच्या आरोग्याशी खेळ

By admin | Updated: May 25, 2014 23:28 IST

मागील काही दिवसांपासून शहरातील काही वार्डात अशुद्ध तसेच अनियमित पाणी पुरवठा सुरु आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. अशुद्ध पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. जलवाहित्या त्वरित बदलवून

चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून शहरातील काही वार्डात अशुद्ध तसेच अनियमित पाणी पुरवठा सुरु आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. अशुद्ध पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. जलवाहित्या त्वरित बदलवून नागरिकांना दिलासा द्यावा, अशा मागणी करण्यात आली आहे.

आठ वर्षापूर्वी चंद्रपूर नगरपालिका असताना शहरात पाणीपुरवठा करण्याचा कंत्राट खासगी कंपनीकडे देण्यात आले. शुद्ध पाण्याचा पुरवठा करणे, फुटलेल्या जलवाहिन्यांची त्वरित दुरुस्ती करणे, शिवाय जनतेकडून पाणीपट्टी कराची परस्पर उचल करणे आदींची नोंद यावेळी कंपनीसोबत झालेल्या करारात झाली होती. त्यानंतर आता दुसर्‍या कंपनीकडे मनपाने कंत्राट दिले आहे.

इरई धरणातील पाणी तुकुम भागातील जलशुद्धीकरण केंद्रात पोहोचविले जाते. त्यानंतर हे शुद्ध केलेले पाणी टाकीत पोहोचविण्याकरिता शहरात जलवाहिनी टाकण्यात आली. परंतु ही जलवाहिनी एक किलोमीटर अंतरावर अनेक ठिकाणी फुटली आहे. मागील काही वर्षांंपासून फुटलेल्या जलवाहिनीची थातुरमातूर दुरुस्ती करण्यात आली. या फुटलेल्या जलवाहिनीला पर्याय म्हणून चार वर्षांपूर्वी महानगरपालिकेने एक कोटी रुपये खर्चाची दुसरी जलवाहिनी टाकली. सदर जलवाहिनीचे काम पूर्ण होऊन दोन वर्षाचा कालावधी लोटला, तरीही अशुद्ध पाणीपुरवठय़ाचा प्रश्न सुटला नाही. दर वर्षाला पाणीपट्टी कर म्हणून ग्राहकाकडून मोठय़ा प्रमाणात वसूल केल्या जातो. मात्र त्यांना त्या तुलनेत पुरेसे पाणी पुरवठा केल्या जात नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

एकीकडे फुटलेल्या जलवाहिनीद्वारे घराघरात अशुद्ध पाणी पोहचविले जाते तर, दुसरीकडे ज्या टाकीत पाण्याची साठवणूक होते ती टाकी कित्येक वर्षांंपासून स्वच्छ केली नाही. महानगरपालिकेकडून होणार्‍या दुर्लक्षामुळे चंद्रपुरातील जनतेच्या आरोग्याशी खेळ खेळला जात आहे.

शहरातील सर्व प्रभागामध्ये नियमित पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिकांची ओरड आहे. त्यातच काही नागरिक नळाला टिल्लू पंप लावत असल्याने अन्य नागरिकांना पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे नळ सोडण्याच्या वेळी विशेष मोहीम राबवून टिल्लू पंप लावणार्‍यांविरुध्द कारवाई करणे तेवढेच गरजेचे आहे. मात्र अशी कारवाई केली जात नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, ज्या दिवशी पाणी पुरवठा बंद असतो, त्या दिवशी नागरिकांना कोणत्याही प्रकारे सूचना देण्यात येत नाही. शुद्ध आणि नियमित पाणी पुरवठा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. (नगर प्रतिनिधी)