शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
3
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
4
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
5
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
6
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
7
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
8
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
9
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
10
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
11
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
12
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
13
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
14
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
15
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
19
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
20
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांच्या आरोग्याशी खेळ

By admin | Updated: May 25, 2014 23:28 IST

मागील काही दिवसांपासून शहरातील काही वार्डात अशुद्ध तसेच अनियमित पाणी पुरवठा सुरु आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. अशुद्ध पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. जलवाहित्या त्वरित बदलवून

चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून शहरातील काही वार्डात अशुद्ध तसेच अनियमित पाणी पुरवठा सुरु आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. अशुद्ध पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. जलवाहित्या त्वरित बदलवून नागरिकांना दिलासा द्यावा, अशा मागणी करण्यात आली आहे.

आठ वर्षापूर्वी चंद्रपूर नगरपालिका असताना शहरात पाणीपुरवठा करण्याचा कंत्राट खासगी कंपनीकडे देण्यात आले. शुद्ध पाण्याचा पुरवठा करणे, फुटलेल्या जलवाहिन्यांची त्वरित दुरुस्ती करणे, शिवाय जनतेकडून पाणीपट्टी कराची परस्पर उचल करणे आदींची नोंद यावेळी कंपनीसोबत झालेल्या करारात झाली होती. त्यानंतर आता दुसर्‍या कंपनीकडे मनपाने कंत्राट दिले आहे.

इरई धरणातील पाणी तुकुम भागातील जलशुद्धीकरण केंद्रात पोहोचविले जाते. त्यानंतर हे शुद्ध केलेले पाणी टाकीत पोहोचविण्याकरिता शहरात जलवाहिनी टाकण्यात आली. परंतु ही जलवाहिनी एक किलोमीटर अंतरावर अनेक ठिकाणी फुटली आहे. मागील काही वर्षांंपासून फुटलेल्या जलवाहिनीची थातुरमातूर दुरुस्ती करण्यात आली. या फुटलेल्या जलवाहिनीला पर्याय म्हणून चार वर्षांपूर्वी महानगरपालिकेने एक कोटी रुपये खर्चाची दुसरी जलवाहिनी टाकली. सदर जलवाहिनीचे काम पूर्ण होऊन दोन वर्षाचा कालावधी लोटला, तरीही अशुद्ध पाणीपुरवठय़ाचा प्रश्न सुटला नाही. दर वर्षाला पाणीपट्टी कर म्हणून ग्राहकाकडून मोठय़ा प्रमाणात वसूल केल्या जातो. मात्र त्यांना त्या तुलनेत पुरेसे पाणी पुरवठा केल्या जात नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

एकीकडे फुटलेल्या जलवाहिनीद्वारे घराघरात अशुद्ध पाणी पोहचविले जाते तर, दुसरीकडे ज्या टाकीत पाण्याची साठवणूक होते ती टाकी कित्येक वर्षांंपासून स्वच्छ केली नाही. महानगरपालिकेकडून होणार्‍या दुर्लक्षामुळे चंद्रपुरातील जनतेच्या आरोग्याशी खेळ खेळला जात आहे.

शहरातील सर्व प्रभागामध्ये नियमित पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिकांची ओरड आहे. त्यातच काही नागरिक नळाला टिल्लू पंप लावत असल्याने अन्य नागरिकांना पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे नळ सोडण्याच्या वेळी विशेष मोहीम राबवून टिल्लू पंप लावणार्‍यांविरुध्द कारवाई करणे तेवढेच गरजेचे आहे. मात्र अशी कारवाई केली जात नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, ज्या दिवशी पाणी पुरवठा बंद असतो, त्या दिवशी नागरिकांना कोणत्याही प्रकारे सूचना देण्यात येत नाही. शुद्ध आणि नियमित पाणी पुरवठा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. (नगर प्रतिनिधी)