शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

वाटमारी करणारी टोळी गजाआड

By admin | Updated: April 13, 2016 01:18 IST

येथील एका व्यापाऱ्यांच्या दिवाणजीला रस्त्यावर मोटारसायकल आडवी करून लुटल्याची घटना शनिवारी घडली होती.

बल्लारपूर पोलिसांची कारवाई : चार लाखांचा मुद्देमाल जप्तबल्लारपूर : येथील एका व्यापाऱ्यांच्या दिवाणजीला रस्त्यावर मोटारसायकल आडवी करून लुटल्याची घटना शनिवारी घडली होती. लुटारूंनी दिवाणजीकडील वसुलीचे पाच लाख ५० हजार रुपये असलेली बॅग जबरीने हिसकावून पळ काढला होता. याची तक्रार बल्लारपूर पोलीस ठाण्यात रविवारी करण्यात आली. या घटनेमुळे व्यापारीवर्गात खळबळ माजली. बल्लारपूर पोलिसांनी प्रयत्नांची शिकस्त करुन वाटमारी करणाऱ्या टोळीला गजाआड करुन चार लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.सुनील मनोहर जांभुळकर (३७), विशेष ऊर्फ विशु मोगली कोंडावार (२८) रा. दादाभाई नौरोजी वॉर्ड बल्लारपूर व सुनील तिरुपती सिमलावार (२१) रा. महाराणा प्रताप वॉर्ड बल्लारपूर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अन्य दोन आरोपींची नावे अद्याप कळली नाहीत.येथील व्यापारी रामनारायण खंडेलवाल यांच्याकडे शेख शहादल हैद्दर शेख (५४) रा. कन्नमवार वॉर्ड बल्लारपूर हा दिवाणजी म्हणून कामाला होता. सदर व्यापाऱ्याची उधारी रक्कम वसुलीचे तो काम करायचा. शनिवारी शेख शहादत्त याने राजुरा, गडचांदूर विरुर व नांदाफाटा येथील व्यापाऱ्यांकडून उधारीची रक्कम वसुल केली. ५ लाख ५० हजार रुपये बँगेमध्ये भरुन तो राजुरामार्गाने बल्लारपूरकडे दुचाकी वाहनाने येत होता. वर्धा नदीचे पात्र ओलांडल्यानंतर या घटनेतील पाचही आरोपीने पाठलाग करुन त्याला अडविले. राजुरा ते बामणी (दुधोली) मार्गावर सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान त्याला मारहाण करुन रक्कम असलेली बॅग जबरीने जखमी करुन घटनास्थळावरुन पोबारा केला. या घटनेमुळे पोलीस प्रशासन चांगलेच हादरले. शेख शहादत्त यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपासाला गती दिली. जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप, अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपुत, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रल्हद गिरी यांनी तातडीने बैठक घेवून आरोपींना जेरबंद करण्याची येथील पोलीस ठाण्याच्या प्रमुखांना निर्देश दिले. येथील पोलीस निरीक्षक प्रदीप सिरस्कर यांनी तपासाची चक्रे फिरवली. अखेर पाच आरोपींना वाटमारी करण्याच्या गुन्ह्याखाली गजाआड करण्यात यश आहे. ही कारवाई उपनिरीक्षक विनोद बावणे, राजेश चुंचूवार, दिवाकर पवार, प्रभाकर जाधव, अमोल नवघरे, संजय पोन्दे, विलास निंबाळकर, सुभाष सिडाम यांच्या पथकाने केली. (शहर प्रतिनिधी)