शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

गोरगरिबांसाठी काँग्रेस पक्षच पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 00:56 IST

देशात मागील ६० वर्षांपासून काँग्रेस पक्षाने सत्ता चालवून देशाची प्रगती केली. त्यात सर्वसामान्य जनतेचे हित जोपासत न्याय देण्याचे काम केले असून गोरगरीब जनतेची प्रगती उंचविण्यासाठी माजी ....

ठळक मुद्देअविनाश वारजूकर : भालेश्वर येथे कार्यकर्ता स्नेहमीलन व सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : देशात मागील ६० वर्षांपासून काँग्रेस पक्षाने सत्ता चालवून देशाची प्रगती केली. त्यात सर्वसामान्य जनतेचे हित जोपासत न्याय देण्याचे काम केले असून गोरगरीब जनतेची प्रगती उंचविण्यासाठी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी प्रयत्न करून न्याय देण्याचे काम केले. मात्र विद्यमान सरकारने जनहितविरोधी धोरण राबवून जनतेची दिशाभूल केली आहे. त्यामुळे पुन्हा काँग्रेसची सत्ता आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने संघटन मजबुतीसाठी प्रयत्न करावे, असे आवाहन माजी आमदार डॉ. अविनाश वारजूकर यांनी केले.भालेश्वर येथील कार्यकर्ता व सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, प्रदेश सचिव रवींद्र दरेकर, युवक काँग्रेसचे लोकसभा क्षेत्र अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, पंजाबराव गावंडे, जि.प. गटनेते डॉ.सतीश वारजूकर, जि. प सदस्य राजेश कांबळे, जि. प. सदस्य प्रमोद चिमुरकर, जि. प. सदस्य स्मिता पारधी, महिला काँग्रेसच्या तालुका अध्यक्ष मंगला लोनबले, तालुका अध्यक्ष खेमराज तिडके, विजय गावंडे, पं. स. सदस्य रोशन ढोक, विजय अमृतकर, कायरकर, नेताजी मेश्राम वामन मिसार आदी उपस्थित होते.यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्रात सत्ता असताना महत्वाचे पदे घेतली नाही. ते जनतेच्या कल्याणासाठी झटत राहिले व आजही झटत आहेत. काँग्रेसच्या काळातील योजनांचे नावे बदलून जुन्याच योजना भाजप शासन राबवित असून जनविरोधी निर्णय घेत आहे. मात्र काँग्रेस पक्ष जणसामान्यांपर्यत पोहचून समस्या सोडवित आहे, असे सांगितले. कार्यक्रम दरम्यान जि. प. सदस्य व पं.स. सदस्य यांचा सत्कार करण्यात आला. तसेच या कार्यकर्ता स्नेहमीलन मेळाव्यात चिमूर तालुका युवक काँग्रेस तालुका अध्यक्षपदी धनराज डवले यांची नियुक्ती करून उपस्थितांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आला. यावेयी शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.रुग्णालयाची मागणीगोवरी : पाचगाव हे गाव आदिवासीबहुल गाव आहे. गावातील बहुतेक कुटुंबाकडे शेती व्यवसाय आहे. त्यामुळे गावात पशुधनाची संख्या मोठी आहे. पशुधन आजारी पडल्यास त्यांना उपचारासाठी भुरकुंडा येथे न्यावे लागते. त्यामुळे येथे पशुवैद्यकीय रुग्णालय सुरु करण्याची मागणी आहे