शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

गोरगरिबांसाठी काँग्रेस पक्षच पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 00:56 IST

देशात मागील ६० वर्षांपासून काँग्रेस पक्षाने सत्ता चालवून देशाची प्रगती केली. त्यात सर्वसामान्य जनतेचे हित जोपासत न्याय देण्याचे काम केले असून गोरगरीब जनतेची प्रगती उंचविण्यासाठी माजी ....

ठळक मुद्देअविनाश वारजूकर : भालेश्वर येथे कार्यकर्ता स्नेहमीलन व सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : देशात मागील ६० वर्षांपासून काँग्रेस पक्षाने सत्ता चालवून देशाची प्रगती केली. त्यात सर्वसामान्य जनतेचे हित जोपासत न्याय देण्याचे काम केले असून गोरगरीब जनतेची प्रगती उंचविण्यासाठी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी प्रयत्न करून न्याय देण्याचे काम केले. मात्र विद्यमान सरकारने जनहितविरोधी धोरण राबवून जनतेची दिशाभूल केली आहे. त्यामुळे पुन्हा काँग्रेसची सत्ता आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने संघटन मजबुतीसाठी प्रयत्न करावे, असे आवाहन माजी आमदार डॉ. अविनाश वारजूकर यांनी केले.भालेश्वर येथील कार्यकर्ता व सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, प्रदेश सचिव रवींद्र दरेकर, युवक काँग्रेसचे लोकसभा क्षेत्र अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, पंजाबराव गावंडे, जि.प. गटनेते डॉ.सतीश वारजूकर, जि. प सदस्य राजेश कांबळे, जि. प. सदस्य प्रमोद चिमुरकर, जि. प. सदस्य स्मिता पारधी, महिला काँग्रेसच्या तालुका अध्यक्ष मंगला लोनबले, तालुका अध्यक्ष खेमराज तिडके, विजय गावंडे, पं. स. सदस्य रोशन ढोक, विजय अमृतकर, कायरकर, नेताजी मेश्राम वामन मिसार आदी उपस्थित होते.यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्रात सत्ता असताना महत्वाचे पदे घेतली नाही. ते जनतेच्या कल्याणासाठी झटत राहिले व आजही झटत आहेत. काँग्रेसच्या काळातील योजनांचे नावे बदलून जुन्याच योजना भाजप शासन राबवित असून जनविरोधी निर्णय घेत आहे. मात्र काँग्रेस पक्ष जणसामान्यांपर्यत पोहचून समस्या सोडवित आहे, असे सांगितले. कार्यक्रम दरम्यान जि. प. सदस्य व पं.स. सदस्य यांचा सत्कार करण्यात आला. तसेच या कार्यकर्ता स्नेहमीलन मेळाव्यात चिमूर तालुका युवक काँग्रेस तालुका अध्यक्षपदी धनराज डवले यांची नियुक्ती करून उपस्थितांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आला. यावेयी शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.रुग्णालयाची मागणीगोवरी : पाचगाव हे गाव आदिवासीबहुल गाव आहे. गावातील बहुतेक कुटुंबाकडे शेती व्यवसाय आहे. त्यामुळे गावात पशुधनाची संख्या मोठी आहे. पशुधन आजारी पडल्यास त्यांना उपचारासाठी भुरकुंडा येथे न्यावे लागते. त्यामुळे येथे पशुवैद्यकीय रुग्णालय सुरु करण्याची मागणी आहे