शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

गोरगरिबांसाठी काँग्रेस पक्षच पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 00:56 IST

देशात मागील ६० वर्षांपासून काँग्रेस पक्षाने सत्ता चालवून देशाची प्रगती केली. त्यात सर्वसामान्य जनतेचे हित जोपासत न्याय देण्याचे काम केले असून गोरगरीब जनतेची प्रगती उंचविण्यासाठी माजी ....

ठळक मुद्देअविनाश वारजूकर : भालेश्वर येथे कार्यकर्ता स्नेहमीलन व सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : देशात मागील ६० वर्षांपासून काँग्रेस पक्षाने सत्ता चालवून देशाची प्रगती केली. त्यात सर्वसामान्य जनतेचे हित जोपासत न्याय देण्याचे काम केले असून गोरगरीब जनतेची प्रगती उंचविण्यासाठी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी प्रयत्न करून न्याय देण्याचे काम केले. मात्र विद्यमान सरकारने जनहितविरोधी धोरण राबवून जनतेची दिशाभूल केली आहे. त्यामुळे पुन्हा काँग्रेसची सत्ता आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने संघटन मजबुतीसाठी प्रयत्न करावे, असे आवाहन माजी आमदार डॉ. अविनाश वारजूकर यांनी केले.भालेश्वर येथील कार्यकर्ता व सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, प्रदेश सचिव रवींद्र दरेकर, युवक काँग्रेसचे लोकसभा क्षेत्र अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, पंजाबराव गावंडे, जि.प. गटनेते डॉ.सतीश वारजूकर, जि. प सदस्य राजेश कांबळे, जि. प. सदस्य प्रमोद चिमुरकर, जि. प. सदस्य स्मिता पारधी, महिला काँग्रेसच्या तालुका अध्यक्ष मंगला लोनबले, तालुका अध्यक्ष खेमराज तिडके, विजय गावंडे, पं. स. सदस्य रोशन ढोक, विजय अमृतकर, कायरकर, नेताजी मेश्राम वामन मिसार आदी उपस्थित होते.यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्रात सत्ता असताना महत्वाचे पदे घेतली नाही. ते जनतेच्या कल्याणासाठी झटत राहिले व आजही झटत आहेत. काँग्रेसच्या काळातील योजनांचे नावे बदलून जुन्याच योजना भाजप शासन राबवित असून जनविरोधी निर्णय घेत आहे. मात्र काँग्रेस पक्ष जणसामान्यांपर्यत पोहचून समस्या सोडवित आहे, असे सांगितले. कार्यक्रम दरम्यान जि. प. सदस्य व पं.स. सदस्य यांचा सत्कार करण्यात आला. तसेच या कार्यकर्ता स्नेहमीलन मेळाव्यात चिमूर तालुका युवक काँग्रेस तालुका अध्यक्षपदी धनराज डवले यांची नियुक्ती करून उपस्थितांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आला. यावेयी शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.रुग्णालयाची मागणीगोवरी : पाचगाव हे गाव आदिवासीबहुल गाव आहे. गावातील बहुतेक कुटुंबाकडे शेती व्यवसाय आहे. त्यामुळे गावात पशुधनाची संख्या मोठी आहे. पशुधन आजारी पडल्यास त्यांना उपचारासाठी भुरकुंडा येथे न्यावे लागते. त्यामुळे येथे पशुवैद्यकीय रुग्णालय सुरु करण्याची मागणी आहे