शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

‘त्या’ नागपंचमीच्या बाऱ्या अन् चिमूरचा क्रांती लढा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 05:01 IST

१६ ऑगस्ट १९४२ चा तो नागपंचमीचा दिवस. त्यामुळे घराघरात नागपंचमीच्या बाºया बोलल्या जात होत्या. नागपंचमीच्या बाºया आणि क्रांतीच्या ज्वाला यातूनच चिमुरातील क्रांतिकारकांनी इंग्रज जुलमी अधिकारी एसडीओ डुंगाजी, नायब तहसीलदार सोनवणे व जरासंध यांचा वध केला. यासाठी तीन क्रांतिकारक शहीद झाले होते. त्यामुळे १६ ऑगस्ट १९४२ ची नागपंचमी रक्तरंजित ठरली होती.

ठळक मुद्देइंग्रज अधिकाऱ्यांचा केला होता वध : चिमूरकरांची ‘ती’ नागपंचमी झाली रक्तरंजित

राजकुमार चुनारकर ।लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : ‘गुलामी अब नहीं होना हमारे प्रिय भारत मे, हम आझादी के लिये मर मिटेंगे, हमारे प्रिय भारत मे’ या राष्ट्रसंताच्या क्रांतिकारी भजनाचे बोल प्रत्येकाच्या कानात घुमत होते. १६ ऑगस्ट १९४२ चा तो नागपंचमीचा दिवस. त्यामुळे घराघरात नागपंचमीच्या बाºया बोलल्या जात होत्या. नागपंचमीच्या बाऱ्या आणि क्रांतीच्या ज्वाला यातूनच चिमुरातील क्रांतिकारकांनी इंग्रज जुलमी अधिकारी एसडीओ डुंगाजी, नायब तहसीलदार सोनवणे व जरासंध यांचा वध केला. यासाठी तीन क्रांतिकारक शहीद झाले होते. त्यामुळे १६ ऑगस्ट १९४२ ची नागपंचमी रक्तरंजित ठरली होती.इंग्रजाची जुलमी सत्ता भारतातून उलथवून लावण्यासाठी महात्मा गांधींनी ८ ऑगस्ट १९४२ ला मुंबई येथील ग्वालिया टॅन्क मैदानावर करा अथवा मराचा संदेश दिला. या संदेशाने तरुणांना स्फूर्ती दिली. या आदेशाने चिमूर येथील युवा क्रांतिकारकांनी स्वातंत्र्यांसाठी गुप्त बैठका व प्रभात फेºया काढण्यास १२ ऑगस्ट १९४२ पासून सुरुवात केली. याच परिसरात वास्तव्यास असलेले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गावागावात भजनाच्या माध्यमातून युवकांना स्वातंत्र्याविषयी प्रेरित करीत होते.१६ ऑगस्ट १९४२ ला नागपंचमीचा दिवस असल्याने घराघरात नागदेवतेची पूजा करून बाºया बोलल्या जात होत्या. अशातच सकाळी ९ वाजता गोपाळराव कोरेकार यांच्या नेतृत्वाखाली अभूतपूर्व प्रभातफेरी काढली. या फेरीत काँग्रेस, सेवादल व संघाचे कार्यकर्ते एकत्र आले. प्रभातफेरी जुना बसस्थानक येथे आली. तिथे ‘वाईसराय दिल्ली मे, जुते खाये गल्ली मे’ अशा घोषणा देत नागमंदिराकडे जात होती. नागपंचमीमुळे शेकडो नागरिक जमा झाले होते. मात्र काही क्रांतिकारकाच्या मनात वेगळेच होते.‘पत्थर सारे बॉम्ब बनेंगे, भक्त बनेगी सेना’ राष्ट्रसंताच्या या भजनाने प्रेरित झालेल्या क्रांतिकारकांपैकी सेवादलाचे उद्धवराव खेमस्कर यांनी क्रांतीचा बिगुल फुंकला व सारे कार्यकर्ते अभ्यंकर मैदानावर येऊन ‘भारत माता की जय’ अशा घोषणा देऊ लागले. तेवढ्यात पोलीस दलाने स्वातंत्र्यविरांच्या हातातील तिरंगा झेंडा हिसकावून घेतला व बारा क्रांतिकारकाना तुरुंगात डांबले. या घटनेने चिडून क्रांतिकारकांनी आपला मोर्चा इंग्रज अधिकारी डुंगाजी, सोनवाणे व जरासंध यांच्याकडे वळविला व या तिन्ही इंग्रज अधिकाºयांना यमसदनी धाडले. याच दिवशी १६ वर्षांचा बालाजी रायपूरकर, श्रीराम बिंगेवार व बाबुलाल झिरे हे शहीद झाले.पाच फण्याची नागमूर्ती देते क्रांतीची प्रेरणाचिमूर येथील क्रांतीवीर व हुतात्म्यांचे स्मरण भावी पिढ्यांना राहावे व त्यांच्या कार्यातून आजच्या युवकांना प्रेरणा मिळावी, याकरिता १६ ऑगस्ट १९५२ ला या स्मारकाचा शिलाण्यास करण्यात आला. हे हुतात्मा स्मारक लांबी, रुंदी व ऊंचीने १६ बाय १६ फूट असून त्यावर पाच फण्यांची नागदेवतेची मूर्ती आहे. त्यावर हुतात्म्यांची नावे कोरलेली आहेत.

टॅग्स :Nag Panchamiनागपंचमी