शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
2
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
3
ZIM vs SA Test: खतरनाक 'सुपर स्पिन'! गोलंदाजाच्या भन्नाट फिरकीने केली फलंदाजांची 'दांडी गुल' (Video)
4
जळगावच्या मुलीचे कोल्हापूरमध्ये लग्न! बापाने घेतला गळफास; आईला माहिती होती सगळी गोष्ट
5
'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही', CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन
6
अंबानी-अदानींना टाकले मागे! नागपूरच्या कंपनीने घडवला इतिहास! 'या' अब्जाधीशाची विक्रमी कमाई!
7
खळबळजनक! सोनमपासून प्रेरणा घेऊन बायकोने काढला नवऱ्याचा काटा, बाईकला GPS अन्...
8
जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली
9
विधानसभेला बंडखोरी केली, अपक्ष निवडणूक लढवली, काँग्रेसकडून बड्या नेत्याचं निलंबन अखेर मागे  
10
Accident Video: भयंकर... धडकी भरवणारा! हॉटेलच्या समोर कारने चौघांना चिरडले; अपघात सीसीटीव्हीत कैद
11
Mumbai: धक्कादायक! पतीला चोरीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून पत्नीवर बलात्कार; पैसे, दागिनेही लुबाडले
12
१ जुलैपूर्वी तिकीट काढलं असेल तर प्रवाशांना द्यावे लागतील अतिरिक्त पैसे? अखेर रेल्वेने केलं स्पष्ट
13
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरुचरित्र सप्ताह करायचा आहे? पारायण कसे करावे? पाहा, नियम व पद्धती
14
धक्कादायक! रिक्षावाल्याला थांबवलं, पैसे घेऊन येतो म्हणाला अन्...; गोरेगावमध्ये तरुणाने संपवले स्वतःचे आयुष्य
15
इराण-इस्रायल युद्धबंदीनंतर सोन्याच्या किमतीत पहिल्यांदाच सर्वात मोठी वाढ! चांदीही चमकली!
16
'या' अभिनेत्याने घेतली निलेश साबळेंची जागा, 'चला हवा येऊ द्या'च्या नव्या पर्वाचं सूत्रसंचालन करणार
17
ENG vs IND : १२३ वर्षांत जे घडलं नाही ते करून दाखवण्याचं चॅलेंज; इथं पाहा टीम इंडियाचा रेकॉर्ड
18
वनप्लस पुन्हा एकदा डबल धमाका करणार; एकात वनप्लस १३ चा कॅमेरा? कोणते फोन येतायत...
19
हुंड्यासाठी पती झाला हैवान! दागिने, AC साठी टॉर्चर; लग्नानंतर ३ दिवसांनी नववधूने संपवलं जीवन
20
५०० वर्षांनी गुरु-शनिचा पॉवरफूल योग: ९ राशींचे कल्याण, अपार लाभ; भरघोस भरभराट, बक्कळ पैसा!

वनसडी परिसरात मिरची पीक करपले

By admin | Updated: October 30, 2015 01:08 IST

कोरपना तालुक्यातील वनसडी परिसरातील बहुतांश शेतकरी मिरचीचे उत्पादन घेतात.

लाखोंचा खर्च व्यर्थ : बोगस बियाणांचा फटकावनसडी : कोरपना तालुक्यातील वनसडी परिसरातील बहुतांश शेतकरी मिरचीचे उत्पादन घेतात. त्यामुळे यावर्षीसुद्धा मिरचीची लागवड करण्यात आली. मात्र बोगस बियाणांचा फटका शेतकऱ्यांना बसल्यामुळे संपूर्ण मिरचीचे पिक पूर्णत: करपून गेल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.दरवर्षी एकरी २० क्विंटल मिरची पिकाचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना यावर्षी मात्र बोगस मिरची बियाणे कंपनीने लाखो रुपयांचा चुना लावला आहे. पुर्वीपासून मिरचीचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या कृषी केंद्रातून बी.एन. आर. बियाणे, आॅक्सी बियाणे हे विनेज कंपनीचे बियाणे आणि सी.५ हे इंडम या कंपनी बियाणे तसेच १०४८ हे सिजेंटा या कंपनीचे बियाणे शेतकऱ्यांनी विकत घेऊन त्यानुसार बियाणांची लागवड करून रोपे लावण्यात आली. बियाणांची लागवड केल्यानंतर उत्पादन चांगले व्हावे, यासाठी या पिकावर शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त खर्च करायला सुरुवात केली. पण लाखो रुपयांचा खर्च करुनसुद्धा संपूर्ण मिरचीचे पिक सुकून गेले आहेत.निसर्गाच्या अवकृपेमुळे अगोदरच शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत.त्यात आता हे नवे संकट उभे ठाकल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. गेल्या २० वर्षांपासून एकरी २० ते ३० क्विंटल मिरची पीक घेणारे शेतकरी यावर्षी पूर्णपणे हतबल झालेले आहेत.या वर्षीच्या हंगामात सर्व बियाणे कंपन्यांनी मिरचीचे बोगस बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारून त्यांची फसवणूक केली आहे. यासंदर्भात सर्व संबंधित शेतकऱ्यांनी एकत्र येऊन कोरपना येथील कृषी अधिकाऱ्यांना निवेदन देऊन नुकसान भरपाईची मागणी केली आहे. यासोबतच शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप यांनादेखील निवेदन देण्यात आले. करपलेल्या मिरची पिकाची पाहणी करुन आम्हाला बियाणे कंपन्यांकडून मोबदला मिळावा, यासाठी प्रयत्न करावे, अशी मगणी केली आहे. संबंधित कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी शेतात जावून मिरची पिकाची पाहणी करावी व एकरी १० लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. (वार्ताहर)मी गेल्या १० वर्षांपासून पाच ते १० एकर मिरचीचे उत्पन्न घेत आहे. दरवर्षी मला एकरी २० ते २५ क्विंटल उत्पादन मिळते. पण यावर्षी मिरची पिकावर लाखो रुपये खर्च करुनसुद्धा मिरचीची रोपे पूर्णपणे करपून गेली आहेत. या परिसरात पाच ते १० एकर मिरची पीक घेणारे शेतकरी आहेत. कंपनीने आम्हास योग्य तो मोबदला द्यावा, अशी आमची मागणी आहे.- डॉ. देवराव ठावरी, शेतकरी, वनसडी