शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
3
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
4
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
5
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
6
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
8
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
9
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
10
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
11
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
12
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
13
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
14
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
15
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
16
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
17
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
18
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
19
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
20
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

वनसडी परिसरात मिरची पीक करपले

By admin | Updated: October 30, 2015 01:08 IST

कोरपना तालुक्यातील वनसडी परिसरातील बहुतांश शेतकरी मिरचीचे उत्पादन घेतात.

लाखोंचा खर्च व्यर्थ : बोगस बियाणांचा फटकावनसडी : कोरपना तालुक्यातील वनसडी परिसरातील बहुतांश शेतकरी मिरचीचे उत्पादन घेतात. त्यामुळे यावर्षीसुद्धा मिरचीची लागवड करण्यात आली. मात्र बोगस बियाणांचा फटका शेतकऱ्यांना बसल्यामुळे संपूर्ण मिरचीचे पिक पूर्णत: करपून गेल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.दरवर्षी एकरी २० क्विंटल मिरची पिकाचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना यावर्षी मात्र बोगस मिरची बियाणे कंपनीने लाखो रुपयांचा चुना लावला आहे. पुर्वीपासून मिरचीचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या कृषी केंद्रातून बी.एन. आर. बियाणे, आॅक्सी बियाणे हे विनेज कंपनीचे बियाणे आणि सी.५ हे इंडम या कंपनी बियाणे तसेच १०४८ हे सिजेंटा या कंपनीचे बियाणे शेतकऱ्यांनी विकत घेऊन त्यानुसार बियाणांची लागवड करून रोपे लावण्यात आली. बियाणांची लागवड केल्यानंतर उत्पादन चांगले व्हावे, यासाठी या पिकावर शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त खर्च करायला सुरुवात केली. पण लाखो रुपयांचा खर्च करुनसुद्धा संपूर्ण मिरचीचे पिक सुकून गेले आहेत.निसर्गाच्या अवकृपेमुळे अगोदरच शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत.त्यात आता हे नवे संकट उभे ठाकल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. गेल्या २० वर्षांपासून एकरी २० ते ३० क्विंटल मिरची पीक घेणारे शेतकरी यावर्षी पूर्णपणे हतबल झालेले आहेत.या वर्षीच्या हंगामात सर्व बियाणे कंपन्यांनी मिरचीचे बोगस बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारून त्यांची फसवणूक केली आहे. यासंदर्भात सर्व संबंधित शेतकऱ्यांनी एकत्र येऊन कोरपना येथील कृषी अधिकाऱ्यांना निवेदन देऊन नुकसान भरपाईची मागणी केली आहे. यासोबतच शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप यांनादेखील निवेदन देण्यात आले. करपलेल्या मिरची पिकाची पाहणी करुन आम्हाला बियाणे कंपन्यांकडून मोबदला मिळावा, यासाठी प्रयत्न करावे, अशी मगणी केली आहे. संबंधित कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी शेतात जावून मिरची पिकाची पाहणी करावी व एकरी १० लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. (वार्ताहर)मी गेल्या १० वर्षांपासून पाच ते १० एकर मिरचीचे उत्पन्न घेत आहे. दरवर्षी मला एकरी २० ते २५ क्विंटल उत्पादन मिळते. पण यावर्षी मिरची पिकावर लाखो रुपये खर्च करुनसुद्धा मिरचीची रोपे पूर्णपणे करपून गेली आहेत. या परिसरात पाच ते १० एकर मिरची पीक घेणारे शेतकरी आहेत. कंपनीने आम्हास योग्य तो मोबदला द्यावा, अशी आमची मागणी आहे.- डॉ. देवराव ठावरी, शेतकरी, वनसडी