शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

वनसडी परिसरात मिरची पीक करपले

By admin | Updated: October 30, 2015 01:08 IST

कोरपना तालुक्यातील वनसडी परिसरातील बहुतांश शेतकरी मिरचीचे उत्पादन घेतात.

लाखोंचा खर्च व्यर्थ : बोगस बियाणांचा फटकावनसडी : कोरपना तालुक्यातील वनसडी परिसरातील बहुतांश शेतकरी मिरचीचे उत्पादन घेतात. त्यामुळे यावर्षीसुद्धा मिरचीची लागवड करण्यात आली. मात्र बोगस बियाणांचा फटका शेतकऱ्यांना बसल्यामुळे संपूर्ण मिरचीचे पिक पूर्णत: करपून गेल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.दरवर्षी एकरी २० क्विंटल मिरची पिकाचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना यावर्षी मात्र बोगस मिरची बियाणे कंपनीने लाखो रुपयांचा चुना लावला आहे. पुर्वीपासून मिरचीचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या कृषी केंद्रातून बी.एन. आर. बियाणे, आॅक्सी बियाणे हे विनेज कंपनीचे बियाणे आणि सी.५ हे इंडम या कंपनी बियाणे तसेच १०४८ हे सिजेंटा या कंपनीचे बियाणे शेतकऱ्यांनी विकत घेऊन त्यानुसार बियाणांची लागवड करून रोपे लावण्यात आली. बियाणांची लागवड केल्यानंतर उत्पादन चांगले व्हावे, यासाठी या पिकावर शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त खर्च करायला सुरुवात केली. पण लाखो रुपयांचा खर्च करुनसुद्धा संपूर्ण मिरचीचे पिक सुकून गेले आहेत.निसर्गाच्या अवकृपेमुळे अगोदरच शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत.त्यात आता हे नवे संकट उभे ठाकल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. गेल्या २० वर्षांपासून एकरी २० ते ३० क्विंटल मिरची पीक घेणारे शेतकरी यावर्षी पूर्णपणे हतबल झालेले आहेत.या वर्षीच्या हंगामात सर्व बियाणे कंपन्यांनी मिरचीचे बोगस बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारून त्यांची फसवणूक केली आहे. यासंदर्भात सर्व संबंधित शेतकऱ्यांनी एकत्र येऊन कोरपना येथील कृषी अधिकाऱ्यांना निवेदन देऊन नुकसान भरपाईची मागणी केली आहे. यासोबतच शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप यांनादेखील निवेदन देण्यात आले. करपलेल्या मिरची पिकाची पाहणी करुन आम्हाला बियाणे कंपन्यांकडून मोबदला मिळावा, यासाठी प्रयत्न करावे, अशी मगणी केली आहे. संबंधित कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी शेतात जावून मिरची पिकाची पाहणी करावी व एकरी १० लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. (वार्ताहर)मी गेल्या १० वर्षांपासून पाच ते १० एकर मिरचीचे उत्पन्न घेत आहे. दरवर्षी मला एकरी २० ते २५ क्विंटल उत्पादन मिळते. पण यावर्षी मिरची पिकावर लाखो रुपये खर्च करुनसुद्धा मिरचीची रोपे पूर्णपणे करपून गेली आहेत. या परिसरात पाच ते १० एकर मिरची पीक घेणारे शेतकरी आहेत. कंपनीने आम्हास योग्य तो मोबदला द्यावा, अशी आमची मागणी आहे.- डॉ. देवराव ठावरी, शेतकरी, वनसडी