शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
3
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
4
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
5
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
6
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
7
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
8
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
9
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
10
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
11
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
12
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
13
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
14
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
15
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
16
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
17
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
18
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
19
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
20
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...

भाविकांना मिरचीचा ठसका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 23:21 IST

स्थानिक नागमंदिरातील भद्रनाग स्वामींच्या दर्शनासाठी दररोज भाविक येतात.

ठळक मुद्देनागरिकांचा आरोप : बाजाराचे स्थानांतरण करण्याची मागणी

आॅनलाईन लोकमतभद्रावती : स्थानिक नागमंदिरातील भद्रनाग स्वामींच्या दर्शनासाठी दररोज भाविक येतात. मात्र, मंदिराच्या रस्त्यावरच मिरची बाजार भरत असल्याने नागरिक व भाविकांंना प्रचंड त्रास होत आहे. त्यामुळे विक्रेत्यांचा व्यवसाय सुरू राहावा, या दृष्टीने सुरक्षित व योग्य ठिकाणी स्थानांतरण करावे, अशी मागणी केली जात आहे.भद्रावती शहराची पौराणिक शहर म्हणून ख्याती आहे. भद्रनाग स्वामींच्या दर्शनासाठी हजारो भक्त शहरात येतात. मात्र, मंदिरात दर्शनासाठी येणाºया भाविकांना दर बुधवारी मिरची बाजारामुळे हैराण व्हावे लागते. मिरची बाजारातील धुलिकणांमुळे त्रासदायक ठसका बसण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. परिणामी, भाविकांसह बालकेही हवालदील झाली आहेत. ज्या ठिकाणी मिरची बाजार भरतो, अगदी त्याच्याच मागे जिल्हा परिषद शाळा आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना मिरचीच्या धुलिकणांचा त्रास होत आहे.या बाजारातून विंजासन, गवराळा, शिवाजीनगर, सुरक्षानगर आणि अन्य वस्त्यांकडे ये-जा करणाºया नागरिकांना संकटांचा सामना करावा लागत आहे. शेकडो दुचाकी आणि चारचाकी वाहनचालकांनाही हाच जाच सुरू झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अपघाताचीही शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांचा त्रास लक्षात घेऊन पालिकेने मिरची बाजाराच्या स्थानांतरणाचा निर्णय घ्यावा, अशी मागणी केली जात आहे. शहरातील चिकण, मटन व मच्छी मार्केट सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करुन नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यात आली. हाच पर्याय शहरातील प्रसिद्ध नाग मंदिराच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना उपलब्ध करून द्यावा.मंदिर परिसराच्या बाजुला भरणारा दर बुधवारचा मिरची बाजार अन्यत्र स्थानांतरीत केल्यास भाविक व सर्वसामान्य नागरिकांची समस्या कायमची दूर होऊ शकेल. नगर परिषद प्रशासनाने यावर विचार करावा, अशी मागणी शहरातील नागरिक करीत आहेत.