शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

भाविकांना मिरचीचा ठसका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 23:21 IST

स्थानिक नागमंदिरातील भद्रनाग स्वामींच्या दर्शनासाठी दररोज भाविक येतात.

ठळक मुद्देनागरिकांचा आरोप : बाजाराचे स्थानांतरण करण्याची मागणी

आॅनलाईन लोकमतभद्रावती : स्थानिक नागमंदिरातील भद्रनाग स्वामींच्या दर्शनासाठी दररोज भाविक येतात. मात्र, मंदिराच्या रस्त्यावरच मिरची बाजार भरत असल्याने नागरिक व भाविकांंना प्रचंड त्रास होत आहे. त्यामुळे विक्रेत्यांचा व्यवसाय सुरू राहावा, या दृष्टीने सुरक्षित व योग्य ठिकाणी स्थानांतरण करावे, अशी मागणी केली जात आहे.भद्रावती शहराची पौराणिक शहर म्हणून ख्याती आहे. भद्रनाग स्वामींच्या दर्शनासाठी हजारो भक्त शहरात येतात. मात्र, मंदिरात दर्शनासाठी येणाºया भाविकांना दर बुधवारी मिरची बाजारामुळे हैराण व्हावे लागते. मिरची बाजारातील धुलिकणांमुळे त्रासदायक ठसका बसण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. परिणामी, भाविकांसह बालकेही हवालदील झाली आहेत. ज्या ठिकाणी मिरची बाजार भरतो, अगदी त्याच्याच मागे जिल्हा परिषद शाळा आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना मिरचीच्या धुलिकणांचा त्रास होत आहे.या बाजारातून विंजासन, गवराळा, शिवाजीनगर, सुरक्षानगर आणि अन्य वस्त्यांकडे ये-जा करणाºया नागरिकांना संकटांचा सामना करावा लागत आहे. शेकडो दुचाकी आणि चारचाकी वाहनचालकांनाही हाच जाच सुरू झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अपघाताचीही शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांचा त्रास लक्षात घेऊन पालिकेने मिरची बाजाराच्या स्थानांतरणाचा निर्णय घ्यावा, अशी मागणी केली जात आहे. शहरातील चिकण, मटन व मच्छी मार्केट सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करुन नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यात आली. हाच पर्याय शहरातील प्रसिद्ध नाग मंदिराच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना उपलब्ध करून द्यावा.मंदिर परिसराच्या बाजुला भरणारा दर बुधवारचा मिरची बाजार अन्यत्र स्थानांतरीत केल्यास भाविक व सर्वसामान्य नागरिकांची समस्या कायमची दूर होऊ शकेल. नगर परिषद प्रशासनाने यावर विचार करावा, अशी मागणी शहरातील नागरिक करीत आहेत.