शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
3
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
4
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
5
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून विहिरीत फेकलं
6
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
7
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
8
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
9
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
10
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
11
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
12
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
13
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
14
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
15
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
16
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
17
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
18
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
19
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
20
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!

कोरोनातून सावरलेल्या बालकांना एमएसआयसी आजाराची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:20 IST

चंद्रपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला. यामध्ये अनेकांना आजार झाला तर काहींचा बळीसुद्धा गेला. काही लहान बालकांनाही कोरोना ...

चंद्रपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला. यामध्ये अनेकांना आजार झाला तर काहींचा बळीसुद्धा गेला. काही लहान बालकांनाही कोरोना संसर्गाने ग्रासले. सध्या रुग्णसंख्या कमी झाली असली तरी धोका मात्र कायम आहे. दरम्यान, कोरोनातून सावरलेल्या बालकांना एमएसआयसी म्हणजे, मल्टी सिस्टम इन्फ्लेमेटरी सिंड्रोमची लागण होत आहे. सध्या चंद्रपूर जिल्ह्यात असे रुग्ण नसले तरी काळजी घेणे गरजेचे आहे.

कोरोचा धोका अद्याप टळलेला नाही. त्यातच कोरोना होऊन गेल्यानंतर होणारा आजारदेखील वाढत आहेत. त्यामुळे कोरोनातून सावरलेल्यांनी तसेच ज्यांना कोरोना झाला नसेल अशा प्रत्येकांनी आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना म्युकरमायकोसिस होत असल्याचे समोर आले. त्यानंतर आरोग्य प्रशासनाने यासंदर्भात मोठ्या प्रमाणात जनजागृती केली. मधुमेह तसेच इतर आजार असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची विशेष काळजी घेण्यात आली.

सध्या कोरोनाची लाट ओसरत आहे. त्यामुळे राज्य शासनाने आता अनलाॅकची प्रक्रियाही सुरू केली आहे. विशेष म्हणजे, काही दिवसात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या लाटेमध्ये लहान मुलांना जास्त प्रमाणात बाधा होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आरोग्य प्रशासनाने त्यादृष्टीने तयारी सुरू केली आहे. दरम्यान, कोरोनातून बरे झालेल्या लहान मुलांना एमएसआयसी म्हणजेच मल्टी सिस्टम इन्फ्लेमेटरी सिंड्रोमची लागण होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कोरोनातून बरे झालेल्या बालकांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन आरोग्यतज्ज्ञांनी केले आहे.

बाॅक्स

अशी आहे लक्षणे

मुलांना खूप ताप येणे, सर्दी, कफ होणे

सतत पोटात दुखणे, मळमळ, उलट्या होणे, होळे लाल होणे,

त्वचेवर लाल चट्टे येणे

बाॅक्स

ही घ्या काळजी

मुलांना मास्कशिवाय बाहेर पडू देऊ नका, कुठलेही लक्षण आढळल्यास तातडीने डाॅक्टरांचा सल्ला घ्या.

कोरोनातून बरे झालेल्या मुलांकडे विशेष लक्ष द्या.

स्वत:हून औषध घेऊ नका. एमएसआयसी आजाराचे सुरुवासीलाच निदान झाल्यास तो गंभीर होत नाही.

बाॅख्स

जिल्ह्यातील एकूण रुग्ण-८४६१८

कोरोनावर मात केलेले रुग्ण-८२५९१

उपचार घेत असलेले रुग्ण-५०३

एकूण मृत्यू-१५२४

--

कोट

कोरोना रुग्णसंख्या कमी होत आहे. मात्र धोका अजूनही टळलेला नाही. त्यामुळे शासनाने प्रथम १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला गती देणे महत्त्वाचे आहे. लहान मुलांच्या लसीकरणासाठी ट्रायल सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे लहान मुलांचेही लसीकरण केल्यास पुढील संभाव्य धोके टाळता येईल. एमएसआयसी आजाराचा सध्यातरी आपल्याकडे धोका नसल्याचे दिसून येत आहे.

-डाॅ.अभिलाषा गावतुरे

बालरोग तज्ज्ञ, चंद्रपूर