शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
2
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
3
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
4
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
5
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
6
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
7
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
8
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
9
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
10
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
11
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
12
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
15
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
16
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
18
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
19
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
20
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का

बल्लारपूर पेपर मिल समस्येवर मुख्यमंत्री गंभीर

By admin | Updated: November 13, 2016 00:37 IST

बल्लारपूर पेपर मिलची आज सर्व बाबतीत वाईट स्थिती झाली आहे.

तूर्त चर्चा : नागपूर हिवाळी अधिवेशनात तोडगा काढण्याचे संकेतबल्लारपूर : बल्लारपूर पेपर मिलची आज सर्व बाबतीत वाईट स्थिती झाली आहे. या मिलला, कच्चा माल बांबूचा तुटवडा भासत आहे त्यामुळे उत्पादन ठप्प आहे. या विषयावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गंभीर असून त्यांनी या विषयाशी संबंधित मंत्री, अधिकारी, मिल व्यवस्थापन आणि कामगार प्रतिनिधी यांची बैठक बोलावून त्यावर चर्चा केली. बांबू पुरवठ्याचा प्रश्न नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मार्गी लावू, असे आश्वासन त्यांनी व्यवस्थापन तथा कामगार प्रतिनिधींना मुंबई येथे वर्षा बंगल्यावर दिले.या बैठकीला वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, कामगार आयुक्त यशवंत केरूरे, सहायक कामगार आयुक्त अनिल लासटवार, व्यवस्थापनाकडून पेपर मिलचे मुख्य प्रशासकीय अधिकारी निहार अग्रवाल, असोसिएट वाईस प्रेसिडेंट (मानव संसाधन) रणजी अब्राहम, बिल्ट बल्लारपूरचे मुख्य महाव्यवस्थापक व्यंकटेशरलू, जनसंपर्क अधिकारी नरेंद्र रावेल आणि बल्लारपूर पेपर मिल मजदूर सभेकडून महासचिव वसंत मांढरे, उपाध्यक्ष तारासिंग, अ‍ॅड. अविनाश ठावरी आदी उपस्थित होते. आर्थिक संकट आणि कच्चा मालाभावी मिल उत्पादन बंद असल्यामुळे कामगारांचे तीन महिन्यांचे वेतन, सुपर बोनस, एलटीए आदींचे सुमारे ३८ कोटी ५० लाख रुपये थकीत आहेत. या समस्या व्यवस्थापन आणि कामगार नेत्यांनी मुख्यमंत्र्यांपुढे मांडल्या. पेपर मिल व्यवस्थापनाने नेहमीप्रमाणे बांबूकरिता निविदा भरल्या. परंतु त्याचे पुढे काय झाले, याचे लिखित उत्तर वन विभागाने दिलेले नाही. वन विभागाकडून पेपर मिलची अडवणूक केली जात आहे, अशी तक्रार त्या बैठकीत करण्यात आली. हे सारे ऐकून घेऊन, पेपर मिल मजदूर सभेने मे महिन्यात, बांबूच्या मागणीकरिता उपोषण करताना, मुख्यमंत्र्याशी सभेचे अध्यक्ष नरेश पुगलिया यांनी चर्चा केली होती. त्यावेळी दिलेल्या आश्वासनाचा संदर्भ देत मुख्यमंत्र्यांनी, वन विभागाची पडिक जमीन पेपर मिलला बांबूचे उत्पादन करण्याकरिता दिली जाईल, असे सांगितले. शासनाने ‘पेसा’ कडून बांबू विकत घ्या, असे बजावले आहे. मात्र, त्यात बऱ्याच अडचणी येत आहे. म्हणून, आजवर वन विभागाकडून ज्या पद्धतीने मिलला बांबू देण्यात येत होता, त्याच पद्धतीने बांबू देण्याची सोय व्हावी, अशी विनंती करण्यात आली. सध्या नगर पालिकांच्या निवडणुका आहेत. आचार संहितेमुळे ठोस आश्वासन देता येत नाही. निवडणुका संपून आचारसंहितेनंतर त्यावर नेमका मार्ग काढू, असे मुख्यमंत्री शेवटी म्हणाले. ही माहिती पत्रपरिषदेत वसंत मांढरे यांनी दिली. तसेच पेपर मिल विकत घेण्यासाठी जे.के.सोबत सुरू असलेल्या वाटाघाटी फिस्कटल्या आहेत. आता थापर समूहच मिल चालविणार व २०१७ ला स्थिती पूर्ववत येणार, असे मांढरे यांनी ठासून सांगितले. या पत्रपरिषदेत तारासिंग, रामदास वागदरकर, वीरेंद्र आर्य उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)