शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

बल्लारपूर पेपर मिल समस्येवर मुख्यमंत्री गंभीर

By admin | Updated: November 13, 2016 00:37 IST

बल्लारपूर पेपर मिलची आज सर्व बाबतीत वाईट स्थिती झाली आहे.

तूर्त चर्चा : नागपूर हिवाळी अधिवेशनात तोडगा काढण्याचे संकेतबल्लारपूर : बल्लारपूर पेपर मिलची आज सर्व बाबतीत वाईट स्थिती झाली आहे. या मिलला, कच्चा माल बांबूचा तुटवडा भासत आहे त्यामुळे उत्पादन ठप्प आहे. या विषयावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गंभीर असून त्यांनी या विषयाशी संबंधित मंत्री, अधिकारी, मिल व्यवस्थापन आणि कामगार प्रतिनिधी यांची बैठक बोलावून त्यावर चर्चा केली. बांबू पुरवठ्याचा प्रश्न नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मार्गी लावू, असे आश्वासन त्यांनी व्यवस्थापन तथा कामगार प्रतिनिधींना मुंबई येथे वर्षा बंगल्यावर दिले.या बैठकीला वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, कामगार आयुक्त यशवंत केरूरे, सहायक कामगार आयुक्त अनिल लासटवार, व्यवस्थापनाकडून पेपर मिलचे मुख्य प्रशासकीय अधिकारी निहार अग्रवाल, असोसिएट वाईस प्रेसिडेंट (मानव संसाधन) रणजी अब्राहम, बिल्ट बल्लारपूरचे मुख्य महाव्यवस्थापक व्यंकटेशरलू, जनसंपर्क अधिकारी नरेंद्र रावेल आणि बल्लारपूर पेपर मिल मजदूर सभेकडून महासचिव वसंत मांढरे, उपाध्यक्ष तारासिंग, अ‍ॅड. अविनाश ठावरी आदी उपस्थित होते. आर्थिक संकट आणि कच्चा मालाभावी मिल उत्पादन बंद असल्यामुळे कामगारांचे तीन महिन्यांचे वेतन, सुपर बोनस, एलटीए आदींचे सुमारे ३८ कोटी ५० लाख रुपये थकीत आहेत. या समस्या व्यवस्थापन आणि कामगार नेत्यांनी मुख्यमंत्र्यांपुढे मांडल्या. पेपर मिल व्यवस्थापनाने नेहमीप्रमाणे बांबूकरिता निविदा भरल्या. परंतु त्याचे पुढे काय झाले, याचे लिखित उत्तर वन विभागाने दिलेले नाही. वन विभागाकडून पेपर मिलची अडवणूक केली जात आहे, अशी तक्रार त्या बैठकीत करण्यात आली. हे सारे ऐकून घेऊन, पेपर मिल मजदूर सभेने मे महिन्यात, बांबूच्या मागणीकरिता उपोषण करताना, मुख्यमंत्र्याशी सभेचे अध्यक्ष नरेश पुगलिया यांनी चर्चा केली होती. त्यावेळी दिलेल्या आश्वासनाचा संदर्भ देत मुख्यमंत्र्यांनी, वन विभागाची पडिक जमीन पेपर मिलला बांबूचे उत्पादन करण्याकरिता दिली जाईल, असे सांगितले. शासनाने ‘पेसा’ कडून बांबू विकत घ्या, असे बजावले आहे. मात्र, त्यात बऱ्याच अडचणी येत आहे. म्हणून, आजवर वन विभागाकडून ज्या पद्धतीने मिलला बांबू देण्यात येत होता, त्याच पद्धतीने बांबू देण्याची सोय व्हावी, अशी विनंती करण्यात आली. सध्या नगर पालिकांच्या निवडणुका आहेत. आचार संहितेमुळे ठोस आश्वासन देता येत नाही. निवडणुका संपून आचारसंहितेनंतर त्यावर नेमका मार्ग काढू, असे मुख्यमंत्री शेवटी म्हणाले. ही माहिती पत्रपरिषदेत वसंत मांढरे यांनी दिली. तसेच पेपर मिल विकत घेण्यासाठी जे.के.सोबत सुरू असलेल्या वाटाघाटी फिस्कटल्या आहेत. आता थापर समूहच मिल चालविणार व २०१७ ला स्थिती पूर्ववत येणार, असे मांढरे यांनी ठासून सांगितले. या पत्रपरिषदेत तारासिंग, रामदास वागदरकर, वीरेंद्र आर्य उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)